शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

वीज समस्येमुळे इन्व्हर्टर व्यावसायिकांची चांदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2019 11:26 IST

गोव्यात वीज पुरवठ्याची समस्या वाढू लागली आहे. विविध भागांमधून त्याविषयी तक्रारी वाढत आहेत. अशावेळी इन्व्हर्टर विकणारे आणि ते घरी किंवा कार्यालयात बसवून कार्यान्वित करणाऱ्या व्यावसायिकांची चांदी झाली आहे.

ठळक मुद्देगोव्यात वीज पुरवठ्याची समस्या वाढू लागली आहे. विविध भागांमधून त्याविषयी तक्रारी वाढत आहेत.इन्व्हर्टर विकणारे आणि ते घरी किंवा कार्यालयात बसवून कार्यान्वित करणाऱ्या व्यावसायिकांची चांदी झाली आहे. बार्देश, सत्तरी, सांगे, डिचोली, फोंडा आणि तिसवाडी या सहा तालुक्यांमध्ये वीज पुरवठ्याविषयी जास्त तक्रारी येत आहेत.

पणजी - गोव्यात वीज पुरवठ्याची समस्या वाढू लागली आहे. विविध भागांमधून त्याविषयी तक्रारी वाढत आहेत. अशावेळी इन्व्हर्टर विकणारे आणि ते घरी किंवा कार्यालयात बसवून कार्यान्वित करणाऱ्या व्यावसायिकांची चांदी झाली आहे.

बार्देश, सत्तरी, सांगे, डिचोली, फोंडा आणि तिसवाडी या सहा तालुक्यांमध्ये वीज पुरवठ्याविषयी जास्त तक्रारी येत आहेत. वीज मंत्रिपदाचा ताबा निलेश काब्राल या भाजपा नेत्याने काही महिन्यांपूर्वी घेतला आहे. आपल्याला फोनवरून तक्रार कळवा, आपण लगेच वीज पुरवठय़ात सुधारणा करून घेईन, असे मंत्री काब्राल यांनी जाहीर केले. वीज समस्येने हैराण होऊन अनेक लोक त्यांना संदेश पाठवतात. काब्राल यांच्याकडून काही तक्रारींची तातडीने दखलही घेतली जाते. मात्र प्रत्येकवेळी वीज पुरवठय़ात सुधारणा होते असे मुळीच नाही. 

पावसाळ्यापूर्वी अनेक भागांत शट डाऊन जाहीर करून वीज खात्याच्या यंत्रणेने सुधारणा काम केले होते. जुने कंडक्टर्स बदलण्याचेही काम केले. रस्त्यांवरील वीज दिवेही बदलण्यात आले.  मात्र जरा पाऊस किंवा वारा आला की, ग्रामीण गोव्यातील वीज पुरवठा खंडीत होतो. बार्देश तालुक्यातील अंजुणे पंचायत क्षेत्रातीलही लोक अशा समस्येला कंटाळले आहेत. केपे, सत्तरी, सांगे, काणकोण या चार तालुक्यांमधील बहुतेक भाग हे दुर्गम अशा ठिकाणी आहेत. बरीच लोकवस्ती जंगल परिसरात आहे. तिथे कधी झाड मोडून पडल्याने तर कधी अन्य कोणते संकट आल्याने वीजप्रवाह खंडीत होत असतो. पणजीसारख्या परिसरात ट्रान्सफॉर्मर मध्यंतरी निकामी झाले होते. तिसवाडीतील ताळगाव, करंजाळे वगैरे भागांमध्ये वीज पुरवठय़ाची समस्या वारंवार निर्माण होते. वीज खंडीत झाल्याने मग पाणी पुरवठा थांबतो. यामुळे म्हापसा, डिचोली, ताळगाव, कदंब पठार व अन्य भागांतील लोक शासकीय कारभाराविषयी नाराजी व्यक्त करत आहेत. अशावेळी जे व्यवसायिक इन्व्हर्टर विकतात त्यांचा धंदा तेजीत सुरू आहे. घरात इन्व्हर्टर  बसवला की, निदान काही पंखे व काही वीज दिवे कामी येतात म्हणून लोक इन्व्हर्टर बसवून घेऊ लागले आहेत.

 

टॅग्स :electricityवीजgoaगोवाBJPभाजपा