शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षाचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
2
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
3
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
4
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
5
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
6
मित्रपक्षांमुळे भाजपला ‘४०० पार’ची चिंता; सर्वाधिक काळजी महाराष्ट्रात
7
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
8
संपादकीय: झपाटलेल्या झुंडीचे बळी
9
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
10
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
11
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
12
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
13
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
14
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
15
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
16
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
17
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
18
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
19
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
20
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा

‘आयएनएसव्ही तारीणी’ सोमवारी गोव्यात 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2018 9:34 PM

गोव्याहून गेल्या सप्टेंबरमध्ये निघालेली सहा महिला नौदल अधिका-यांचा समावेश असलेली ‘आयएनएसव्ही तारीणी’ही शिडाची बोट जगभ्रमंती करुन येत्या सोमवारी २१ रोजी गोव्यात परतणार आहे.  

पणजी : गोव्याहून गेल्या सप्टेंबरमध्ये निघालेली सहा महिला नौदल अधिका-यांचा समावेश असलेली ‘आयएनएसव्ही तारीणी’ही शिडाची बोट जगभ्रमंती करुन येत्या सोमवारी २१ रोजी गोव्यात परतणार आहे.  स्वदेशी बनावटीच्या छोट्याशा शिडाच्या बोटीवर स्वार होऊन नौदलाच्या महिला अधिकारी ‘नाविका सागर परिक्रमा’ अंतर्गत गेल्या १0 सप्टेंबर रोजी जग भ्रमंतीसाठी निघाल्या आहेत.

भारतीय समुद्र हद्दीत ही बोट आलेली असून गोव्यापासून सुमारे ३२0 सागरी मैल अंतरावर आहे. वारा नसतानाही बोटीने १२ तासात २0 सागरी मैल अंतर पार केल्याचे आढळून आले आहे. सोमवारपर्यंत ही बोट गोव्यात पोचेल, असे नौदलाचे प्रवक्ते कॅप्टन डी. के. शर्मा यांनी सांगितले. 

दक्षिण आफ्रिकेतील केप टाऊन हे या भ्रमंतीतील अखेरचे बंदर घेतल्यानंतर मार्चमध्ये ही बोट परतीच्या प्रवासाला निघाली. या प्रवासात महिला नौदल अधिकारी २१,६00 सागरी मैल अंतर पार करणार आहेत. आशियातील महिलांचा समुद्री मार्गाने पृथ्वी परिक्रमा करण्याची ही पहिलाच प्रयत्न असून यासाठी गेल्या दोन वर्षांपासून तयारी चालू होती. महिला अधिकाºयांच्या या चमूमध्ये लेफ्टनंट कमांडर वर्तिका जोशी, लेफ्टनंट कमांडर प्रतिभा जामवाल, लेफ्टनंट कमांडर पद्रपल्ली स्वाती, लेफ्टनंट ऐश्वर्या बोध्दापती, लेफ्टनंट शोरगप्पन् विजया, लेफ्टनंट पायल गुप्ता यांचा समावेश आहे. 

या महिला अधिकाºयांना वाटेत अनेकदा खराब हवामानाला तोंड द्यावे लागले. ७ मिटरपर्यंत उंचीच्या लाटा तसेच ताशी ६0 किलोमिटर वाºयाच्या प्रचंड वेगाचाही सामना करावा लागला. आॅस्ट्रेलिया, न्युुझिलॅण्ड, फॉकलँड आणि दक्षिण आफ्रि केत मिळून चार बंदरांवर या बोटीने थांबे घेतले. ही बोट ५५ फूट लांबीची असून गोव्यातच अ‍ॅक्वारिस शिपयार्डने ती बांधली आहे.समुद्रातील जैव विविधता, पर्यावरण याचा या अधिकाºयांनी अनुभव घेतला.