शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

अलंकार पर्रीकरांचा आवडीचे खाद्याचे स्थळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2019 17:47 IST

संध्याकाळी पाचनंतर येथे सुरु होणारी दवदिवशीची लगबग रात्री उशीरापर्यंत सततची सुरुच असते.

म्हापसा : रात्री-अपरात्रीपर्यंत पोटभर खाण्यासाठी खाद्य मिळणारे प्रसिद्ध असे अलंकार थियटराजवळील परिसरातील स्थळ गोवाभर प्रसिद्ध आहे. या स्थळावरील पदार्थ प्रसिद्ध असल्याने वाटसरू सुद्धा न चुकता येथील पदार्थाची चव चाखण्यासाठी येतात. इतरांप्रमाणे दिवंगत मुख्यमंत्री मनोहर पर्रीकरांना सुद्धा हे स्थळ भावले होते. क्षणभराचा विसावा घेण्यासाठी आपल्या मित्रांसोबत ते सुद्धा तेथील पदार्थाचा आनंद लुटण्यासाठी अनेकदा येत होते. खाद्य पदार्थासाठी पर्रीकरांच्या आवडीच्या स्थळातील एक हे स्थळ होते. 

 

संध्याकाळी पाचनंतर येथे सुरु होणारी दवदिवशीची लगबग रात्री उशीरापर्यंत सततची सुरुच असते. चिकनपासून बनवलेल्या विविध पदार्थात चायनीज तसेच भारतीय पदार्थासोबत, चिकन शाकूती, रस्सा आॅमलेट, वडा-पाव, पाव-भजी, ज्युस असे विविध प्रकारचे पदार्थ इथे उपलब्ध असतात. लोकांची गर्दी सुद्धा या परिसरात रात्रीपर्यंत सुरुच असते. आपल्या मनपसंतीच्या गाड्यासमोर बसून अनेकजण खाताना दिसून येतात. 

येथील व्यवसायीकांनी दिलेल्या माहितीनुसार रात्री ८ नंतर अनेकदा पर्रीकर तेथे येत असत. दिवसभराच्या कामाचा थकवा घालवण्यासाठी ते तेथे येवून क्षणभराच्या विश्रांती बरोबर एखादा पदार्थ घेवून त्यावर ताव मारीत. त्यांचा खाण्याचा पदार्थ ठरलेला नसायचा; पण जो पदार्थ ते मागवत तो आवडीने खात. घेतलेला पदार्थ संपल्यानंतर कधीतरी काजूचे गर, फू्रट सॅलाड ज्युस सुद्धा त्यांना आवडायचा. कधीतरी विशिष्ठ फळांची मागणी सुद्धा त्यांच्याकडून केली जायची. एकदा बसले की किमान तास अर्धा तास तरी ते उठत नसे. तेथे त्यांच्या सोबत आलेल्या त्यांच्या इतर मित्रां सोबत चर्चा रंगलेली असायची. होणारी चर्चा राजकीय सोडून इतर विविध क्षेत्रातील असायची. चर्चेचा विषय रंगला की वेळेचे भान त्यांना नसायचे.  

परिसराला लागून असलेल्या प्रशांत हॉटेलात प्रवेश करुन तेथे बनणारी बिया भाजी किंवा कालवांचे तोणाक तर त्यांच्या मनपसंतीचे होते. बिया भाजीत बिया किंवा कालवांच्या तोणाकात त्यांना कावले दिसली नाही तर मालकाला हळूवारपणे चिमटा सुद्धा काढून प्रकार नजरेला आणून द्यायचे. त्याच्यासोबत ताजे पाव सुद्धा हवे होते.  

हॉटेलचे मालक सुद्धा पर्रीकर येणार म्हणून रात्रीपर्यंत थोडे तरी त्यांच्यासाठी शिल्लक ठेवायचे. फार भूक लागली असेल तरी तळलेल्या मिरच्याची मागणी त्यांच्याकडून केली जायची. बहुतेकवेळा त्यांना साखर नसलेला चहा आवडायचा किंवा बिन दूधाचा चहा सुद्धा ते मागवायचे. हॉटेलचे मालक मोहन तळावलीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार पदार्थ खाल्ल्यानंतर त्या दिवशीची चव कशी होती याचा मुद्दामहून उल्लेख पर्रीकरांकडून केला जायचा. काहीवेळा थट्टा मस्करी करताना आजच्यापेक्षा कालची चव काही वेगळीच होती असे  मिश्कीलपणे सांगायचे. त्यांच्यासाठी एक वेटर दिला जायचा. 

तळावलीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार मागील किमान ३० वर्षांपासून ते सततपणे यायचे. सुरुवातीला त्यांच्या येण्यात नियमीतपणा होता; पण कालांतराने त्यांच्या वाढत्या व्यापामूळे येण्याचे प्रकार कमी झाले. तरी फक्त वेळात वेळ काढून भूक लागल्यास वेळात वेळ काढून येवून एखादा पदार्थ खावून लवकर निघून जायचे. राजकारणात पूर्णपणे व्यस्थ झाल्यानंतर त्यांचे येण जवळ जवळ बंद झाले होते. तरी सुद्धा आले तर मध्यरात्रीनंतर लोकांची वर्दळ कमी झाल्यावर यायचे. जाताना कधीतरी बोलून जायचे बरी जाल्या भाजी आं. रविवारी त्यांचे निधन झाल्याचे कळताच अनेकांनी आपले व्यवसाय सुद्धा बंद ठेवले होते. 

टॅग्स :Manohar Parrikarमनोहर पर्रीकर