शहरं
Join us  
Trending Stories
1
धनत्रयोदशीला एकट्या मारुतीने विकल्या ५०००० गाड्या, बुकिंगचा आकडा बघाल तर...; आजही मुहूर्त सुरूच...
2
'हा' काय घोळ? पश्चिम बंगालच्या डॉक्टर कुटुंबाचे नाव थेट बांगलादेशच्या मतदार यादीत!
3
Kritika Reddy : डॉक्टर कपल, कोट्यवधींचं घर अन् रहस्यमयी मृत्यू...; ६ महिन्यांनी 'परफेक्ट मर्डरचा' पर्दाफाश
4
खळबळजनक! भावाची किडनी फेल, बहीण बनली चोर; नवऱ्याच्या घरात मारला ३० लाखांचा डल्ला
5
आई-वडिलांची उपेक्षा केल्यास पगारातून १५% रक्कम थेट त्यांच्या खात्यात जमा होणार, 'हे' राज्य आणणार कायदा
6
रॉकेट सायन्स...! इतर सर्व फटाके जमिनीवरच फुटतात...मग रॉकेटच का जाते आकाशात? विचार करा, मुलांनाही सांगा...
7
IND vs AUS 1st ODI : किंग कोहलीच्या पदरी 'भोपळा'; ऑस्ट्रेलियातील मैदानात पहिल्यांदाच आली अशी वेळ!
8
‘धन’त्रयोदशीला ग्राहकांचा २४ कॅरेट उत्साह; सोने ३ हजार, तर चांदी ७ हजार रुपयांनी स्वस्त
9
IND vs AUS 1st ODI : हिटमॅन रोहितनं मैदानात उतरत इतिहास रचला; पण हेजलवूडनं 'जोश' दाखवला अन्...
10
नाशिकजवळ धावत्या एक्स्प्रेसमधून तिघे फेकले गेले, दोघांचा मृत्यू; अपघातग्रस्त प्रवाशांची ओळख पटेना
11
IND vs AUS 1st ODI : गिलच्या कॅप्टन्सीत या युवा क्रिकेटरला पहिली संधी; रोहितनं दिली वनडे डेब्यू कॅप
12
क्रिकेटपटूंचा जीव घेतल्यानंतर पाकिस्तानचा अफगाणिस्तानसोबत युद्धविराम; या दोन देशांची मध्यस्थी...
13
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुबत्ता, नवीन नोकरीची संधी, शासकीय लाभ; दिवाळीत हाती पैसा!
14
आजचे राशीभविष्य १९ ऑक्टोबर २०२५ : ९ राशींसाठी आजचा दिवस फलदायी, धनलाभ होणारा...
15
३३ लाख शेतकऱ्यांच्या थेट खात्यात ३,२५८ कोटी; पॅकेज मदतनिधी मंजुरी, आतापर्यंत ७,५०० कोटींची मदत
16
‘कदम यांचे वय ११७ नव्हे ५४ वर्षे’ विरोधकांचे आरोप आयोगाने फेटाळले; आक्षेप-वस्तुस्थिती काय?
17
बिहार निवडणुकीत PM मोदींची तब्बल १२ सभांची तयारी; राहुल गांधींच्या एकाही सभेचे नियोजन नाही
18
महाआघाडी जागा वाटपाचा घोळ मिटेना; अर्ज भरण्याची मुदत संपली, चर्चेचे गुऱ्हाळ अद्याप सुरूच
19
बिहारमध्ये राजदचा पुन्हा ‘जंगलराज’ आणायचा प्रयत्न; अमित शाह यांची टीका, NDA विजयाचा विश्वास
20
दोन लाखांवर मजुरांची दिवाळी अंधारातच! मनरेगाची १७० कोटी रक्कम चार महिन्यांपासून थकीत

रेल्वेची दुहेरी ट्रॅकिंग योजना कोळसा वाहतुकीसाठीच; विरोधकांची राज्य सरकारवर जोरदार टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2025 07:32 IST

केंद्र सरकारने वस्तूस्थिती मान्य केल्याचा विरोधी पक्षनेते युरी आलेमाव, आमदार विजय सरदेसाई यांचा दावा

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी :रेल्वे मंत्रालयाने कर्नाटकातील होस्पेट ते तिनाईघाट अशा ३१२ किमीचा मार्गाचे काम पूर्ण झाल्याची घोषणा रेल्वे मंत्रालयाने केली आहे. हा मार्ग गोव्यात वास्कोपर्यंत विस्तारणाऱ्या ३६३ किमीच्या मोठ्या प्रकल्पाचा भाग आहे. होस्पेट-वास्को मार्गाच्या दुहेरी ट्रॅकिंगमुळे कोळसा, लोहखनिज आणि स्टीलसारख्या जीवनावश्यक वस्तूंच्या वाहतुकीला लक्षणीयरीत्या गती मिळेल अशी अपेक्षा आहे असे रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. 

रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी म्हटले आहे की, डबल ट्रॅकिंगमुळे फक्त गोव्यातील उद्योगांनाच फायदा होणार नाही तर राज्याची देशाच्या इतर भागांशी कनेक्टिव्हिटीदेखील वाढेल. या प्रकल्पामुळे गोवा आणि हंपीमधील पर्यटनाला चालना मिळेल अशी अपेक्षा आहे, कारण जलद आणि अधिक कार्यक्षम रेल्वे कनेक्टिव्हिटीमुळे पर्यटकांना या लोकप्रिय ठिकाणांना भेट देणे सोपे होईल. या विकासासह, गोवा सुधारित पायाभूत सुविधा आणि वाढीव आर्थिक व्यवहार वाढीस लागतील असा दावा रेल्वे मंत्रालयाकडून तसेच राज्य सरकारकडून करण्यात आला आहे.

दरम्यान, 'डबल इंजिन' सरकार रेल्वेचे डबल ट्रॅकिंग वापरून कोळसा वाहतूक करणार हे स्पष्ट झाले आहे, असा आरोप करत विरोधी पक्षनेते युरी आलेमाव, गोवा फॉरवर्डचे नेते व आमदार विजय सरदेसाई यांनी या सरकारने लोकांच्या भावनांशी खेळ केला आहे असा हल्लाबोल केला.

हा गावे उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न : सरदेसाई

गोवा फॉरवर्ड पक्षाचे विजय सरदेसाई यांनी भाजप सरकार डबल-ट्रॅकिंग प्रकल्पाद्वारे वाढीव कोळसा वाहतुकीला परवानगी देऊन गोव्यातील गावे उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केला आहे. ते म्हणाले की, केंद्रीय मंत्रालयाने अखेर या प्रकल्पाचा खरा उद्देश हा कोळसा वाहतूक सुलभ करणे हे मान्य केला आहे. हा प्रकल्प कोळसा वाहतुकीसाठी होता हे पूर्वी सरकारने नाकारले. या प्रकल्पामुळे राज्यात प्रदूषण आणखी वाढेल. विशेषतः कोळसा प्रदूषणाने आधीच उद्ध्वस्त झालेल्या मुरगावसारख्या भागात अत्यंत वाईट परिस्थिती निर्माण होईल. वेळसाव ते कुळेपर्यंतची गावे या प्रकल्पामुळे प्रभावित होतील. सरकारने त्यांच्या योजनांचा पुनर्विचार करावा. सरदेसाई यांनी डबल-ट्रॅकिंग प्रकल्पाच्या पर्यावरणीय परिणामांबद्दल चिंता अधोरेखित केली.

सरकार असंवेदनशील : आलेमाव

दरम्यान, विरोधी पक्षनेते युरी आलेमाव म्हणाले की, 'दुहेरी ट्रॅकिंग कोळसा वाहतुकीसाठी आहे हे केंद्र सरकारने मान्य केले आहे. आधीच, कोळसा वाहतुकीमुळे मुरगावचे लोक त्रस्त आहेत. लोकांच्या विरोधाला न जुमानता, डबल इंजिन सरकार डबल ट्रॅकिंग वापरून कोळसा वाहतूक करणार हे स्पष्ट झाले. राज्यातील भाजप सरकारने लोकांच्या भावनांशी खेळ केला. पोलिस तक्रारी दाखल करून लोकांना आंदोलनांपासून रोखण्याचा प्रयत्न केला. गोवा नष्ट करण्यासाठी आणि लोकांचे आरोग्य बिघडवण्यासाठी प्रकल्प आणणाऱ्या असंवेदनशील सरकारला लाज वाटली पाहिजे.

 

टॅग्स :goaगोवाrailwayरेल्वेKonkan Railwayकोकण रेल्वेIndian Railwayभारतीय रेल्वे