शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेस-भाजपा आणि डावे, निवडणुकीत कट्टर विरोधक आले एकत्र, या पक्षाविरोधात केली आघाडी   
2
असं काय झालं की 'या' देशाने तालिबानी अधिकाऱ्यांना थेट आपल्या देशात 'नो एन्ट्री' म्हटलं?
3
कुटुंबाला भेटायला निघालेल्या पोलीस अधिकाऱ्याला वाटेतच मृत्यूनं गाठलं; कार अपघातात पेटली अन् जागीच...
4
फडणवीस म्हणाले,१० फेऱ्या सुरू, रेल्वेला आयोगाची परवानगी हवी; उरण-नेरूळ-बेलापूर फेऱ्या वाढणार
5
पुतिन यांच्या भारत भेटीने का खूश झाला आहे पाकिस्तानचा 'हा' शेजारी देश? काय फायदा होणार?
6
बाबरी मशिदीच्या पायाभरणीवरून बंगालमध्ये वाद, विटा घेऊन निघाले हुमायूं कबीर यांचे समर्थक  
7
अनिल अंबानी यांची आणखी १,१२० कोटींची मालमत्ता जप्त; मुदत ठेवी, शेअर्सचाही समावेश
8
SMAT 2025 : डॉक्टरांमुळे इंदूरमध्ये क्रिकेटर्सची गैरसोय! आता पुण्यात रंगणार टी-२० चा थरार; कारण...
9
एसयूव्ही कार्स खरेदी करण्यासाठी सुवर्णकाळ! 'या' मॉडेल्सवर मिळतोय बंपर डिस्काउंट; एकीवर तर ३.२५ लाखांची सूट
10
संबंध नसलेल्यांचे एसआरएवर नियंत्रण, राजकारण्यांना उच्च न्यायालयाचा टोला
11
IndiGo: पाणी नाही, जेवण नाही, कॅप्टनही गायब; इंडिगोच्या प्रवाशानं काढलेला व्हिडीओ एकदा बघाच!
12
Accident: अयोध्येला जाणाऱ्या भाविकांच्या वाहनाला अपघात, जळगावची महिला ठार
13
१२ डिसेंबरपासून उघडतोय 'हा' आयपीओ; आतापासूनच ₹३५० च्या नफ्यावर पोहोचलाय GMP
14
Dhurandar Box Office: रणवीर सिंगच्या 'धुरंदर'ने पहिल्याच दिवशी धुव्वा उडवला! बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
15
Airfares Soar: मुंबई-पुणे विमानासाठी मोजा ६७,५०० रुपये; अन्य कंपन्यांनी प्रवाशांना प्रचंड लुटले
16
लग्नाचे कायदेशीर वय गाठलेले नसले तरीही ते दोघे स्वेच्छेने लिव्ह-इनमध्ये राहू शकतात; उच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निकाल
17
५३१ धावांचं आव्हान, सातव्या विकेटसाठी विक्रमी भागीदारी, विंडीजकडून जोरदार पाठलाग, अखेरीस असा लागला निकाल  
18
महायुतीत आधी लढाई, आता नरमाई; भाजप-शिंदेसेनेत आता होणार चर्चा
19
धक्कादायक माहिती! गुजरातमधील मतदार याद्यांत १७ लाख मृतांची नावे
20
घटस्फोटाच्या ४ महिन्यानंतर मराठमोळ्या अभिनेत्रीने बांधली दुसऱ्यांदा लग्नगाठ, फोटो आला समोर
Daily Top 2Weekly Top 5

बांबोळी-भोमा राष्ट्रीय महामार्ग अडकणार कायद्याच्या कचाट्यात; सर्वोच्च न्यायालयात हस्तक्षेप याचिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2025 11:15 IST

रुंदी निकषांनुसार नसल्याचा आरोप, सुदीप ताम्हणकर यांची याचिका

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: बांबोळी व भोमा तसेच राज्यातील अन्य राष्ट्रीय महामार्गावर वारंवार होणाऱ्या अपघातांच्या घटनांवर सामाजिक कार्यकर्ते सुदीप ताम्हणकर यांनी सर्वोच्च न्यायालयात हस्तक्षेप याचिका दाखल केली आहे.

राष्ट्रीय महामार्गाच्या निकषांनुसार महामार्गाची रुंदी ही ७५ मीटर इतकी असणे आवश्यक आहे. मात्र गोव्यात जागेची कमतरता असल्याचे कारण पुढे करुन येथील महामार्गाची रुंदी ही केवळ ४५ मीटर इतकी आहे. तर प्रस्तावित भोमा येथील मार्गाची रुंदी ही २५ मीटर ठेवण्याचा प्रस्ताव आहे. असे झाले तर अपघात तसेच वाहतूक कोंडीस ते आमंत्रण देणारे ठरेल. त्यामुळे त्याची दखल घ्यावी, अशी मागणी आपण सर्वोच्च न्यायालयाकडे केल्याचे ताम्हणकर यांनी सांगितले. 

७५ मीटर रुंदीचा नियम

महामार्गाची रुंदी ही नियमांनुसार ७५ मीटर इतकीच असावी. रुंदी २५ मीटर करु नये. गोवा राज्यात एकूण अपघात प्रवण क्षेत्र २५ आणि १४ ब्लॅक स्पॉट्स आहेत. यात उत्तर गोव्यात २ अपघात प्रवण क्षेत्र ११ आणि ४ ब्लॅक स्पॉट्स. आहेत. तर दक्षिण गोव्यात अपघात प्रवण क्षेत्र १४ आणि १० ब्लॅक स्पॉट्स असल्याचे ताम्हणकर यांनी सांगितले.

राजस्थान येथील राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या भीषण अपघातानंतर सर्वोच्च न्यायालयाने स्वेच्छा दखल घेतली असून सर्व राज्यांकडून त्यांनी महामार्गावर घडणाऱ्या अपघातंची माहिती मागितली आहे. यात राष्ट्रीय महामार्ग हा त्याच्या निकषांनुसारच व्हावा, यासाठी अहवाल मागवला जात आहे.

१० महिन्यात १९५ ठार

राज्यात बांबोळी, भोमा तसेच अन्य राष्ट्रीय महामार्गावर वारंवार अपघाताच्या घटना घडत आहेत. २०२४ साली २ हजार ६८२ रस्ते अपघात घडले. त्यात २८६ जण ठार झाले, तर १ हजार २४ जण किरकोळ जखमी झाले, शिवाय २७१ गंभीर जखमी झाले होते. तर जानेवारी ते ऑक्टोबर २०२५ या कालावधीत १ हजार ९२४ रस्ता अपघात झाले असून १९५ जणांचा मृत्यू झाला तर ८२४ किरकोळ जखमी झाले असून १८१ जण गंभीर जखमी झाल्याचे त्यांनी सांगितले.

गडकरी यांचे उत्तर आम्हाला अमान्य; भोमवासीय आक्रमक

राष्ट्रीय महामार्ग विस्तारीकरणाच्या नावाखाली आमचा भोम गाव नष्ट होऊ देणार नाही. लोकसभेत केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिलेले लेखी उत्तर हे दिशाभूल करणारे आहे. आम्ही त्यावर असहमती दर्शवतो, असे भोमच्या ग्रामस्थांनी स्पष्ट करत तीव्र संताप व्यक्त केला.

भोम महामार्ग विस्तारीकरणाचा विचार हा सर्व पर्यायांचा विचार करुनच केला आहे. वारसा स्थळांना कुठलाही धक्का पोचू देणार नाही, असे लेखी उत्तर गडकरी यांनी दिले होते. प्रत्यक्षात त्यांचे हे उत्तर चुकीचे आहे. लोकांची घरे, शेती नष्ट करुन केवळ वारसा स्थळांचे रक्षण करुन हा महामार्ग उभारण्याची प्रक्रिया पार पाडली जात आहे. घरेच नसतील तर मग गाव कसला? असा प्रश्नही ग्रामस्थांनी उपस्थित केला.

यावेळी संजय नाईक म्हणाले, खासदार विरियातो फर्नाडिस यांनी भोमचा विषय लोकसभेत उपस्थित केला. मात्र खासदार श्रीपाद नाईक याप्रश्नी मौन बाळगून आहेत. २०२१ च्या प्रादेशिक योजनेत नमूद केलेल्या पर्यायी संरेखन आणि वारसा व धार्मिक स्थळे टाळण्यासाठी खाजन जमिनींतून पर्यायी मार्गाचा सरकारने विचार केल्याचे गडकरी यांनी उत्तरात नमूद केले आहे. मात्र आम्हाला त्यांचे हे उत्तर मान्य नसल्याचे त्यांनी सांगितले.

English
हिंदी सारांश
Web Title : Bambolim-Bhoma Highway Faces Legal Hurdle; Intervention Petition Filed in Supreme Court

Web Summary : A petition challenges the 45-meter highway width, citing accident risks. Activists highlight Goa's accident-prone zones and demand adherence to the 75-meter standard. Villagers oppose expansion harming homes, rejecting the minister's assurance of heritage site protection, emphasizing the need for alternative routes.
टॅग्स :goaगोवाSupreme Courtसर्वोच्च न्यायालयhighwayमहामार्ग