शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत ठाकरे बंधू युतीत शरद पवारांची राष्ट्रवादी सहभागी होणार?; २२ जागांचा देणार प्रस्ताव
2
नोकरी बदलणाऱ्यांना EPFO चा मोठा दिलासा! 'ब्रेक'बाबतचे नियम बदलले; आता शनिवार-रविवारची सुट्टी अडथळा ठरणार नाही
3
दादरमध्ये अजब प्रकार, एक तरुण या इमारतीवरुन त्या इमारतीवर मारतोय उड्या; पोलिसांची दमछाक
4
अमेरिकेतील नॉर्थ कॅरोलिनामध्ये जेट विमानाचा अपघात; संपूर्ण कुटुंबच उद्ध्वस्त
5
'...तर त्यांचा एक हात तोडून दुसऱ्या हातात दिला असता'; इम्तियाज जलील मंत्री संजय निषाद यांच्यावर संतापले
6
डेमोक्रेट्सच्या खासदारांनी जारी केले एपस्टीनचे ६८ नवीन फोटो; महिलेसोबत दिसले बिल गेट्स
7
मुंबई विमानतळाची गोपनीय माहिती चोरट्यांच्या हाती; ऐरोलीतील घटना : अदानी ग्रुपच्या मॅनेजरचा लॅपटॉप चोरीला
8
मी सर्वांसमोर तिला चुकीच्या पद्धतीने का किस करेल? ट्रोल झाल्यावर राकेश बेदींनी दिलं स्पष्टीकरण
9
उस्मान हादी यांच्या मृत्यूनंतर बांग्लादेश पेटला, कट्टरपंथांनी भारताचे नाव घेतले; शेख हसीना यांच्या सरकारला हादीनेच दिले होते हादरे
10
राज्यातील पहिले 'जेन झी टपाल' आयआयटी मुंबईत; कार्यालयामध्ये नवीन सुविधांसह डिजिटल सेवा
11
'या' कंपनीच्या गुंतवणूकदारांना ₹५५,५५० कोटींपेक्षा अधिकचा फटका; १६ महिन्यांत स्टॉक ८० टक्क्यांनी आपटला
12
'राहुल गांधींचं काम केलं, तुमचं नाही केलं तर लोक म्हणतील...'; नितीन गडकरींनी प्रियंका गांधींना खाऊ घातली स्पेशल डिश
13
Vijay Mallya : देशातून फरार, पण लंडनमध्ये मात्र जोरदार सेलिब्रेशन; ललित मोदीच्या घरी झाली विजय माल्ल्याची जंगी बर्थ डे पार्टी
14
आज होणार धमाका! महिलेच्या शरीरावर कांदबरीतील ओळीचं लिखाण, १८ वर्षीय मुलीचा इतका 'रेट' लावला
15
कोकाटेंचा राजीनामा स्वीकारला; सदनिका घोटाळ्यात अटक वॉरंट निघताच आधी खाती काढून घेतली अन् आता…
16
संपादकीय : सरकारच्या प्रतिमेचे काय? डागाळलेली प्रतिमा अन् सत्तेची अपरिहार्यता
17
विखुरलेले विरोधक : भाजपचा कॅल्क्युलेटर ऑन! भावनिक लाट ओसरली, आता गणिताची लढाई!
18
बांगलादेशात मोठा गोंधळ! बंडखोरांचा नेता हादी यांचा मृत्यू; दंगली उसळल्या, लोकांनी तोडफोड आणि जाळपोळ केली सुरू
19
"छापा नाही, केवळ रुटीन व्हेरिफिकेशन...", शिल्पा शेट्टीच्या वकिलांनी छापेमारीचं वृत्त फेटाळलं
20
आजचे राशीभविष्य, १९ डिसेंबर २०२५: आर्थिक लाभ होईल, कार्यालयात संघर्ष किंवा मतभेदाचे प्रसंग येतील
Daily Top 2Weekly Top 5

बागायतदारांकडून काजूची निवड तर कारखानदारांनी काजू घेणे केले बंद; अवकाळी पावसाने काजू बिया पडल्या काळ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2024 15:41 IST

गेल्या आठवड्यात राज्यभर झालेल्या अवकाळी पावसामुळे काजू बिया खराब झाल्या आहेत. अजूनही काही काजू उत्पादकांना काजू मिळत आहेत.

नारायण गावस -

पणजी: सध्या राज्यात काजू हंगाम संपला तरी ही अजून काजू बागायतदारांना काजू मिळत आहेत. पण अवकाळी पावसामुळे काजू बिया कुजल्याने काळे पडले आहेत. पण आता काजू कारखानदारांनी काजू घेणे बंद केले आहे. गाेवा बागायदारमध्ये काजू घेतले जात असले तरी त्या काजू बिया निवडल्या जात आहे. यामुळे काजू उत्पादकांना फटका बसला आहे.

बागायतदारामध्ये काजूची निवडगेल्या आठवड्यात राज्यभर झालेल्या अवकाळी पावसामुळे काजू बिया खराब झाल्या आहेत. अजूनही काही काजू उत्पादकांना काजू मिळत आहेत. गावठी काजू उशीरा लागल्याने त्याचे उत्पादन आता मिळत आहे. पण पावसामुळे हे काजू बिया काळ्या झाल्या आहेत. त्यामुळे कारखानदारांनी काजू बिया खरेदी करणे  बंद केले आहे. गाेवा बागायतदारमध्ये घेतले जात आहे पण तेथेही  काजू बिया निवडल्या जात आहेत. फक्त चांगले काजू घेतले जात आहे. त्यामुळे  शेतकऱ्यांना याचे नुकसान झाले आहे. जर १० किलो काजू विक्रीस आणले तर त्यातील ५ किलो काजू  खराब म्हणून काढले जातात.

या वर्षी अगोदरच काजूचे उत्पादन घटले आहे. यंदा ५० टक्क्यांनी काजू उत्पादन घटले त्यात दरही कमी  मिळाला. यावर्षी १११ ते ११५ पर्यंत काजू प्रती किलो दर मिळाला. गेल्या वर्षी तो १२५ हाेता. त्यामुळे काजू उत्पादकांनी निराशा व्यक्त केली. काही डोंगराळभागात काजू आता पुन्हा लागले आहेत. पण आता हंगाम संपल्याने दर मिळत नाही. काही ठिकाणी १०० रुपये प्रती किलोने  घेतले जात आहे. बागायतदारमध्ये दर असला तरी तिथे चांगल काजू घेतला जातो याचा फटका काजू उत्पादकांना बसतो. त्यामुळे  सर्वच काजू उत्पादक यंदा  नुकसानीत सापडले आहे.

काणकोणचे काजू उत्पादक सुर्यकांत वेळीप म्हणाले आमच्या कलमी काजू सुरुवातीला लागले होते. त्याला फक़्त १११ रुपये प्रति  किलाे दर  मिळाला. आता मे महिन्यात गावठी काजूचे उत्पादन मिळत आहे. पण गेल्या आठवड्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे काजू बिया काळ्या पडल्याने कारखानदार घेत नाही. तर बागायतदारमध्ये काजू बिया  निवडल्या जात आहेत. त्यामुळे याेग्य दर मिळत नाही उलट नुकसान झाली आहे.

डिचोलीचा काजू उत्पादक  कृष्णा गावकर म्हणाले यंदा अगोदरच उत्पादन घटले त्यात दरही तुटपूंजा मिळाला. आता अवकाळी पावसाने काजू उत्पादन खराब झाले. मे पूर्ण महिना उत्पादन मिळाले असते. पण मध्येच पडलेल्या अवकाळी  पावसामुळे काजू  बिया खराब झाल्या ते आता कुणीही घेत नाही.  यामुळे आमची नुकसान झाली आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीRainपाऊस