शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ज्या मतदारसंघाने संकटकाळात आसरा दिला, राहुल गांधी तीच सीट सोडणार; प्रियंका गांधी वायनाड लढणार
2
T20 World Cup 2026 साठी १२ संघ ठरले पात्र, पाकिस्तानलाही मिळाली संधी; पण, कशी?
3
रिल्सच्या नादात तरुणीचा जीव गेला, रिव्हर्समध्ये कार डोंगरावरून दरीत कोसळून भीषण अपघात
4
मोहन भागवतांच्या मणिपूरवरील वक्तव्यानंतर अमित शाह अॅक्टिव्ह, बोलावली उच्चस्तरीय बैठक...
5
"गॅरी, पाकिस्तानसोबत वेळ वाया घालवू नकोस, टीम इंडियाला कोच करण्यासाठी ये!" 
6
६ चौकार, १८ षटकार! ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये २७ चेंडूंत ठोकले शतक, मोडला ख्रिस गेलचा वर्ल्ड रेकॉर्ड
7
एसयुव्हींमधला डार्क हॉर्स! MG Gloster Black Storm सोबत ४०२ किमी सवारी; खऱ्या खुऱ्या SUVचे मायलेज किती असेल...
8
'स्वतःच्या प्रमोशनसाठी रेल्वेचा वापर', मल्लिकार्जुन खरगेंचा मोदी सरकारवर आरोप
9
मुंबईत रस्त्यावरील चायनीज स्टॉल्सवर बंदी, विशेष पथकांची नियुक्ती; उद्यापासून तपासणी
10
गौतम गंभीरचा 'माणूस' टीम इंडियाचा फिल्डींग कोच होणार, रवी शास्त्रींनी या नावावर मारलेली फुली
11
Air India च्या विमानात मोठी चूक; प्रवाशाच्या अन्नात आढळला ब्लेडचा तुकडा...
12
सर्वात महाग शहर! १ BHK चं भाडं ४ लाख, हेअरकट ५०००; घरकाम करणाऱ्याला ५० हजार पगार
13
T20 वर्ल्ड कप सुरु असताना गौतम गंभीरने घेतली केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट
14
टीम इंडियासमोरील तिसरा प्रतिस्पर्धी निश्चित झाला, पाहा Super 8 सामन्याचं अपडेट वेळापत्रक 
15
"बाथरुममध्ये जाऊन संभाषण, ६५० मतांचा फरक अन्..."; रिटर्निंग ऑफिसरवर अनिल परबांचे गंभीर आरोप
16
भाजपने सुरू केली विधानसभेची तयारी; महाराष्ट्रासह या चार राज्यांत प्रभारी आणि सहप्रभारी नेमले
17
रिझर्व्ह बँकेनं 'या' बँकेचा लायसन्स केला रद्द; सेंट्रल बँक ऑफ इंडियालाही १.४५ कोटींचा दंड
18
मध्यरात्री गर्लफ्रेंडला भेटण्यासाठी युवक घरी पोहचला; किचनमध्ये आढळला दोघांचा मृतदेह
19
"लोक मदतीसाठी ओरडत होते, हा एक भयंकर क्षण..."; प्रवाशाने सांगितलं नेमकं काय घडलं?
20
याला संघ म्हणावे तरी कसे? पाकिस्तान संघाबाबत कोच गॅरी कर्स्टन यांचे धक्कादायक विधान

Maharashtra Political Crisis: "उद्धव ठाकरेंबद्दल आदर पण शेवटपर्यंत त्यांनी काँग्रेस-NCP ची साथ सोडली नाही"

By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2022 1:11 PM

महाराष्ट्रात जी आघाडी काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत झाली त्यांच्यााविरोधात हे सगळं करण्यात आले असा दावा शिंदे गटाचे आमदार दीपक केसरकर यांनी केला.

गोवा - काँग्रेस-राष्ट्रवादीने शिवसेना उमेदवारासमोर पराभूत झालेल्या नेत्यांना ताकद देण्याचा प्रयत्न केला. आम्ही पक्षप्रमुखांना या तक्रारी मांडल्या. राज्यसभेचा शिवसेनेचा उमेदवार पडला. महाविकास आघाडीत राहून आमचा काय उपयोग होता? सर्वसामान्य शिवसैनिकाला राज्यसभेवर पाठवणार असं उद्धव ठाकरेंनी सांगितले. मग नेमंक काय झाले याची विचारणा पक्षप्रमुखांनी करायला हवी होती. उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिल्यानंतर कुठलेही सेलिब्रेशन आमच्या आमदारांनी केले नाही. आम्ही अजूनही शिवसेनेतच आहोत असं शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी म्हटलं आहे. 

आमदार दीपक केसरकर म्हणाले की, महाराष्ट्रात जी आघाडी काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत झाली त्यांच्यााविरोधात हे सगळं करण्यात आले. उद्धव ठाकरेंचे मन दुखवावे, अपमान व्हावा असा कुठलाही हेतू नव्हता. काँग्रेस-राष्ट्रवादीशी लढताना स्वकीयांशीही लढावं लागले. आम्ही दीड वर्ष झाले आपली नैसर्गिक युती आहे. ज्यांच्यासोबत आपण निवडणूक लढलो त्यासोबत आपण राहावं ही आमची भूमिका होती. वेळोवेळी आमदारांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न केला गेला. संभ्रमावस्था निर्माण होईल अशी वक्तव्ये, बातम्या पसरवल्या गेल्या असं त्यांनी सांगितले. 

तसेच आमदार एकनाथ शिंदे मुंबईच्या दिशेने रवाना झालेत. मंत्रिमंडळाबाबत कुठलीही चर्चा झाली नाही. भाजपा हा राष्ट्रीय पक्ष आहे. त्यामुळे घाईघाईने निर्णय घेतले जात नाहीत. आमदारांमध्ये चलबिचल होईल यासाठी मंत्रिमंडळाची संभाव्य यादी पसरवली गेली. उद्धव ठाकरे आमचे नेते आहेत. आम्ही अजूनही शिवसेनेत आहोत. आमच्या नेत्याशी आम्हाला अप्रत्यक्ष लढावं लागलं. आमची भूमिका विचारात न घेतल्याने हा संघर्ष निर्माण झाला. भाजपासोबत आमची मंत्रिमंडळाबाबत कुठलीही चर्चा नाही. एकही आमदार मंत्रिपदाच्या आशेने आले नाहीत. जे आलेत त्यातील ६ विद्यमान मंत्री होते. बाळासाहेबांचा विचार, हिंदुत्वाचा विचार होता तो पुढे घेऊन जाण्यासाठी ते यात सहभागी झाले असल्याचं दीपक केसरकर म्हणाले. 

कुणीही वाईट वाटून घेऊ नये कार्यकर्त्यांना आमच्या मागे लावले गेले. वाहनं आमची पाठलाग करत होते. त्यामुळे नेते दुखावले गेले. शिवसेनेत ठाकरे कुटुंबावर कुणाचा विरोध नाही. आमचा विधिमंडळ पक्ष आहे. या विधिमंडळ पक्षाला मान्यता आहे. १४ आमदारांच्या सहाय्याने ४० जणांनी निवडलेल्या नेत्याला काढून टाकण्यात आले. आम्ही शेवटपर्यंत उद्धव ठाकरेंना विनंती करत होतो. महाविकास आघाडीशी साथ सोडा असं पत्र दिले. परंतु शेवटपर्यंत मविआची साथ सोडली नाही. आदर, विश्वास, प्रेम प्रत्येक आमदारांना उद्धव ठाकरेंबद्दल आहे. आम्ही मुदत दिली होती त्यानंतर हे पाऊल उचललं आहे. कुणीही वाईट वाटून घेऊ नये असं केसरकरांनी म्हटलं.   

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाMaharashtra Political Crisisमहाराष्ट्राचे राजकीय अस्थिरतेचा गोंधळUddhav Thackerayउद्धव ठाकरेBJPभाजपा