शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाचे २५-३० आमदार फोडण्याचं उद्धव ठाकरेंचं प्लॅनिंग झालं होतं; एकनाथ शिंदेंचा नवा दावा
2
"संविधान बदलण्यासाठी 400 जागांचा नारा पण 150 जागाही मिळणार नाहीत"; राहुल गांधींचं टीकास्त्र
3
Kangana Ranaut : "निवडणूक जिंकली तर..."; बॉलिवूड क्वीन कंगना राणौतची फिल्मी करिअरबाबत मोठी घोषणा
4
बारामतीत गुंडांकडून प्रचार, रोहित पवार आणि अमोल मिटकरी आमने-सामने, गंभीर आरोप प्रत्यारोप
5
Lok Sabha Election 2024 : महाराष्ट्रातील खासदारांचं प्रगतीपुस्तक; लोकसभेत कशी राहिली कामगिरी?
6
'घरी जा, टीव्हीवर पाहा, माल पकडताहेत मोदी...'; झारखंडच्या छाप्यात नोटांच्या ढिगाऱ्याबाबत पंतप्रधान म्हणाले,...
7
रोकड पाहून अधिकारी चक्रावले; ED च्या छापेमारीवर काँग्रेस नेते आलमगीर यांची पहिली प्रतक्रिया
8
राज ठाकरेंच्या नावाचा विचार करावा, आनंद दिघेंच्या 'त्या' विधानानंतर काय घडलं?; CM शिंदेंचा गौप्यस्फोट
9
“पंतप्रधान मोदींना यावे लागते, महाराष्ट्रातील पराभव महायुतीला स्पष्ट दिसतो आहे”: अमोल कोल्हे
10
Acharya Pramod Krishnam : "जो PM मोदींसोबत नाही, तो देशद्रोही", आचार्य प्रमोद कृष्णम यांच्या विधानावरून वाद
11
व्हॉट्सॲपच्या एका फिचरवरुन सरकारसोबत वाद, भारतात WhatsApp बंद होणार?
12
एका दिवसात ₹११७० कोटींनी कमी झाली Rekha Jhunjhunwala यांची संपत्ती, टाटाचा 'हा' शेअर आपटला
13
मोठी दुर्घटना! बॉल समजून बॉम्ब उचलला, ब्लास्टमध्ये लहान मुलाचा मृत्यू, 3 जखमी
14
“RSS-हेमंत करकरे यांच्यात संघर्ष, संघाचे लोक माझ्याकडे यायचे अन्...”; राऊतांचा मोठा दावा
15
T20 World Cup : बाबरने केली रोहितची कॉपी; वर्ल्ड कप जिंकण्यासाठी पाकिस्तानची सांगितली रणनीती
16
'साहेब, तब्येतीला जपा! विजय तुमच्या पायावर आणून ठेवतो',शरद पवारांसाठी बजरंग सोनवणेंची पोस्ट
17
Narendra Modi : "भाजपा जे बोलते, ते करून दाखवते"; ओडिशामध्ये पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
18
Income Tax Saving Tips: EEE कॅटेगरीत येतात 'या' ४ स्कीम्स, यात पैसे गुंतवाल तर ३ पद्धतीनं वाचेल टॅक्स
19
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: बुध म्हणजे 'राजकुमार'; उत्तम वाणी, प्रखर बुद्धी, चिरतारुण्याचं वरदान
20
‘पुंछमध्ये IAF च्या ताफ्यावर झालेला हल्ला ही स्टंटबाजी, जेव्हा निवडणुका येतात तेव्हा..’ काँग्रेस नेते चरणजीत सिंग चन्नी यांचं विधान

अहेरीत भाजपची लॉटरी कुणाला लागणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2019 6:00 AM

राजघराणे म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आत्राम घराण्याचे अहेरी मतदार संघावर आतापर्यंत वर्चस्व राहिले आहे. विद्यमान आमदार अम्ब्रिशराव हे सध्या या राजघराण्याच्या गादीचे वारसदार म्हणून विराजमान आहेत. गेल्यावेळी भाजपच्या तिकीटवर पहिल्यांदाच विधानसभा लढल्यानंतर युवा आणि फ्रेश उमेदवार म्हणून त्यांच्या बाजुने मतदारांनी कौल दिला.

ठळक मुद्देकार्यकर्ते संभ्रमात : बाबा, दादा की राजेंनाच मिळणार पुन्हा संधी

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यातील तीनही विधानसभा मतदार संघांपैकी सध्या सर्वाधिक चर्चेत आहे तो अहेरी मतदार संघ. या मतदार संघात ज्या प्रमुख तीन उमेदवारांमध्ये लढत रंगणार असे चित्र आतापर्यंत होते, त्या तीनही उमेदवारांचा डोळा भाजपच्या तिकीटवर आहे. भाजपने त्यांच्यावर आपला गळ टाकत त्यांना आशेवर ठेवले आहे. मात्र ऐनवेळी कोणता निर्णय घेतला जाईल याचा ‘नेम’ नसल्यामुळे भाजपचा हा ‘गेम’ कोणाच्या पथ्यावर पडणार याची चर्चा रंगत आहे.राजघराणे म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आत्राम घराण्याचे अहेरी मतदार संघावर आतापर्यंत वर्चस्व राहिले आहे. विद्यमान आमदार अम्ब्रिशराव हे सध्या या राजघराण्याच्या गादीचे वारसदार म्हणून विराजमान आहेत. गेल्यावेळी भाजपच्या तिकीटवर पहिल्यांदाच विधानसभा लढल्यानंतर युवा आणि फ्रेश उमेदवार म्हणून त्यांच्या बाजुने मतदारांनी कौल दिला. भाजपने त्यांना राज्यमंत्रीपदही बहाल केले. पण लोकसभा निवडणुकीत या मतदार संघात भाजप उमेदवाराला कमी मते पडल्याचे कारण देत त्यांना राज्यमंत्रीपद गमवावे लागले. आता विधानसभेचे तिकीटही त्यांना मिळणार की नाही, अशी शंका उपस्थित आहे. मात्र अम्ब्रिशराव तिकीट आपल्यालाच मिळणार याबद्दल खात्री बाळगून आहेत.तिकडे अम्ब्रिशराव यांना वगळण्याची वेळ आलीच तर पर्याय कोण म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, माजी राज्यमंत्री धर्मरावबाबा यांच्यावर गळ टाकण्यात आला. या मतदार संघावर राजघराण्यातील उमेदवाराचा प्रभाव जास्त राहात असल्यामुळे धर्मरावबाबांचा पर्याय योग्य राहील का, यावर भाजपच्या एका गोटातून प्रस्ताव मांडण्यात आला. पण धर्मरावबाबांनी आपल्या काही अटी टाकल्यामुळे त्यांचा भाजप प्रवेश होणार की नाही, हे अजूनही गुलदस्त्यात आहे. विशेष म्हणजे प्रदेशाध्यक्षांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिवस्वराज्य यात्रेलाही त्यांनी प्रकृती बरी नसल्याचे कारण सांगत अनुपस्थिती दर्शविल्याने धर्मरावबाबांच्या मनात नेमके काय आहे, असा प्रश्न कायम आहे.या मतदार संघाचे एक वेळ नेतृत्व करणारे दीपक आत्राम हे आपल्या आदिवासी विद्यार्थी संघाच्या बॅनरखाली जनसंपर्क ठेवून आहेत. ते राजघराण्यातील नसले तरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून त्यांनी या मतदार संघावर बऱ्यापैकी प्रभाव पाडला आहे. भाजपसारख्या मोठ्या पक्षाचे बॅनर मिळाल्यास विजयाचे गणित सोपे होईल म्हणून तेसुद्धा भाजपचे तिकीट मिळवण्यासाठी प्रयत्नशिल आहेत. खासदार अशोक नेते यांनी चार दिवसांपूर्वी घेतलेल्या या मतदार संघात घेतलेल्या कार्यकर्ता बैठकीत त्यांच्या नावावर चर्चाही झाली. मात्र दोन दिवसांपूर्वी भाजपचे जिल्हाध्यक्ष बदलल्याने दीपक आत्राम यांचे नाव मागे पडण्याची शक्यता आहे.भाजपवर वर्चस्व ठेवणाऱ्या संघाच्या गोटातून मात्र सर्व शक्यतांना बगल देत संदीप कोरेत हे नवीनच नाव पुढे करण्यात आले आहे. कोरेत यांचा जनसंपर्क फारसा नसला तरी संघाचे एकनिष्ठ कार्यकर्ते म्हणून त्यांना पक्षाने संधी द्यावी यासाठी एक गट जोर लावून आहे. वरील तीनही उमेदवारांना हुलकावणी देऊन कोरेत यांना भाजपची तिकीट मिळाली तर या मतदार संघातील लढत आणखी चुरसपूर्ण होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

टॅग्स :BJPभाजपा