शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांचे निधन, ७२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
...तर राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्ष फुटलेच नसते, अमित शाहांचा दावा 
3
"भाजपा 400 चा आकडा पार करू शकणार नाही...", निवडणूक निकालांबाबत ममता बॅनर्जीं केली मोठी भविष्यवाणी
4
"पंतप्रधान मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी समोरची व्यक्ती त्या बरोबरीची असायला हवी"
5
Ghatkopar Hoarding Collapse Update: ८ जणांचा मृत्यू, ६६ जखमी; मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत जाहीर, मुख्यमंत्री Eknath Shinde यांची घोषणा
6
WhatsApp चा मोठा प्लॅन, स्क्रीनशॉट फीचर ब्लॉक होणार!
7
भारताचा इराणसोबत मोठा करार; चीन आणि पाकिस्तानला बसणार मोठा झटका
8
मिलॉर्ड... या दोन मुद्द्यांवर चूक झाली...; EVM-VVPAT प्रकरण पुन्हा सर्वोच्च न्यायालयात
9
KKR vs GT सामन्याचा फैसला झाला! प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद होणारा तिसरा संघ मिळाला
10
सुप्रिया सुळे पक्षाला फार पुढे नेऊ शकत नसल्याची जाणीव झाल्यानेच शरद पवारांनी...; अमित शाह स्पष्टच बोलले
11
बारामतीत EVM मशिन्स ठेवलेल्या स्ट्राँगरुमशी छेडछाड? आरोपानंतर अधिकाऱ्यांकडून आले स्पष्टीकरण
12
मुंबईतील भीषण दुर्घटनेनंतर सीएम-डीसीएम 'ॲक्शन मोड'वर; उच्चस्तरीय चौकशीचे आदेश!
13
बापरे! मुंबईत पेट्रोल पंपावर कोसळलेल्या महाकाय होर्डिंगखाली अडकली ८० वाहने; ३५ जण जखमी
14
नेहरूंच्या चुकांसाठी काँग्रेस मोदींना जबाबदार धरतेय, चीनच्या मुद्द्यावरून जयशंकर यांचा टोला
15
'आप'कडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर, तुरुंगात असलेल्या मनीष सिसोदियासह ४० जणांची नावे
16
मुंबईतील 'तो' महाकाय लोखंडी सांगाडा बेकायदेशीर; २ दिवसांपूर्वीच दिली होती होर्डिंग हटवण्याची नोटीस
17
CSK चा सामना करण्यापूर्वी RCB ची ताकद कमी झाली! दोन तगड्या खेळाडूंनी माघार घेतली 
18
तेजप्रताप यादवांचा संयम सुटला, आरजेडी कार्यकर्त्याला मंचावरून ढकलले
19
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मुंबईतील प्रचार सभेबद्दल सुनील तटकरे म्हणाले- "आता ती जबाबदारी..."
20
25 वर्षांचा रेकॉर्ड मोडला; कलम 370 हटवल्यानंतर पहिल्यांदाच श्रीनगरमध्ये सर्वाधिक मतदान...

यंत्रमानव जे करू शकत नाही तेच आता शिकवावे लागेल - डॉ. अभय बंग 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 08, 2023 6:21 PM

‘दंडकारण्य’च्या सुवर्ण महोत्सवी वर्षाची सांगता

गडचिरोली : आज प्रत्येक गोष्ट इंटरनेटच्या माध्यमातून शिकता येते. एवढेच नाही तर ‘आर्टिफिशिअल इंटेलिजन्स’मुळे स्वयंचलित कारपासून तर माणसांची अनेक कामेही यांत्रिक पद्धतीने होऊ लागली आहेत. त्यामुळे भविष्यात अनेकांच्या नोकऱ्या हिरावल्या जातील. त्यामुळे जे काम यंत्रमानव करू शकणार नाही त्याबद्दलचे शिक्षण देण्याची वेळ आली आहे, असे मत ज्येष्ठ समाजसेवक पद्मश्री डॉ. अभय बंग यांनी येथील विद्याभारती हायस्कूलच्या प्रांगणात आयोजित समारंभात अध्यक्षस्थानावरून बोलताना मांडले.

दंडकारण्य शैक्षणिक व सांस्कृतिक विकास संशोधन संस्थेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या सांगता समारंभाचे आयोजन मंगळवारी केले होते. यावेळी अतिथी म्हणून ज्येष्ठ साहित्यिक रंगनाथ पठारे, सुप्रसिद्ध कादंबरीकार राजन गवस, कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाचे मराठी विभाग प्रमुख डॉ. नंदकुमार मोरे होते.

यावेळी डॉ. बंग यांनी राजन गवस व रंगनाथ पठारे यांनी शिक्षण पद्धतीवर परखडपणे मांडलेल्या विचारांवर प्रकाश टाकताना आजचे शिक्षण विद्यार्थ्यांना कौशल्यापासून दूर नेणारे असल्याचे सांगितले. त्यामुळेच आजच्या मुलांना शेतीची कामेसुद्धा करता येत नाही. देशातील २५ कोटी लोक शिक्षणाच्या इंडस्ट्रीत व्यस्त आणि ग्रस्त असून त्यातून सुशिक्षित बेकारांचा केवळ फौजफाटा तयार होत असल्याचे ते म्हणाले.

यावेळी रंगनाथ पठारे यांनी मातृभाषेपासून दूर नेऊन दिल्या जाणाऱ्या शिक्षण पद्धतीवर टीका केली. परंतु गडचिरोलीसारख्या दुर्गम भागात गोविंदराव मुनघाटे यांनी सुरू केलेली शिक्षणाची परंपरा त्यांची पुढची पिढी चांगल्या पद्धतीने चालवत असल्याबद्दल समाधान व्यक्त केले.

स्वागतपर भाषण डॉ. प्रमोद मुनघाटे यांनी तर प्रास्ताविक प्राचार्य डॉ. राजाभाऊ मुनघाटे यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन प्रा. डॉ. नरेंद्र आरेकर यांनी केले.

जगाकडे पाठ फिरवा, जग तुमच्याकडे तोंड करेल

यावेळी डॉ. बंग यांनी विनोबा भावेंनी सांगितलेले एक वाक्य लक्षात ठेवण्यास सांगितले. ‘जगाकडे पाठ फिरवा, जग तुमच्याकडे तोंड फिरवेल’ या वाक्याची फोड करताना ते म्हणाले, विकासाच्या रांगेत जगाच्या तुलनेत गडचिरोली शेवटच्या नंबरवर आहे. जग पुढे जात असताना तुमचा नंबर शेवटीच लागेल. त्यामुळे त्या रांगेत तुम्ही उलटे फिरा. मी तेच केले, विकसित देशात जाण्याची संधी सोडून मी गडचिरोलीत आलो म्हणूनच लोक मला मानतात, असे मर्मही त्यांनी उघड केले.

लौकिक वाढविणाऱ्यांचा सत्कार

- यावेळी दंडकारण्य शिक्षण संस्थेचा लौकिक वाढविणाऱ्या आणि शिक्षणात मौलिक योगदान देणाऱ्या शिक्षकवृंदांचा सत्कार करण्यात आला. त्यात दादाराव चौधरी, डॉ. अभय साळुंके, प्राचार्य सी. एल. डोंगरवार, प्रतिभा रामटेके, चेतन गोरे, सतीश पवार, मधुकर बोबाटे, अशोक काचिनवार, मारुती कुरवडकर, पंढरी गुरनुले, राजू इंगोले, मनिष बेझलवार, भास्कर चौधरी, रमेश हलामी आणि प्रा. डॉ. नरेंद्र आरेकर यांचा समावेश होता.

- यावेळी चांदाळा येथील आश्रमशाळा, विद्याभारती कन्या हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, तसेच प्रज्ञा संस्कार कॉन्व्हेंट या शाळांना उत्कृष्ट कामगिरीसाठी मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.

टॅग्स :Educationशिक्षणAbhay Bangअभय बंगGadchiroliगडचिरोली