शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू काश्मीरपासून पंजाब, दिल्लीपर्यंत महापूर! अनेक रस्ते पाण्याखाली, वाहनांच्या भल्या मोठ्या रांगा...
2
...तर सर्व मराठ्यांना ओबीसीतूनच आरक्षण मिळणार; सर्वोच्च न्यायालयातील ज्येष्ठ विधिज्ञ सिद्धार्थ शिंदे म्हणाले...
3
सरकारनं जीआर काढला, मनोज जरांगेंनी उपोषण सोडलं; नेमका कुणाला मिळणार लाभ? फडणवीसांनी सांगितलं!
4
जीएसटी कपातीबाबत ऑटो कंपन्यांना आधीच माहिती होते? विक्री घसरली की मुद्दाम कमी केली... 
5
हैदराबाद गॅझेट आणि सातारा गॅझेट म्हणजे काय? मराठा आरक्षणाशी काय संबंध? जाणून घ्या...
6
मोठ्ठा विकेंड? ८ सप्टेंबरला ईदची सार्वजनिक सुट्टी मिळणार? आमदार असलम शेख यांची मागणी, मुख्यमंत्र्यांना पत्र
7
अफगाणिस्तान पुन्हा भूकंपाने हादरला, २४ तासांत दुसरा मोठा धक्का; मदतकार्यात अडथळे
8
Big Breaking: ते तिघे आले नाहीत तर नाराजी तशीच राहणार; अखेर मनोज जरांगेंनी उपोषण सोडले
9
रिलायन्स-सुझलॉनसह 'हे' ५ शेअर करणार कमाल! ब्रोकरेज फर्मने दिली टार्गेट प्राइज; ३८ टक्केंपर्यंत होणार वाढ?
10
जगभरातील प्रेमी युगुलांना एकत्र आणणाऱ्या नेस्ले कंपनीच्या सीईओची नोकरी गेली; कर्मचाऱ्यासोबत प्रेमसंबंध भोवले
11
कन्नड अभिनेत्री रान्या राव हिला DRI ने ठोठावला 102 कोटी रुपयांचा दंड
12
Manoj Jarange Patil Maratha Morcha Live: सर्व मागण्या मान्य; मनोज जरांगे पाटील यांनी अखेर आपले उपोषण सोडले
13
'मराठा-कुणबी एक' जीआर काढण्यासंदर्भात काय म्हणालं सरकारचं शिष्टमंडळ? जरांगेंनी स्वतःच सांगितलं
14
तुमच्या ताकदीवर आपण जिंकलो, मनोज जरांगेंची घोषणा; वाचा, ८ मागण्या अन् ८ सरकारी आश्वासने कोणती?
15
टीम इंडियाला लवकरच मिळणार नवा Sponsor! या मंडळींसाठी BCCI नं लावली नो एन्ट्रीची पाटी
16
मुकेश अंबानींच्या कंपनीचा शेअर १०% नं वाढला, खरेदीसाठी गुंतवणूकदारांची झुंबड; आता ₹१९ वर आला
17
लग्नाच्या १७ वर्षांनंतर राहुल देशपांडेच्या संसाराचे सूर बिघडले, पत्नीपासून झाला विभक्त
18
चेन स्मोकर आहे किम जोंग उन! उत्तर कोरियाचा हुकूमशहा एका दिवसात किती सिगारेट ओढतो?
19
मराठा आरक्षणाबाबत हैदराबाद गॅझेटिअरवर पहिला GR प्रसिद्ध; वाचा जशाच्या तसा संपूर्ण शासन निर्णय
20
लाखोंचा खर्च टाळला, अवघ्या २ हजारांत केले लग्न; IAS युवराज अन् IPS मोनिका यांची प्रेम कहाणी

रेल्वेची दुहेरी ट्रॅकिंग योजना कोळसा वाहतुकीसाठीच; विरोधकांची राज्य सरकारवर जोरदार टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2025 07:32 IST

केंद्र सरकारने वस्तूस्थिती मान्य केल्याचा विरोधी पक्षनेते युरी आलेमाव, आमदार विजय सरदेसाई यांचा दावा

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी :रेल्वे मंत्रालयाने कर्नाटकातील होस्पेट ते तिनाईघाट अशा ३१२ किमीचा मार्गाचे काम पूर्ण झाल्याची घोषणा रेल्वे मंत्रालयाने केली आहे. हा मार्ग गोव्यात वास्कोपर्यंत विस्तारणाऱ्या ३६३ किमीच्या मोठ्या प्रकल्पाचा भाग आहे. होस्पेट-वास्को मार्गाच्या दुहेरी ट्रॅकिंगमुळे कोळसा, लोहखनिज आणि स्टीलसारख्या जीवनावश्यक वस्तूंच्या वाहतुकीला लक्षणीयरीत्या गती मिळेल अशी अपेक्षा आहे असे रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. 

रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी म्हटले आहे की, डबल ट्रॅकिंगमुळे फक्त गोव्यातील उद्योगांनाच फायदा होणार नाही तर राज्याची देशाच्या इतर भागांशी कनेक्टिव्हिटीदेखील वाढेल. या प्रकल्पामुळे गोवा आणि हंपीमधील पर्यटनाला चालना मिळेल अशी अपेक्षा आहे, कारण जलद आणि अधिक कार्यक्षम रेल्वे कनेक्टिव्हिटीमुळे पर्यटकांना या लोकप्रिय ठिकाणांना भेट देणे सोपे होईल. या विकासासह, गोवा सुधारित पायाभूत सुविधा आणि वाढीव आर्थिक व्यवहार वाढीस लागतील असा दावा रेल्वे मंत्रालयाकडून तसेच राज्य सरकारकडून करण्यात आला आहे.

दरम्यान, 'डबल इंजिन' सरकार रेल्वेचे डबल ट्रॅकिंग वापरून कोळसा वाहतूक करणार हे स्पष्ट झाले आहे, असा आरोप करत विरोधी पक्षनेते युरी आलेमाव, गोवा फॉरवर्डचे नेते व आमदार विजय सरदेसाई यांनी या सरकारने लोकांच्या भावनांशी खेळ केला आहे असा हल्लाबोल केला.

हा गावे उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न : सरदेसाई

गोवा फॉरवर्ड पक्षाचे विजय सरदेसाई यांनी भाजप सरकार डबल-ट्रॅकिंग प्रकल्पाद्वारे वाढीव कोळसा वाहतुकीला परवानगी देऊन गोव्यातील गावे उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केला आहे. ते म्हणाले की, केंद्रीय मंत्रालयाने अखेर या प्रकल्पाचा खरा उद्देश हा कोळसा वाहतूक सुलभ करणे हे मान्य केला आहे. हा प्रकल्प कोळसा वाहतुकीसाठी होता हे पूर्वी सरकारने नाकारले. या प्रकल्पामुळे राज्यात प्रदूषण आणखी वाढेल. विशेषतः कोळसा प्रदूषणाने आधीच उद्ध्वस्त झालेल्या मुरगावसारख्या भागात अत्यंत वाईट परिस्थिती निर्माण होईल. वेळसाव ते कुळेपर्यंतची गावे या प्रकल्पामुळे प्रभावित होतील. सरकारने त्यांच्या योजनांचा पुनर्विचार करावा. सरदेसाई यांनी डबल-ट्रॅकिंग प्रकल्पाच्या पर्यावरणीय परिणामांबद्दल चिंता अधोरेखित केली.

सरकार असंवेदनशील : आलेमाव

दरम्यान, विरोधी पक्षनेते युरी आलेमाव म्हणाले की, 'दुहेरी ट्रॅकिंग कोळसा वाहतुकीसाठी आहे हे केंद्र सरकारने मान्य केले आहे. आधीच, कोळसा वाहतुकीमुळे मुरगावचे लोक त्रस्त आहेत. लोकांच्या विरोधाला न जुमानता, डबल इंजिन सरकार डबल ट्रॅकिंग वापरून कोळसा वाहतूक करणार हे स्पष्ट झाले. राज्यातील भाजप सरकारने लोकांच्या भावनांशी खेळ केला. पोलिस तक्रारी दाखल करून लोकांना आंदोलनांपासून रोखण्याचा प्रयत्न केला. गोवा नष्ट करण्यासाठी आणि लोकांचे आरोग्य बिघडवण्यासाठी प्रकल्प आणणाऱ्या असंवेदनशील सरकारला लाज वाटली पाहिजे.

 

टॅग्स :goaगोवाrailwayरेल्वेKonkan Railwayकोकण रेल्वेIndian Railwayभारतीय रेल्वे