शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

विमान दुर्घटनेनंतर गोव्यातील जुन्या आठवणी पुन्हा ताज्या झाल्या!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2019 18:23 IST

मे २००१ मध्ये नौदलाचे ‘सी हॅरीयर’ विमान काणकोण भागात कोसळण्याची घटना घडली होती.

- पंकज शेट्ये

वास्को: शनिवारी (दि. १६) दुपारी भारतीय नौदलाचे ‘मिग २९के’ विमान गोव्यात कोसळण्याची घटना घडली असून सुदैवाने यात कुठली जीवितहानी झाली नाही. नौदलाचे लढाऊ अथवा इतर विमान कोसळण्याची घटना गोवेकरांसाठी नवीन नसून यापूर्वीही अशा घटना घडल्या आहेत. 

२००२ मध्ये नौदलाच्या एका समारंभानिमित्ताने उड्डाण घेतलेल्या नौदलाची ‘इल्युजन ३८ ’ नावाची दोन विमाने एकमेकांना धडकून झालेल्या घटनेत १५ जणांना जीव गमवावा लागला होता. यात १२ नौदलाचे अधिकारी होते तर ३ अन्य नागरिक होते. या घटनेची आठवण सुद्धा झाल्यास भीतीने अंगावर काटा येण्याचा प्रसंग निर्माण होतो. या दोन विमानांपैकी एक विमान ‘एमईएम कॉलेज’जवळ एका बंगल्याच्या बांधकामाच्या ठिकाणी कोसळले होते तर दुसरे विमान जवळच्याच अन्य एका भागात कोसळले. 

ऑक्टोबर २०१२ मध्ये नौदलाचे चेतक हॅलिकॉप्टर दाबोळी विमानतळाच्या धावपट्टीवर उतरण्याच्या प्रयत्नात असताना कोसळल्याने ह्या घटनेत तिघा जणांना आपला जीव गमवावा लागला होता. सदर घटनेत मरण पोचलेल्या तिघांपैकी दोघेजण नौदलाचे तरुण वैमानिक होते तर एक नौदलाचा तांत्रिक विभागातील कर्मचारी होता. ही दुर्घटना तांत्रिक बिघाडामुळे घडली होती अशी त्यावेळी चर्चा होती. 

मे २००१ मध्ये नौदलाचे ‘सी हॅरीयर’ विमान काणकोण भागात कोसळण्याची घटना घडली होती. सदर घटनेत सुदैवाने विमानाचा वैमानिक बचावला होता. एप्रिल २००७ सालात दाबोळी धावपट्टीवरून ‘सी हॅरीयर’ विमानाने उड्डाण घेतल्यानंतर काही क्षणातच हे विमान समुद्रात जाऊन कोसळले. ही घटना घडण्याच्या वेळी यात असलेल्या दोन्ही वैमानिकांचा वेळ चांगला असल्याने ते या दुर्घटनेतून सुखरूप बचावले होते. 

जानेवारी २०१८ सालात दाबोळीच्या धावपट्टीवरून उड्डाण घेण्याच्या प्रयत्नात असलेले ‘मीग २९के’ विमान उड्डाणपट्टी पासून २०० मीटर अंतरावर पुढे जाऊन कोसळले. दुर्घटना घडत असल्याचे वैमानिकाला समजताच तो वेळेवरच बाहेर आल्याने सदर दुर्घटनेतून त्याला त्याचे प्राण वाचवण्यास यश प्राप्त झाले. 

गोव्यात भारतीय नौदलाची विमाने कोसळण्याची मागील वर्षात १० हून अधिक घटना घडलेल्या असल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे. १९८८ मध्ये गोव्यात नौदलाचे पहिले विमान कोसळण्याची घटना घडल्याचे मानले जाते. ह्या वर्षाच्या मे महिन्यात गोव्यानजीक नौदलाचे ‘सी हॅरीयर’ विमान कोसळून सदर घटनेत विमानातील वैमानिकाचा मृत्यू झाला होता.

टॅग्स :goaगोवा