शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

गुन्हेगारी मुक्त गोमंतक करण्यासाठी पोलिसांबरोबर नागरिकांनीसुद्धा जबाबदारी स्वीकारावी - मुख्यमंत्री डॉ.प्रमोद सावंत यांचं आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2023 20:10 IST

Pramod Sawant: गुन्हेगारी लोकांवर वचक ठेवायची असल्यास फक्त पोलीसांनी आपली जबाबदारी निभावली म्हणून होणार नाही,तर एक नागरिक म्हणून सुद्धा प्रत्येक गोमंतकीयानी आपली जबाबदारी पेलायला हवी.

फोंडा-  गुन्हेगारीमुक्त गोमंतक हे आमच्या सरकारचे स्वप्न असून त्या संदर्भात पोलीस यंत्रणेला सर्व ते सहकार्य व अधिकार देण्यात आले आहेत. गुन्हेगारी लोकांवर वचक ठेवायची असल्यास फक्त पोलीसांनी आपली जबाबदारी निभावली म्हणून होणार नाही,तर एक नागरिक म्हणून सुद्धा प्रत्येक गोमंतकीयानी आपली जबाबदारी पेलायला हवी. तुम्ही पोलिसांना सहकार्य करा पोलीस तुम्हाला सहकार्य करतील. असे उद्गार मुख्यमंत्री डॉ.प्रमोद सावंत यांनी काढले. 

मार्दोळ येथे नवीन पोलीस स्थानकाचे उद्घाटन गुरुवारी त्यांच्या हस्ते झाले त्यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर क्रीडामंत्री गोविंद गावडे, पोलीस महासंचालक जसपाल सिंग, पोलीस महानिरीक्षक ओमवीर सिंह बिष्णोई, उपस्थित होते.

 यावेळी बोलताना मुख्यमंत्री पुढे म्हणाले की 'गोव्यातील गुन्हेगारी कमी होत आहे. त्याच बरोबर झालेल्या गुन्ह्यांच्या तपास पातळीत व गुन्हेगारांना शिक्षा होण्याच्या प्रमाणात सुद्धा गोव्याच्या पाचवा क्रमांक आहे. आम्हाला ह्यात अजून प्रगती करायची आहे. या दिवसात जी काही प्रकरणे पघडली आहेत त्यामध्ये इतर भागातून आलेल्या लोकांनी गुन्हेगारांचे नाव प्रकर्षाने येत आहे.ह्यावर आळाबंद घालण्यासाठी लोकांनी आपली घरे किंवा सदनिका भाडेपट्टीवर देताना भाडेकरूंची संपूर्ण माहिती मिळवावी. त्यांचे कागदपत्रे पोलिसांकडे सुपूर्द करावी. अन्यथा आपल्या राज्यात चोरी करून किंवा गुन्हे करून लोक इथे येतील आणि निवांतपणे राहतील.  एक दिवस हेच गुन्हेगार मग घर मालकाच्या घरात सुद्धा चोरी किंवा इतर गुन्हे करू शकतात .तेव्हा प्रत्येकाने सजग राहणे गरजेचे आहे. गुन्हेगारी जगतात मूळ गोमंतकीयांची नावे क्वचितच येतात हे सुद्धा लक्षात घेण्यासारखे आहे. 

आज गोव्याचे पोलीस सुद्धा गुन्हेगारी संदर्भात जागृता निर्माण व्हावी म्हणून वेगवेगळे कार्यक्रम राबवत आहेत. ही चांगली गोष्ट आहे. गुन्हे घडूच नये म्हणून काय करता येईल ह्या गोष्टीवर या कार्यक्रमांमध्ये भर देण्यात येत आहे.

सायबर विषयक गुन्ह्यात दिवसेंदिवस वाढ होत आहे हे सरकारच्या लक्षात आले आहे. गोमंतकीय जनता सायबर विषयक गुन्ह्यात भरडली जाऊ नये म्हणून आम्ही तो विभाग सक्षम केला आहे. त्या विभागाला आधुनिकतेची जोड देण्यात आली असून ,24 तास विभाग सजग कसा राहील याकडे लक्ष देण्यात येत आहे. लोकांनी सुद्धा आमिषाना बळी न पडता सद्विवेक बुद्धी वापरावी. ऑनलाईन पध्दतीने पैसे हडप करणारे लोक वेगवेगळे हातखंडे वापरत आहेत तेव्हा लोकांनी ह्या बाबतीत सजत राहावे.

टॅग्स :Pramod Sawantप्रमोद सावंतgoaगोवाPoliceपोलिस