शहरं
Join us  
Trending Stories
1
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदान पाहून नेत्यांचं वाढलं टेन्शन; सभांना होते गर्दी, मात्र मत देताना लोकांचा हात आखडता
2
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
3
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
4
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
5
ऐन निवडणुकीत बाजारातील पैसा गायब; अंगडियाचे दर भडकले !
6
पूनम महाजन यांना डावलून निकमांना संधी; मुंबई उत्तर-मध्य मतदारसंघात चुरस वाढली
7
लढाई हट्टाची आणि अस्तित्वाची, नेत्यांची कसोटी; 'एकास एक' लढतीचे प्रयत्न फसले
8
अब की बार, देश में जनता की सरकार; महाराष्ट्रात करोडो रुपयांना आमदारांची खरेदी, पक्षांतराचा पायंडा पाडला : प्रियंका गांधी
9
काँग्रेसची सत्ता आली तर ओबींसीचे आरक्षण धर्माच्या नावावर वाटणार : पंतप्रधान मोदी
10
राज्यात सात खासदारांची तिकिटे भाजपने कापली; राजधानी मुंबईतील तिघांनाही बसविले घरी
11
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
12
या झोपडीत राहतो लोकसभेचा उमेदवार, रावेरमधून लढणार; लोकांनी वर्गणी काढून भरले डिपॉझिट
13
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
14
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
15
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
16
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
17
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
18
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
19
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
20
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले

प्रशासन सक्रिय करण्यास प्राधान्य, म्हादई व खाण प्रश्न हाताळूच : मुख्यमंत्री

By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2019 8:37 PM

खाणींचा प्रश्न लवकरच केंद्राकडे नेणार असल्याची मुख्यमंत्र्यांची माहिती

पणजी : निवडणूक आचारसंहिता आता उठलेली असल्याने राज्य प्रशासन सक्रिय करण्यासाठी आपण प्राधान्य देईन. तसेच म्हादई पाणी प्रश्न व राज्याचा खनिज खाणप्रश्न आपण प्राधान्याने हाताळीन, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी स्पष्ट केले.चौघा नव्या आमदारांच्या शपथविधी सोहळ्य़ानंतर पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, की निवडणूक आचारसंहितेच्या काळात काही प्रकल्प अडकले. काही कामे प्रलंबित राहिली. ती मार्गी लावली जातील. प्रशासनाची घडी मला नीट करायची आहे. शिवाय म्हादई पाणीप्रश्न व खनिज प्रश्नही सोडवायचा आहे. खनिज खाणी लवकर सुरू करण्यासाठी प्राधान्य आहे. आपण अजून हा विषय नव्याने केंद्र सरकारकडे मांडला नाही, कारण केंद्रातील नवे सरकार स्थिरस्थावर होऊ द्या. खाण मंत्रालय सांभाळणारे नवे मंत्री कोण तेही स्पष्ट होऊ द्या. मग मी केंद्राकडे गोव्याचा प्रस्ताव घेऊन जाईन.मंत्र्यांना अतिरिक्त खाती लवकर देणार काय असे विचारले असता, मुख्यमंत्री म्हणाले, की अगोदर आपण सर्व मंत्र्यांशी चर्चा करीन. त्यांची काय अपेक्षा आहे हे जाणून घेईन. त्यांना कोणते खाते हाताळणो जास्त आवडेल हे मी विचारून घेईन. तसेच आमदारांशी महामंडळांच्या विषयाबाबत बोलेन व मग पाऊले उचलीन. सध्या मंत्रिमंडळाची फेररचना करण्याचा मात्र निर्णय झालेला नाही. येत्या 4 रोजी मंत्रिमंडळाची पहिली बैठक घेण्याचा विचार आहे.4 जून रोजी अधिवेशनसभापतींची निवड करण्यासाठी 4 जून रोजी विधानसभा अधिवेशन बोलविण्याचा विचार आहे. तारीख अजून निश्चित झालेली नाही. मंत्री विजय सरदेसाई व अपक्षांशी बोलून मी तारीख निश्चित करीन, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. हंगामी सभापती मायकल लोबो यांनी मात्र येत्या 4 रोजी विधानसभा अधिवेशन होईल, असे पत्रकारांना सांगितले. अनेक दिवसांचे मोठे पावसाळी अधिवेशन जुलै महिन्याच्या दुस:या किंवा तिस:या आठवडय़ात बोलविले जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले.दरम्यान, आपल्या नेतृत्वाखालील आघाडी सरकार तीन वर्षाचा उर्वरित काळ पूर्ण करील. आमचे सरकार भक्कम आहे, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. मंत्रिमंडळातून कुणाला वगळण्याचा वगैरे निर्णय नाही. सत्ताधारी आघाडीतील सहकारी पक्ष व अपक्षांना सोबत घेऊन आपण पुढे जाईन. मगोपचे आमदार सुदिन ढवळीकर यांनी सरकारला पूर्वी दिलेले पाठींब्याचे पत्र मागे घेतले की नाही ते मला ठाऊक नाही. त्यांनी जर पाठींबा मागे घेतला नाही तरी, आमची हरकत नसेल. उद्या चर्चिल आलेमाव यांनी जरी आमच्या सरकारला पाठींबा दिला तरी, आम्ही त्या पाठींब्याचे स्वागत करू. आलेमाव पाठींबा देतो असे अनेकदा सांगतात पण त्याविषयीचे पत्र मात्र देत नाहीत, असे मुख्यमंत्री म्हणाले.

टॅग्स :Pramod Sawantप्रमोद सावंतgoaगोवा