शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local News BREAKING: हार्बर रेल्वे ठप्प! सीएसएमटी स्थानकाजवळ लोकलचा डबा घसरला, प्रवाशांची तारांबळ
2
'देवेंद्र फडणवीसांना खोटं बोलण्यात गोल्ड मेडेल मिळेल'; रोहित पवारांचा खोचक टोला
3
नारायण राणे जिंकले नाहीत तर प्रचार कायमचा सोडणार; कट्टर राणे समर्थकाने घेतली शपथ, केला मताधिक्याचा दावा
4
चिंताजनक! जास्त मीठ खाणं ठरू शकतं मृत्यूचं कारण; वेळीच व्हा सावध, धडकी भरवणारा रिपोर्ट
5
"काँग्रेसनं नसीम खान यांना उमेदवारी दिल्यास पूर्ण ताकदीनं त्यांना निवडून आणू"
6
“नरेंद्र मोदी अन् अमित शाहांना महाराष्ट्राचे तुकडे करायचेत”; संजय राऊतांचा दावा
7
T20 World Cup साठी न्यूझीलंडचा संघ जाहीर; अनोख्या पद्धतीने घोषणा, नव्या जर्सीत किवी संघ
8
Fact Check : पंजाबमध्ये भाजपाच्या विरोधात लोकांनी झेंडे जाळल्याचा Video दिशाभूल करणारा; हे आहे 'सत्य'
9
नोकरीच्या शोधात फिरणारी युवती अचानक बनली कोट्यधीश; ८ वर्षापूर्वी नेमकं काय घडलं?
10
Digvijaya Singh : "तुम्हाला निराश करणार नाही, ही माझी शेवटची..."; दिग्विजय सिंह निवडणूक लढवणार नाहीत?
11
बापरे! चौथ्या मजल्यावरून खाली पडलं 7 महिन्यांचं बाळ; काळजाचा ठोका चुकवणारा Video
12
'एकट्यात बोलवून साडीची पिन काढायचे अन्...'; प्रज्वल रेवन्नांविरोधात महिलेची पोलिसांत तक्रार
13
प्रियकरासोबत मिळून केली पतीची हत्या, मग पोलिसांत दिली बेपत्ता असल्याची तक्रार, पण असं फुटलं बिंग
14
...तेव्हा राज ठाकरेंवर प्राणघातक हल्ला करण्याचा प्लॅन रचला होता; मनसे नेत्याचा मोठा दावा
15
गुरुचे राशीपरिवर्तन: मेष ते मीन राशींवर कसा असेल प्रभाव? तुमची रास कोणती? लाभ की ताप? पाहा
16
भारत दौरा टाळून एलॉन मस्क पोहोचले थेट चीनमध्ये, चिनी पंतप्रधानांच्या भेटीनंतर दिले सूचक संकेत
17
उद्धवसेना, शिंदेसेना मुंबईत आज आमनेसामने! भव्य रॅलीत CM शिंदे vs आदित्य ठाकरे येणार, मोठा फौजफाटा
18
रत्नागिरीच्या सभेत मनसेची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका; "ज्यांनी आयुष्यभर दुसऱ्याचं..."
19
...अन् नम्रता संभेरावला पाहून बोमन इराणींनी चक्क त्यांची BMW थांबवली, अभिनेत्रीने सांगितला किस्सा
20
'ये रिश्ता क्या कहलाता है' मधून हिना खानला काढण्यात आलं होतं, शिवांगी जोशी ठरली कारण?

म्हापसा : बार्देशात काँग्रेस पक्षाची पुर्नबांधणी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2019 6:28 PM

राज्यात पुन्हा सत्ता मिळवण्यासाठी बार्देस तालुक्याचे महत्त्व काँग्रेस पक्षाने ओळखल्याने तालुक्यातून गमावलेले वर्चस्व पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी काँग्रेस पक्षाने जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत. पक्षाला तालुक्यातून मजबूती देण्याचे तसेच पक्षबांधणीचे काम सध्या पक्षाकडून सुरू करण्यात आले आहे.

म्हापसा : राज्यात पुन्हा सत्ता मिळवण्यासाठी बार्देस तालुक्याचे महत्त्व काँग्रेस पक्षाने ओळखल्याने तालुक्यातून गमावलेले वर्चस्व पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी काँग्रेस पक्षाने जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत. पक्षाला तालुक्यातून मजबूती देण्याचे तसेच पक्षबांधणीचे काम सध्या पक्षाकडून सुरू करण्यात आले आहे. या कामाचा एक भाग म्हणून काही नेते पक्षात प्रवेश करण्याच्या मार्गावर असून काही नेत्यांना पक्षात आणण्यासाठी हालचालीसुद्धा सुरू करण्यात आल्या आहेत. काँग्रेसच्या या हालचालींचे परिणाम येत्या लोकसभा निवडणुकीत भाजपावर होण्याची संभावना निर्माण झाली आहे. 

राज्यातील मतदारसंघाची फेररचना होण्यापूर्वी 2007 सालच्या निवडणुकीत तालुक्यातील मतदारसंघाची संख्या एकूण सहा होती. त्यातील प्रत्येकी तीन मतदारसंघाची विभागणी समानरित्या काँग्रेस पक्षात आणि भाजपात झाली होती. फेररचनेनंतर 2012 सालच्या विधानसभा  निवडणुकीवेळी तालुक्यातील मतदारसंघांची संख्या सहा वरुन सात करण्यात आलेली. त्यावेळी झालेल्या निवडणुकीत तालुक्यातून काँग्रेस पक्षाचा पूर्णपणे सफाया झाला होता. राज्यात झालेल्या परिवर्तन लाटेतून काँग्रेसचे आमदार पराभूत झाले होते. सहा मतदारसंघात भाजपाला मतदारांनी साथ दिली होती तर पर्वरी हा एक मतदारसंघ अपक्ष आमदाराच्या ताब्यात गेला होता. तालुक्यातून काँग्रेसचे बालेकिल्ले समजल्या जाणा-या मतदार संघातून काँग्रेसचे सर्व तीनही आमदार पराभूत झाले होते. पक्षाची पूर्णपणे पिछेहाट झाली होती. 

या परिस्थितीतून मार्ग काढीत वाटचाल करणा-या काँग्रेस पक्षाने 2012 सालच्या निवडणुकीनंतर पक्षाला पुन्हा उभारी देण्याचे बरेच प्रयत्न केले; पण म्हणावे तसे यश या पक्षाला लाभू शकले नाही. 2017 च्या निवडणुकीत मतदारांनी तालुक्यातून भाजपा विरोधात कौल दिला असला तरी हा कौल काँग्रेस पक्षाच्या बाजूने नव्हता. सात मतदारसंघातून पक्षाचा फक्त एकच आमदार नीळकंठ हळर्णकरच्या रुपाने थिवी मतदारसंघातून निवडून आला होता. इतर सर्व मतदारसंघातून त्यांचे उमेदवार पराभूत झाले होते. तालुक्याचे नेतृत्व करणारा म्हणावा तसा नेता या पक्षाजवळ नसल्याने पक्षाला परिणामाला सामोरे जावे लागले होते. 

मागील दोन निवडणुकीतून उद्भवलेल्या परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी पक्षात पुन्हा नवसंजीवनी उपलब्ध करुन देण्यासाठी प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांच्या नेतृत्वाखाली सध्या जोरदार हालचाली सुरु झालेल्या आहेत. त्याचाच एक भाग म्हणून काही नेत्यांना पुन्हा काँग्रेस पक्षात प्रवेश दिला जात असून पुढील काही दिवसात आणखीन काही नेते तालुक्यातून या पक्षात पक्षात प्रवेश करण्याच्या मार्गावर आहेत. 

एकेकाळी काँग्रेस पक्षात असलेले व नंतर हा पक्ष सोडून गेलेले ट्रोजन डिमेलो यांना काँग्रेस पक्षात पुन्हा समाविष्ठ करुन घेण्यात आले आहे. राज्यातील राजकारणात एकेकाळी आपले वर्चस्व गाजवणारे तसेच तालुक्यातील काही मतदारसंघावर अद्यापही प्रभाव असलेले माजी उपमुख्यमंत्री अ‍ॅड. दयानंद नार्वेकर हे सुद्धा काँग्रेस पक्षात पुन्हा प्रवेश करण्याच्या मार्गावर आहेत. या दोन नेत्यानंतर इतर काही नेते सुद्धा काँग्रेसीत प्रवेश करण्याच्या मार्गावर असून त्यांच्या प्रवेशानंतर पक्षात पुन्हा नवचैतन्य निर्माण होण्याची संभावना व्यक्त केली जात आहे. काँग्रेस पक्षाकडून सुरु करण्यात आलेल्या या हालचालींचा निश्चितपणे येत्या लोकसभा निवडणुकीत भाजपावर होण्याची शक्यता आहे. भाजपा विरोधात असलेल्या सर्व नेत्यांचे काँग्रेस पक्षात स्वागत असल्याची प्रतिक्रिया प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी व्यक्त केली आहे. 

टॅग्स :goaगोवाcongressकाँग्रेस