शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

गोव्यात खनिज लिजांचा लिलावच, पीयूष गोयलांच्या इशा-याने शिष्टमंडळाला सुटला घाम

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2018 19:01 IST

देशातील सर्व राज्यांमधील नैसर्गिक संसाधनांचा लिलावच पुकारणे हे केंद्र सरकारचे धोरण असून गोव्यातील खनिज लिजांचाही लिलावच करावा लागेल, अशा शब्दांत केंद्रीय उर्जा मंत्री पीयूष गोयल यांनी गोव्याच्या सर्वपक्षीय शिष्टमंडळाला वस्तूस्थितीची जाणीव करून दिली.

पणजी : देशातील सर्व राज्यांमधील नैसर्गिक संसाधनांचा लिलावच पुकारणे हे केंद्र सरकारचे धोरण असून गोव्यातील खनिज लिजांचाही लिलावच करावा लागेल, अशा शब्दांत केंद्रीय उर्जा मंत्री पीयूष गोयल यांनी गोव्याच्या सर्वपक्षीय शिष्टमंडळाला वस्तूस्थितीची जाणीव करून दिली. शिष्टमंडळातील एक-दोन आमदारांनी लिलाव कसा शक्य नाही ते सांगण्याचा प्रयत्न करत युक्तीवाद केले तेव्हा तुम्ही खनिज मालकांची जर बाजू घेऊन सर्वोच्च न्यायालयाच्या निवाडय़ाशी खेळ मांडला तर तुम्हाला तुरुंगात जावे लागेल, असा इशारा गोयल यांनी देताच शिष्टमंडळ नरमले. शिष्टमंडळाला घामच फुटल्याचे शिष्टमंडळातील काही सदस्यांनी नंतर लोकमतला सांगितले.केंद्र सरकारने 12 जानेवारी 2015 रोजी केंद्रीय खनिज विकास व नियमन कायदा (एमएमडीआर) वटहुकूमाद्वारे दुरुस्त केला. त्या दुरुस्तीनुसार देशभरातील खनिज लिजांचा लिलाव करणे बंधनकारक ठरले. सर्वोच्च न्यायालयाच्या निवाडय़ानुसारही गोव्यातील लिजांचा लिलाव करणे बंधनकारक आहे. मात्र गोव्यातील सर्वपक्षीय शिष्टमंडळातील बहुतेक सदस्यांना लिलाव झालेला नको आहे. काही सदस्यांना लिलावच हवा आहे पण ते या विषयावर जाहीरपणे बोलणे टाळतात. रविवारी सायंकाळी दिल्लीला गेलेले गोव्याचे शिष्टमंडळ सोमवारी सकाळी प्रथम केंद्रीय भू-पृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना भेटले व त्यांनी निवेदन सादर केले. 1987 सालचा गोवा अॅबोलिशन ऑफ लिजेस हा कायदा 1961 पासून लागू झाला आहे, तो 1987 पासून लागू करून आणखी वीस वर्षे गोव्यातील खनिज लिजेसना मुदतवाढ द्यावी, अशी मागणी शिष्टमंडळाने निवेदनाद्वारे केली. तथापि, खाण मंत्री नरेंद्रसिंग तोमर हे दिल्लीत नसल्यामुळे गडकरी यांनी माजी खाण मंत्री असलेले व विद्यमान रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांच्याकडे गोव्याच्या शिष्टमंडळाला नेले. गोयल यांनी खाण सचिवांनाही बैठकीसाठी बोलावले. केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, खासदार नरेंद्र सावईकर हेही यावेळी उपस्थित होते. गोव्यात खनिज लिजांचा लिलावच करावा लागेल, देशभर नैसर्गिक साधनांचा आम्ही लिलावच करत आहोत, असे गोयल यांनी गोव्याच्या शिष्टमंडळाला सांगितले. भाजपचे आमदार निलेश काब्राल यांनी यावेळी थोडे युक्तीवाद केले. जर खनिज मालकांच्याबाजूने तुम्ही राहिलात, तर तुरुंगात जावे लागेल, असे शिष्टमंडळातील काही सदस्यांना गोयल यांनी स्पष्टपणे सांगितले व सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाशी खेळू नका, असा सल्ला दिला. यामुळे गोव्याचे पूर्ण शिष्टमंडळच गडबडले. शिष्टमंडळातील बहुतेक मंत्री, आमदार गार झाले. लगेच विरोधी पक्षनेते बाबू कवळेकर व थिवीचे आमदार नीळकंठ हळर्णकर यांनी गोव्याला येणारे विमान पकडले व ते मुंबईहून गोव्यात दाखल झाले. 

दोन महिन्यांत लिलाव ज्यांना खनिज लिजेस हव्या आहेत, त्यांनी लिलाव प्रक्रियेत सहभागी व्हावे असा सल्ला गोयल यांनी गोव्याच्या शिष्टमंडळाला दिला. आम्ही एक महिन्यात लिलाव प्रक्रिया करू शकतो, असेही गोयल यांनी सांगितले. दि. 15 मार्चनंतर एका महिन्यासाठी जर गोव्याच्या खाणी बंद राहिल्या तर काय बिघडते असा प्रश्न गोयल यांनी शिष्टमंडळाला केला. जास्तीत जास्त लिलाव प्रक्रियेला दोन महिने लागतील पण प्रक्रिया होईल व मग खाणीही सुरू होतील, असे गोयल यांनी शिष्टमंडळाला सांगितले. एमएमडीआर कायदा दुरुस्त झाला होता, तेव्हा गोयल हे केंद्रीय खाण मंत्री होते व त्यांच्याच कारकिर्दीत देशभरातील नैसर्गिक साधनांचा लिलाव करणो कायद्यानुसार बंधनकारक केले गेले. ते केंद्रातील खूप वजनदार व पंतप्रधानांच्या विश्वासातील मंत्री मानले जातात.मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनाही खनिज लिजांचा लिलाव झालेला हवा आहे. अतिरिक्त सॉलिसिटर जनरल आत्माराम नाडकर्णी यांनाही लिलावच झालेला हवा आहे. नाडकर्णी हे शिष्टमंडळासोबत दिल्लीला गेले नाहीत. मंत्री विजय सरदेसाई हेही गेले नाहीत. प्रतापसिंग राणे यांना सर्दी झालेली असल्याने ते दिल्लीला पोहचले नाहीत. जे दिल्लीला गेले होते, त्यांचे मात्र अवसानच गळाले. गोवा प्रदेश भाजपलाही खनिज लिजांचा लिलाव झालेला हवा आहे, असे काही महत्त्वाच्या पदाधिका-यांनी आपले नाव गुप्त ठेवण्याच्या अटीवर सांगितले.

टॅग्स :goaगोवाpiyush goyalपीयुष गोयल