शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
2
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
3
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
4
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
5
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
6
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
7
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
8
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
9
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
10
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
11
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
12
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
13
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
14
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
15
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
16
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
17
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
18
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
19
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल
20
ना धक्का.. ना धोका! वनडे वर्ल्ड कप पर्यंत रोहितची कॅप्टन्सी सेफ? BCCI नव्हे तर ICC नं दिली हिंट

अधिवेशन गाजवावे; विरोधकांना व्यूहरचना करावी लागेल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2023 15:13 IST

अठरा दिवसांचे हे पावसाळी अधिवेशन आहे.

गोवा विधानसभेचे अधिवेशन उद्या मंगळवारी सुरू होणार आहे. अठरा दिवसांचे हे पावसाळी अधिवेशन आहे. पावसाळ्यात देखील सरकारला घाम फोडता येतो हे पूर्वी काँग्रेसची सरकारे अधिकारावर असायची तेव्हा विरोधक दाखवून देत असत. विद्यमान सावंत सरकारला विविध मुद्द्यांवर पळता भुई थोडी करता येते. त्यासाठी युरी आलेमाव, विजय सरदेसाई, आरजीचे वीरेश बोरकर, आपचे वेंझी तसेच सिल्वा अशा आमदारांनी व्यूहरचना करावी लागेल.

विरोधी पक्षनेते युरी आणि गोवा फॉरवर्डचे आक्रमक आमदार सरदेसाई या दोघांनी ठरवले तर भाजप सरकारच्या गैरकारभाराची लक्तरे वेशीवर टांगता येतील. विषय अनेक आहेत. काही मंत्री आणि काही महामंडळांचे चेअरमन यांच्या भानगडी खूप आहेत. फक्त त्याविषयी विरोधी आमदारांनी आवाज उठविण्याचे धाडसच दाखवायला हवे. फ्लोअर मॅनेजमेण्ट नीट झाले तर सरकारची कोंडी करता येईल. विरोधात सध्या सात आमदार आहेत. विद्यमान सरकारने यापूर्वी प्रचंड उधळपट्टी केलेली आहे. सरकारी तिजोरीत पैसा नाही. मात्र शेकडो कोटींची कर्जे काढून फक्त इव्हेंटस करण्यात आले आहेत. प्रत्येक फेस्टिव्हलवर मंत्र्यांनी खूप खर्च केला आहे. ठरावीक कंत्राटदार, पुरवठादार आणि इव्हेंट मॅनेजमेण्ट कंपन्यांनी चांदी केली आहे.

मंत्रालयाचे नूतनीकरण, मंत्र्यांचे बंगले सजविणे, गाड्यांची खरेदी यासाठी झालेला खर्च कमी नाही. आमदारांना दोन दिवस प्रशिक्षण देण्यावर २७ लाख खर्च केले गेले. रोजगार मेळावा आयोजित करण्यावर अनेक कोटींचा चुराडा केला गेला. पन्नास कोटी रुपये खर्च करून कला अकादमीचे नूतनीकरण करण्यात आले. ती अकादमी अजून लोकांसाठी खुली होत नाही. गेल्या दोन वर्षांत भूरुपांतरणे प्रचंड झाली आहेत. स्मार्ट सिटीच्या नावाखाली पणजीवर उभे आडवे अत्याचार केले गेले. पाचशे कोटी रुपये कुठे गेले ते कुणालाच कळत नाही. खुद्द पणजीचे आमदार व मंत्री बाबूश मोन्सेरात म्हणतात की स्मार्ट सिटी मिशन अंतर्गत निकृष्ट दर्जाची कामे झाली आहेत. अशावेळी सातही विरोधी आमदार संघटित होऊन सरकारला धारेवर धरू शकतात. गोव्याची जनता सध्या तोंड बंद ठेवून सरकारचा मार मुकाट्याने सहन करत आहे. पणजी शहराची दैना आणि सरकारची उधळपट्टी जनता पाहते आहे. लोक आवाज उठविण्यास घाबरतात. अशावेळी विरोधी आमदारांना सभागृहात जनतेचा आवाज बनण्याची संधी आहे.

युरी अभ्यासू आहेत. विजय धाडसी आहेत. वीरेश बोरकर यांना गरीब लोकांविषयी कळवळा आहे. कॅप्टन वेन्झी यांच्याकडे प्रश्न उपस्थित करण्याचे कौशल्य आहे आणि आमदार कार्लुस फेरेरा यांना कायद्याचे चांगले ज्ञान आहे. सरकार घिसाडघाईत काही विधेयके संमत करण्याचा प्रयत्न या अधिवेशनातही करणार आहे. त्यावेळी कार्लुससह सर्व विरोधी आमदारांची कसोटी लागेल.

एकेकाळी गोवा विधानसभेतच पूर्वीचे विरोधी आमदार जनतेचे विषय हाती घेऊन सरकारला एक्सपोज करत असत. तसा मोठा इतिहास विधानसभेला आहे. जॅक सिक्वेरा, बाबू नायक, विली डिसोझा, रमाकांत खलप, डॉ. काशिनाथ जल्मी, मनोहर पर्रीकर अशा विविध नेत्यांनी पूर्वी अभ्यासपूर्ण भाषणांनी अधिवेशने गाजवलेली आहेत. विद्यमान सावंत सरकार तर यापूर्वी सात दिवसांचे देखील अधिवेशन घेण्यास घाबरत असे. सरकारने आतापर्यंत गैरव्यवहार खूप लपवला. 

स्वातंत्र्य सैनिकांच्या त्यागाचा इतिहास असलेल्या आग्वाद किल्ल्यावर देखील हे सरकार दारू दुकान सुरू करण्यास परवाना देते. लोकांना लाडली लक्ष्मी, सामाजिक सुरक्षा, गृह आधार अशा योजनांखाली महिला व ज्येष्ठ नागरिकांना हे सत्ताधारी नियमितपणे अर्थसाह्य देण्यास अपयशी ठरते. पावसाळ्यातही बार्देश व सत्तरीत नळ कोरडे पडतात. वीज वारंवार खंडित होते. वीज बिलांचा भार वाढतोय. लोकांच्या जमिनी ताब्यात घेऊन त्यात प्रकल्प लादले जात आहेत. सरकारी नोकरी आज देखील विकली जात आहे. अशावेळी सुटाबुटात फिरणाऱ्या या सरकारला व मंत्र्यांना विरोधी आमदारांनी अधिवेशनात योग्य जाब विचारावा. तसे झाले तरच अधिवेशन सत्कारणी लागले असे म्हणता येईल.

 

टॅग्स :goaगोवाvidhan sabhaविधानसभा