शहरं
Join us  
Trending Stories
1
West Bengal Kanchenjunga Express Train Accident: बंगालमध्ये ट्रेनचा मोठा अपघात! कंचनजंगा एक्स्प्रेसला भरधाव मालगाडीची धडक, ५ जणांचा मृत्यू
2
देवेंद्र फडणवीसांनी मला संकटातून वाचवलं; खासदार नरेश म्हस्केंनी सांगितला किस्सा
3
बापरे! महागाईचा सर्जिकल स्ट्राइक; पाकिस्तानात टोमॅटो २०० रुपये किलो
4
कंचनजंगा एक्स्प्रेसच्या अपघातात लोको पायलट, गार्डचा मृत्यू? रेल्वे मंत्रालय माहिती देताना म्हणाले...
5
NSE नं इन्स्टाग्राम, टेलिग्रामच्या 'या' हँडल्सबाबत दिला इशारा; फसवणूक करणारे नंबर्सही केले जारी
6
चाळिशीनंतर स्वत:ला जपा! महिलांना 'या' आजारांचा मोठा धोका; दुर्लक्ष करणं बेतेल जीवावर
7
अनंत अंबानी-राधिका मर्चंटचे प्री-वेडिंग शूट करणाऱ्या फोटोग्राफरचे मानधन किती? जाणून घ्या
8
सावधान! पावसाळ्यात समोसा, वडापाव खाणं पडू शकतं महागात; 'या' आजारांचा सर्वाधिक धोका
9
Market Cap: मुकेश अंबानींच्या रिलायन्सची हवा, LICची ही झाली मोठी कमाई; TCS सह 'या' कंपन्यांना नुकसान
10
'फादर्स डे' निमित्त जिनिलीयाने लिहिलेली पोस्ट वाचून रितेश देशमुख म्हणाला - 'बायको तुझ्याशिवाय...'
11
Munjya Box Office Collection : बॉक्स ऑफिसवर 'मुंज्या'चं राज्य; १० दिवसात मोडला 'मैदान'चा लाइफटाइम कलेक्शनचा रेकॉर्ड
12
नागपुरात परत हिट ॲंड रन, फुटपाथवर झोपलेल्या आठ जणांना मद्यधुंद कारचालकाने चिरडले, दोघांचा मृत्यू
13
Sanjay Raut : "रवींद्र वायकर यांचा विजय खरा नाही, विजयी करणारा फोन पोलीस स्टेशनमधून बदलण्याचा प्रयत्न"
14
ईदनिमित्त दुर्गाडी देवीच्या दर्शनासाठी बंदी; शिवसेना शिंदे गट - ठाकरे गटाचे घंटानाद आंदोलन
15
"मी स्वत:च नकार दिला..."; मोदींच्या मंत्रिमंडळात स्थान न मिळताच भाजपा नेत्याचा मोठा खुलासा
16
Modi 3.0 Budget : पहिल्या अर्थसंकल्पात नोकऱ्यांवर भर देण्याची शक्यता; PLI स्कीम, लघु उद्योगांना मिळणार प्रोत्साहन
17
सूर्य तळपतोय! उष्णतेचा प्रकोप ठरतोय जीवघेणा; उत्तर प्रदेशमध्ये ३३ जणांचा मृत्यू
18
गुरपतवंत सिंग पन्नूनच्या हत्येचा कट रचणाऱ्या आरोपीचे प्रत्यार्पण, चेक रिपब्लिकमधून निखिल गुप्ता अमेरिकेत
19
Success Story : एकेकाळी ₹२५० साठी करायचे काम, १२वी मध्ये दोनदा अपयश; आता उभी केली ₹१ लाख कोटींची कंपनी
20
'अभिनेत्री' आलिया भट झाली 'लेखिका', स्वतःच्या पहिल्या पुस्तकाचं केलं प्रकाशन! काय आहे विषय?

पार्से पेडणे येथे चिरेखाणीत बुडालेल्या विद्यार्थ्यांच्या कुटूंबियांना 16 लाखांची नुकसान भरपाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2020 7:03 PM

राष्ट्रीय हरित लवाद; पर्यावरण हानीचीही पडताळणी करा

मडगाव: मागच्या वर्षी पार्से पेडणे येथे बेवारस स्थितीत टाकून दिलेल्या चिरेखाणीत बुडून 4 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला होता. राष्ट्रीय हरित लवादाच्या दिल्लीतील मुख्य पीठाने या घटनेची गंभीर दखल घेताना प्रत्येक मृत विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 16 लाख रुपये नुकसान भरपाई देण्याचा आदेश गोवा सरकारला दिला आहे.

राष्ट्रीय हरित लवादाच्या दिल्ली पिठाचे न्या. शिवकुमार सिंग आणि डॉ. सत्यमसिंग गबऱ्याल यांचा पीठाने हा निर्णय दिला असून गोवा सरकारच्या खाण खात्याने ही रक्कम द्यावी आणि नंतर प्रदूषण करणाऱ्या त्या खाणीच्या मालकाकडून ती वसूल करावी असे या आदेशात म्हटले आहे.

मागच्या वर्षी 14 सप्टेंबर रोजी ही दुर्घटना घडली होती. पार्से येथे खुल्या अवस्थेत सोडून दिलेल्या खाणीत पेडणे येथील डॉन बॉस्को हायस्कुलच्या विद्यार्थी गृहात राहणारे चार विद्यार्थी पाय घसरून आत पडल्याने त्यांना बुडून मरण आले होते. यानंतर गोवा पर्यावरण संरक्षण या संघटनेने हे प्रकरण हरित लवादाकडे नेताना अशा बेवारस खाणीवर कारवाई करावी अशी मागणी केली होती. पेडणे तालुक्यात अशा किमान 25 बेवारस खाणी तशाच सोडून दिल्याचे त्यांनी लवादाच्या लक्षात आणून दिले होते.

राष्ट्रीय लवादाने एकूण सात वेगवेगळ्या प्रकरणाची एकत्रित सुनावणी घेतली. पेडणेच्या त्या खाणीबद्दल निवाडा देताना दोन वर्षांपूर्वी चालू असलेल्या पण आता बंद असलेल्या या खाणीमूळे पर्यावरणीय हानी किती झाली आहे त्याची तपासणी राज्याच्या प्रदूषण नियंत्रण मंडळाने करावी आणि पर्यावरणीय नुकसान भरपाईची रक्कम निश्चित करावी असे निर्देश दिले आहेत. सुनावणीच्या दरम्यान राज्य सरकारने अशा बेवारस खुल्या  खाणींना जल संसाधन खात्याकडून कुंपण घालण्यात येणार असून या खाणी बुजवून टाकण्यासाठी उपाययोजना हाती घेण्याची हमी लवादाला दिली होती.

दरम्यान कर्नाटकातील रेती उत्खनना संधार्भात लवादाने महत्वपूर्ण निर्देश दिले आहेत. या उत्खननासाठी केवळ दोन जेसीबीचाच उपयोग व्हावा. पूल, जलवाहिनी आणि जलपुरवठा प्रकल्प यापासून 500 मीटर क्षेत्रात रेती काढली जाऊ नये तसेच जमिनीतील पाण्याच्या पातळीच्या खाली हे उत्खनन करता कामा नये असे बजावले आहे. या अटींची पूर्तता होते की याची संबंधीत अधिकाऱ्यांनी महिन्यात एकदा तपासणी करावी आणि पर्यावरणीय परिणामाचा दर वर्षी अभ्यास व्हावा अशा सूचना केल्या आहेत.

टॅग्स :goaगोवाPramod Sawantप्रमोद सावंत