शहरं
Join us  
Trending Stories
1
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
2
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
3
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
4
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
5
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
6
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
7
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
8
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
9
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
10
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
11
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
12
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
13
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
14
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
15
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
16
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
17
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
18
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
19
Thane Fire: ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
20
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
Daily Top 2Weekly Top 5

बागायतदारांकडून काजूची निवड तर कारखानदारांनी काजू घेणे केले बंद; अवकाळी पावसाने काजू बिया पडल्या काळ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2024 15:41 IST

गेल्या आठवड्यात राज्यभर झालेल्या अवकाळी पावसामुळे काजू बिया खराब झाल्या आहेत. अजूनही काही काजू उत्पादकांना काजू मिळत आहेत.

नारायण गावस -

पणजी: सध्या राज्यात काजू हंगाम संपला तरी ही अजून काजू बागायतदारांना काजू मिळत आहेत. पण अवकाळी पावसामुळे काजू बिया कुजल्याने काळे पडले आहेत. पण आता काजू कारखानदारांनी काजू घेणे बंद केले आहे. गाेवा बागायदारमध्ये काजू घेतले जात असले तरी त्या काजू बिया निवडल्या जात आहे. यामुळे काजू उत्पादकांना फटका बसला आहे.

बागायतदारामध्ये काजूची निवडगेल्या आठवड्यात राज्यभर झालेल्या अवकाळी पावसामुळे काजू बिया खराब झाल्या आहेत. अजूनही काही काजू उत्पादकांना काजू मिळत आहेत. गावठी काजू उशीरा लागल्याने त्याचे उत्पादन आता मिळत आहे. पण पावसामुळे हे काजू बिया काळ्या झाल्या आहेत. त्यामुळे कारखानदारांनी काजू बिया खरेदी करणे  बंद केले आहे. गाेवा बागायतदारमध्ये घेतले जात आहे पण तेथेही  काजू बिया निवडल्या जात आहेत. फक्त चांगले काजू घेतले जात आहे. त्यामुळे  शेतकऱ्यांना याचे नुकसान झाले आहे. जर १० किलो काजू विक्रीस आणले तर त्यातील ५ किलो काजू  खराब म्हणून काढले जातात.

या वर्षी अगोदरच काजूचे उत्पादन घटले आहे. यंदा ५० टक्क्यांनी काजू उत्पादन घटले त्यात दरही कमी  मिळाला. यावर्षी १११ ते ११५ पर्यंत काजू प्रती किलो दर मिळाला. गेल्या वर्षी तो १२५ हाेता. त्यामुळे काजू उत्पादकांनी निराशा व्यक्त केली. काही डोंगराळभागात काजू आता पुन्हा लागले आहेत. पण आता हंगाम संपल्याने दर मिळत नाही. काही ठिकाणी १०० रुपये प्रती किलोने  घेतले जात आहे. बागायतदारमध्ये दर असला तरी तिथे चांगल काजू घेतला जातो याचा फटका काजू उत्पादकांना बसतो. त्यामुळे  सर्वच काजू उत्पादक यंदा  नुकसानीत सापडले आहे.

काणकोणचे काजू उत्पादक सुर्यकांत वेळीप म्हणाले आमच्या कलमी काजू सुरुवातीला लागले होते. त्याला फक़्त १११ रुपये प्रति  किलाे दर  मिळाला. आता मे महिन्यात गावठी काजूचे उत्पादन मिळत आहे. पण गेल्या आठवड्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे काजू बिया काळ्या पडल्याने कारखानदार घेत नाही. तर बागायतदारमध्ये काजू बिया  निवडल्या जात आहेत. त्यामुळे याेग्य दर मिळत नाही उलट नुकसान झाली आहे.

डिचोलीचा काजू उत्पादक  कृष्णा गावकर म्हणाले यंदा अगोदरच उत्पादन घटले त्यात दरही तुटपूंजा मिळाला. आता अवकाळी पावसाने काजू उत्पादन खराब झाले. मे पूर्ण महिना उत्पादन मिळाले असते. पण मध्येच पडलेल्या अवकाळी  पावसामुळे काजू  बिया खराब झाल्या ते आता कुणीही घेत नाही.  यामुळे आमची नुकसान झाली आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीRainपाऊस