शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

चतुर्थीला महाराष्ट्रातून होते पुरोहितांची आयात 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2018 12:35 IST

आराध्य दैवत तसेच प्रत्येकाला प्रिय असलेल्या गणेश चतुर्थीच्या सणाला गोवेकरांना पुरोहित मिळणे दुरापास्त झाल्याने तसेच दरवर्षी गणेश भक्तांच्या संख्येत वाढ होत असल्याने गोवेकरांसाठी महाराष्ट्रातून पुरोहित चतुर्थीला आयात करण्याची वेळ आली आहे.

म्हापसा : आराध्य दैवत तसेच प्रत्येकाला प्रिय असलेल्या गणेश चतुर्थीच्या सणाला गोवेकरांना पुरोहित मिळणे दुरापास्त झाल्याने तसेच दरवर्षी गणेश भक्तांच्या संख्येत वाढ होत असल्याने गोवेकरांसाठी महाराष्ट्रातून पुरोहित चतुर्थीला आयात करण्याची वेळ आली आहे. चतुर्थीसाठी गोवेकरांची गरज भागवून आणलेले पुरोहित मंगळवारी सकाळी परतीच्या वाटेवर निघून गेले.  

गोव्यात दरवर्षी सार्वजनिक गणोशोत्सवासोबत घरातील गणपतीची पूजा करणा-या भक्तांच्या संख्येत वाढ होवू लागली आहे. मिळालेल्या माहितीनुसार राज्यात घरात गणपतीची पूजा करणा-यांची संख्या लाखाच्या घरात गेली आहे. वाढत्या संख्येबरोबर पुरोहितांची वाढती गरज भागवण्यासाठी म्हणावे त्या प्रमाणे पुरोहीत उपलब्ध नसल्याने त्यांच्या तुटवडा भासू लागला आहे. ब-याच पुरोहितांनी आपला पारंपरिक व्यवसाय सोडून इतर प्रकारच्या व्यवसायाला प्राधान्य दिल्याने तुटवडा भासण्याचे प्रमुख कारण मानले जात आहे. त्यामुळे पुरोहित आयात करण्यात आले होते.  

आयात केलेले पुरोहित चतुर्थीच्या दोन दिवस अगोदर दाखल व्हायला सुरुवात होतात. त्यांची संख्याही बराच मोठी असते. महाराष्ट्रातील पढंरपूर, नांदेड, कोल्हापूर, नाशिक सारख्या भागातून पुरोहित आणले जातात. तसेच कर्नाटकातील गोकर्ण, अंकोला या भागातून सुद्धा आणले जातात. चतुर्थीच्या काळातील त्यांचा वास्तव्याचा कालावधी पाच ते सात दिवसापर्यंतचा असतो. राज्यातील जास्त प्रमाणावरील गणपती पाच दिवसांचे असल्याने किमान पाच दिवसानंतर ते माघारी निघून जातात. यंदा सुद्धा चतुर्थीसाठी आणलेले बहुतेक पुरोहित मंगळवारी सकाळी परतीच्या वाटेवर निघून गेले. त्यांच्या राहण्यापासून ते इतर सर्व प्रकारची त्यांची व्यवस्था केली जाते. त्यांना आणण्यापूर्वी त्यांना देण्यात येणारी रक्कम सुद्धा निश्चित केलेली असते. 

सरासरीवर एक पुरोहीत जास्तीत-जास्त शंभर गणपतीचे पूजन दर दिवशी करीत असतो. पहाटे ४ वाजल्या पासून सुरू केलेली पूजा संध्याकाळी ७ वाजेपर्यंत सुरू असते. चतुर्थी नंतर दुस-या पंचमीच्या दिवशी अभिषेक करण्यात येत असतो. दुस-या दिवशीही पहिल्या दिवसा प्रमाणे उशीर होत असतो. दीड दिवस गणपतीच्या विसर्जनानंतर काही लोकांच्या घरात सत्यनारायण पूजेचे आयोजनही केले जाते. पुरोहीतांच्या सोयीनुसार सत्यनारायण पूजेचा वेळ ठरवण्यात येतो. त्यातून होणारा हा उशीर पुरोहितांच्या कमतरतेमुळे अटळ असतो. होत असलेल्या उशीरामुळे दुपारचा नैवेद्य संध्याकाळच्यावेळी ग्रहण करणे भाग पडत असते. 

गोव्यातील ब-याच गावांत असलेल्या देवस्थानच्या पुजा-यावर संबंधीत गावातील गणेश पूजन करण्याची जबाबदारी असते. गाव मोठा असला तर त्यांना दुस-या पुरोहिताचा वापर केल्या शिवाय पर्याय उपलब्ध नसतो. त्यामुळे ही आयात करणे भाग पडत असते. पुरोहितांची आयात करून सुद्धा अनेकांना वेळेवर पुरोहित मिळत नसल्याने त्यावर तोडगा काढण्यासाठी भक्तांनी कॅसेटचा वापर करायला सुरुवात केली. तर काही गावांनी स्वत:हून पूजा करण्यावर भक्तांनी भर दिला आहे. त्यामुळे घरात वेळेवर सगळी देवकृत्ये होत असतात अशी माहिती काही लोकांनी दिली.

गावातील सगळ्या लोकांशी सलोख्याचे संबंध असल्याने चतुर्थीला त्यांची गरज वेळेवर भागवावी लागते. त्यामुळे दरवर्षी किमान २५ पुरोहितांची गरज भासत असल्याची माहिती पुरुषोत्तम जोशी यांनी दिली. निर्धारीत वेळेत सगळ्यांच्या पूजा करणे शक्य होत नसल्याने गरज भागवण्यासाठी इतर राज्यातून पुरोहित आणावे लागतात. सगळ्यांच्या पूजा वेळेवर करुन द्याव्या लागतात असेही ते म्हणाले.  

टॅग्स :Ganpati Festivalगणेशोत्सवgoaगोवा