शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
2
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
3
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
4
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
5
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
6
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
7
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
8
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
9
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
10
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
11
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
12
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
13
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग
14
माता न तू वैरिणी! बॉयफ्रेंडसोबत पळून जाण्यासाठी जन्मदात्या आईनेच २ मुलांना विष देऊन मारलं
15
जैस्वालचा आणखी एक 'यशस्वी' डाव! इंग्लंडमध्ये पहिल्याच टेस्टमध्ये भात्यातून आली बेस्ट खेळी
16
इराणच्या मदतीला चीन धावला; युद्ध साहित्य घेऊन ड्रॅगनची तीन विमाने तेहरानमध्ये दाखल...
17
कोयनेत साडेचार टीएमसी पाणीसाठा वाढला; धरणातून विसर्ग सुरू 
18
संतापजनक...! ब्रा नसेल तर परीक्षेला बसता येणार नाही, स्पर्शकरून होतेय तपासणी; विद्यापीठाचं अजब फर्मान, VIDEO व्हायरल 
19
फक्त ९९ पैशात जमीन! आधी TCS ला २१ एकरचा भूखंड, आता सरकारचा 'या' कंपनीसोबत करार
20
Tejasswi Prakash : "मला काही फरक पडत नाही"; ४ वर्षांनी नात्याला तडा, तेजस्वी प्रकाश-करण कुंद्राचं झालं ब्रेकअप?

काँग्रेसच्या जन आक्रोश आंदोलनाला पेडण्यातून सुरुवात

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2018 21:04 IST

भाजपा सरकारविरोधात काँग्रेस आक्रमक

म्हापसा : राज्यात सरकार आहे की नाही, याची गोवेकरांना माहितीच नाही. लोकशाहीचा खून करू पाहणाऱ्या भाजपा सरकारला आता गोमंतकीयांनी कायमचेच घरी बसवण्याची गरज आहे, असे प्रतिपादन काँग्रेसचे गोवा प्रभारी डॉ. चेल्लाकुमार यांनी काँग्रेसच्या जन आक्रोश आंदोलनातून पेडणे येथे केले.खाण घोटाळा गेला कुठे, काळा पैसा देशात आला का, प्रत्येकाच्या खात्यात १५ लाख रुपये आले का, असे प्रश्न चेल्लाकुमार यांनी उपस्थित केले. भाजपाने खोटारडेपणाचा कळस गाठला असून जनतेचा उद्रेक वाढण्यापूर्वी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी राजीनामा द्यावा अन्यथा आजारी सरकार राज्यपालांनी बरखास्त करावे, असे ते म्हणाले. गोवा प्रदेश कॉँग्रेस व पेडणे गट कॉँग्रेस समिती आयोजित जन आक्रोश आंदोलन पेडणेतील टॅक्सी स्टॅन्डवर आयोजित करण्यात आले. त्यावेळी डॉ. चेल्लाकुमार बोलत होते. आंदोलनाला गोवा प्रदेश काँग्रेस अध्यक्ष गिरीश चोडणकर, माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत, माजी केंद्रीय मंत्री रमाकांत खलप, माजी शिक्षण मंत्री संगीता परब, उत्तर गोवा अध्यक्ष विजय भिके, उपाध्यक्ष बाबी बागकर, सचिव सुभाष केरकर, पेडणे गट कॉँग्रेस अध्यक्ष उमेश तळवणेकर, दिव्या शेटकर, उत्तर गोवा महिला अध्यक्ष वैशाली शेटगावकर तसेच इतर मान्यवर उपस्थित होते. गोवा कॉँग्रेस प्रभारी डॉ. चेल्लाकुमार यांनी यावेळी बोलताना २०१२ च्या विधानसभेच्या निवडणुकीत भाजपाने खोटी आश्वासने देऊन मागच्या दाराने सत्ता मिळवली. राज्याला खास दर्जा देण्याच्या खोट्या आश्वासनाला हरताळ फासले. गोवेकरांना फसवण्याचा हातखंडा मुख्यमंत्री पर्रीकर यांच्याकडे आहे असा दावा करून गोवेकरांना फसवण्यासाठी रथयात्रा, परिवर्तन यात्रा काढली आणि सत्ता मिळवली. सत्ता मिळताच जनहित विसरले. १०० दिवसात काळा पैसा आणण्याची घोषणा करणाऱ्या भाजपाने गोवेकरांना फसवल्याचा दावा चेल्लाकुमार यांनी केला. खनिज व्यवसाय बंद केला. बेरोजगाराना रोजगार नाही. दिलेली १० टक्के आश्वासने भाजपाने पूर्ण केली नाही. लुटारू भाजपाला घरचा रस्ता दाखवा असे आवाहन चेल्लाकुमार यांनी केले. पेडणे तालुक्यातून कोणतीही मोहीम किंवा आंदोलन केले तर ते यशस्वी होते आणि सतत पेडणेतील जनता प्रत्येकवेळी वेगळा इतिहास गोवेकरासमोर ठेवत असते, म्हणूनच जन आक्रोश आंदोलनाची सुरुवात पेडणे तालुक्यातून केल्याची जवळ जवळ सर्व वक्त्यांनी आपल्या भाषणात केले. यावेळी सरकार चालवणाऱ्या व्यक्तीचा चेहरा समोर येण्याची तसेच सरकार चालवण्यासाठी मुख्यमंत्र्यांची बनावट सही वापरण्यात येत असल्याचा आरोप गिरीष चोडणकर यांनी केला. यावेळी सभेत गोमंतकीय गरीब जनतेला संकटात टाकणाऱ्या सरकार विरोधात हे जन आक्रोश असून मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा अन्यथा सरकार बरखास्त करावे अशी मागणी करणारा ठराव यावेळी सर्वानुमते मंजूर करण्यात आला. 

टॅग्स :congressकाँग्रेसManohar Parrikarमनोहर पर्रीकरBJPभाजपा