शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतले निखारे! पहलगाम मुद्द्यावर काही भारतीयांचा पाकिस्तानला पाठिंबा! ३७ जणांना अटक
2
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
3
IPL 2025: कगिसो रबाडा ड्रग टेस्टमध्ये दोषी, झाले निलंबन! स्पर्धा सोडून परतला मायदेशी
4
पाकिस्तानी महिलेशी केलेला विवाह लपवला; CRPF ने देशासाठी धोकादायक म्हणत मुनीर अहमदला केले बडतर्फ
5
मुफ्ती दहशतवाद्यांच्या घरी जायच्या, काश्मिरी पंडितांना हाकलून कोणी दिलं? फारुख अब्दुल्लांचा आरोप
6
"आम्ही पाकिस्तानी लोकांना मारणार नाही, कारण..."; काय म्हणाले फारुख अब्दुल्ला? सिंधूच्या पाण्यासंदर्भातही मोठं विधान
7
IHMCL Recruitment: आयएचएमसीएलमध्ये नोकरी, एक लाखांहून अधिक पगार; जाणून घ्या पात्रता आणि निवड
8
"घरं तोडायला येतील त्यांना सांगा, राज ठाकरेंशी बोलून घ्या"; एल्फिन्स्टन पूल बाधितांना मनसेने दिला धीर
9
"मी सत्तेसाठी कधीच हपापलेलो नाही, सर्वाधिक सत्ता..."; अजित पवारांनी मांडलं रोखठोक मत
10
Alka Kubal: अलका कुबल यांनी 'माहेरची साडी'साठी घेतलं होतं फक्त इतकं मानधन, पहिल्या कमाईचा आकडाही आला समोर
11
"दादांना विचारतो त्यांनी कुठल्या ज्योतिष्याकडे पाहिलं"; CM व्हावं वाटतं म्हणणाऱ्या अजित पवारांना गोगावलेंचा टोला
12
"शिंदे कसले वाघ, मंत्र्यांचा निधी वळवला जातो, अडचण येताच गावी पळून जातात": अंबादास दानवे
13
Temple: शिवालयाच्या पायरीवर असलेल्या 'या' राक्षसाला नमस्कार करून मंदिरात जाण्याचा प्रघात का?
14
पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा आखाती देशांतील मराठी अनिवासी भारतीयांकडूनही तीव्र निषेध
15
बलुचिस्तानात मोठा खेला...! भारताला पोकळ धमक्या देणारा पाक उघडा पडला; सरकारी इमारतींवर बंडखोरांचा ताबा, लावली आग
16
१३२ सेवा, २४ राज्ये, २८४ जिल्ह्यांना जोडणाऱ्या ‘वंदे भारत’मुळे रेल्वेची किती कमाई होते?
17
Pune Accident: कीर्तन ऐकून घरी परतताना भरधाव मर्सिडीजनं उडवलं; दुचाकीस्वार जागीच ठार
18
Hingoli: डिव्हायडर तोडून टिप्पर थेट ऑटोवर उलटला; टिप्परखाली दबून दोन प्रवाशांचा मृत्यू
19
“प्रत्येकाने सद्भावना मंत्र जोपासावा, महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी काँग्रेसचा सत्याग्रह”
20
कमालच झाली राव! लहान मुलंच म्हणतील फोनला टाटा-बायबाय; फक्त पालकांनी करावं असं काही...

व्यावसायिक खटले हाताळणारी न्यायालये आणखी मजबूत व्हावीत, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती ए. के. सिक्री यांचे प्रतिपादन

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2018 21:33 IST

 पणजी - केवळ व्यावसायिक कायद्यांबाबतच नव्हे तर ग्राहक कायद्यांबाबतही विचार व्हायला हवा. व्यावसायिक खटले हाताळणारी न्यायालये आणखी मजबूत होणे आवश्यक आहे. या न्यायालयांच्या अधिकारक्षेत्राबाबत काही समस्या असतील तर त्या दूर करायला हव्यात, असे प्रतिपादन सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती ए. के. सिक्री यांनी येथे केले. ‘आंतरराष्ट्रीय व्यावसायिक कायदा’ या विषयावरील अखिल भारतीय परिषदेच्या ...

 पणजी - केवळ व्यावसायिक कायद्यांबाबतच नव्हे तर ग्राहक कायद्यांबाबतही विचार व्हायला हवा. व्यावसायिक खटले हाताळणारी न्यायालये आणखी मजबूत होणे आवश्यक आहे. या न्यायालयांच्या अधिकारक्षेत्राबाबत काही समस्या असतील तर त्या दूर करायला हव्यात, असे प्रतिपादन सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती ए. के. सिक्री यांनी येथे केले. 

‘आंतरराष्ट्रीय व्यावसायिक कायदा’ या विषयावरील अखिल भारतीय परिषदेच्या उद्घाटनाच्या सत्रात ते बोलत होते. देशभरातील न्यायाधीश, वकील या परिषदेत सहभागी झाले आहेत. व्यासपीठावर न्यायमूर्ती आर. एफ. नरिमन, न्यायमूर्ती संजय कि शन कौर, अ‍ॅटर्नी जनरल के. के. वेणुगोपाल, ज्येष्ठ वकील तथा परिषदेचे आयोजन सचिव प्रवीण पारेख आदी उपस्थित होते. 

न्यायमूर्ती सिक्री म्हणाले की, ‘ई कॉमर्समुळे भविष्यात खटलेही वाढतील. आॅनलाइन खरेदीचे प्रमाण इतके वाढले आहे की पुढील दोन वर्षांच्या काळात भारतात आॅनलाइन खरेदी करणाºयांचा आकडा ३३ कोटींवर जाईल, अशा बातम्या येतात. ग्राहक कायद्यांबाबतही प्रकर्षाने विचार होणे आवश्यक आहे. त्यासाठी येऊ घातलेले विधेयक चांगली बाब आहे. मानवी हक्क विचारात घेऊन ग्राहकहिताचे कायदे केले जावेत.’

 सिक्री पुढे म्हणाले की, ‘ जगातील सर्वात दुसरी मोठी अर्थव्यवस्था म्हणून भारताच्या अर्थव्यवस्थेकडे पाहिले जाते. जागतिकीकरण हा या अर्थव्यवस्थेचा एक भाग बनताना अनेक नवे पैलू पुढे येत आहेत. व्यावसायिक तंट्याबाबतीत क्लिष्टता वाढत चालली आहे. पूर्वी ९0 टक्के व्यावसायिक घटले हे स्थानिक  असायचे. हे चित्र बदलले आहे. आंतरराष्ट्रीय व्यावसायिक खटल्यांचे प्रमाणही वाढत आहे. बौध्दिक संपदेचे तंटेही वाढत आहेत. हे खटले हाताळण्यासाठी आंतरराष्ट्रीय कायद्यांमध्ये समानता आणि पारदर्शकता हवी. २000 साली भारत सरकारने ट्रेडमार्क कायदा मागे घेतला. आमचे अनेक कायदे असे आहेत की ते आंतरराष्ट्रीय कायद्यांच्या तोडीचे आहेत. गुंतवणूक कायदा हा त्यापैकी एक म्हणावा लागेल. ‘ओला’, ‘उबेर’सारख्या टॅक्सीसेवा देणाºया कंपन्यांकडे त्यांची स्वत:ची अशी प्रत्यक्ष कोणतीच मालमत्ता नाही परंतु तरीही या कंपन्या सेवा देतात. अशा कंपन्यांच्या बाबतीत उद्या जर तंटा आला तर त्यांच्याकडे प्रत्यक्ष मालमत्ता नाही. असे खटले हाताळण्यासाठी अधिकारक्षेत्र निश्चित व्हायला हवे. 

भारताचे सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांनी या परिषदेच्या आयोजनाबाबत शुभेच्छा देताना आपल्या संदेशात असे म्हटले आहे की, आंतरराष्ट्रीय व्यावसायिक तंटे हाताळण्यासाठी न्यायाधीशांना पुरेसे प्रशिक्षण दिले जावे. ते पुढे म्हणतात की, राष्ट्रीय आयपीआर धोरण आणून सरकारने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. आंतरराष्ट्रीय व्यापार करारांच्या बाबतीत सकारात्मकता यामुळे आलेली आहे. सरकारकडून गुंतवणूक लवाद नियोजनही व्हायला हवे. अतिरिक्त सॉलिसिटर जनरल आत्माराम नाडकर्णी यांनी हा संदेश वाचून दाखवला. 

भारताचे अ‍ॅटर्नी जनरल के. के. वेणुगोपाल म्हणाले की, सिंगापूरच्या कोर्टात आज २६४ आंतरराष्ट्रीय व्यावसायिक तंटे आहेत. यात भारतातील खटल्यांचे प्रमाण जास्त आहे. असे खटले हाताळण्यासाठी भारत जर आंतरराष्ट्रीय केंद्र बनले तरच येथे अधिकाधिक गुंतवणूक येईल. 

टॅग्स :goaगोवाnewsबातम्या