शहरं
Join us  
Trending Stories
1
'पहलगाममध्ये २६ पर्यटकांची हत्या करणारे ते तीन दहशतवादी मारले', अमित शाहांची लोकसभेत माहिती
2
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
3
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
4
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
5
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी
6
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
7
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
8
Operation Mahadev : 'टी ८२' सिग्नल ठरले घातक; सुरक्षा दलांनी वेळेवर गाठले अन् पहलगाम हल्ल्याचे सूत्रधार संपवले!
9
"तीन वर्ष झाले तरी पैसेच मिळाले नाहीत...; मालिकेतील अभिनेत्याचे मंदार देवस्थळीवर आरोप
10
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
11
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
12
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
13
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
14
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
15
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
16
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
17
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
18
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त
19
Mahadevi Elephant: अखेर 'महादेवी' हत्तीणीला निरोप देताना गावकऱ्यांना अश्रू अनावर; नांदणीत लोटला जनसागर
20
आणखी स्वस्त होणार कर्ज; ऑगस्टमध्ये पुन्हा एकदा रेपो दरात RBI कपात करण्याची शक्यता

पाणीबाणी अटळ, २५ टक्केच साठा; दिना धरणातील पातळीत झपाट्याने घट

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2025 14:51 IST

Gadchiroli : जलसंकट उभे ठाकण्याचा धोका; तलावही कोरडे

गोपाल लाजूरकर लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : उन्हाळ्याची चाहूल लागलेली आहे. त्यानुसार जलस्त्रोत झपाट्याने घटत आहेत. जिल्ह्यातील प्रमुख जलस्रोतांमधील जलपातळी कमी होत आहे. विशेष म्हणजे, दीड महिन्यापूर्वी जिल्ह्यात ३९.९६९ टक्के पाणीसाठा उपलब्ध होता. आता यात १४ टक्क्यांनी घट झालेली असून सध्या २५.३६ टक्केच पाणीसाठी प्रमुख सिंचन प्रकल्पामध्ये शिल्लक आहे. भर उन्हाळ्यात जिल्ह्यात पाणीटंचाईचे संकट गडद होण्याची शक्यता आहे.

मागील वर्षी परतीच्या पावसामुळे जलस्त्रोतांमध्ये बऱ्यापैकी पाणी साचले. शेतकऱ्यांना पिकांना पाणी देण्यासाठड़ी तलाव, बोड्या व प्रकल्पांमधील पाण्याची गरज भासली नाही. सध्या तीव्र पाणीटंचाईची समस्या उ‌द्भवलेली नसली तरी उन्हाळ्याच्या दिवसांत जिल्ह्यात पाणीटंचाईची समस्या निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे जिल्ह्यातील जलस्त्रोत व प्रकल्पांतील पाणीसाठा जपून वापरणे हाच पर्याय आहे.

आरमोरी तालुक्यातील कोसरी लघु प्रकल्पात सध्या ८४.१७ टक्के पाणीसाठा आहे. येंगलखेडा लघु प्रकल्पातही ६१.११ टक्के पाणी आहे. सदर प्रकल्पातील पाणी परिसराच्या गावांतील नळ योजनांच्या विहिरींची पाणी पातळी वाढवू शकतात.

५७.७६ टक्के पाणीसाठा उरला मामा तलावांतजिल्ह्यात पाटबंधारे विभागांतर्गत मोठे १५ माजी मालगुजारी तलाव आहेत, तर ९ लघु प्रकल्प आहेत. यापैकी माजी माजगुजारी तलावांमध्ये ५७.७६ टक्के पाणीसाठा आहे. मामा तलावांमध्ये असलेला पाणीसाठा संबंधित गावांच्या जलस्त्रोतातील पाणी पातळी कायम राखण्यासाठी मदत करू शकतात.

पेंटिपाका, अमराजी प्रकल्प कोरडा होणारजिल्ह्यात २ लघु प्रकल्प आहेत. या प्रकल्पातील पाणीसाठा झपाट्याने घटत आहे. लघु प्रकल्पांतील पाणी साठ्याची सरासरी ३८.३० टक्के आहे. विशेष म्हणजे, सिरोंचा तालुक्यातील अमराजी लघु प्रकल्पात २.१६ तर पेंटिपाका लघु प्रकल्पात सध्या २.४६ टक्केच पाणी साठा आहे. उन्हाळ्यात हे प्रकल्प कोरडे होऊ शकतात.

२६ प्रकल्प सिरोंचा तालुक्यात पाणी टंचाईच्या झळाजिल्ह्यात आहेत. पाटबंधारे विभागांतर्गत मोठा एक प्रकल्प, मध्यम एक, लघु तलाव (प्रकल्प) ९ तर माजी मालगुजारी तलाव १५ आहेत.

प्रकल्प                  पाणीसाठादिना                       १२.८२%चिचडोह बॅरेज          २९.८९%येंगलखेडा प्रकल्प    ६१.११%कोसरी प्रकल्प        ८४.१७%

रेगडी परिसरातील पाणी पुरवठा योजना प्रभावितचामोर्शी तालुक्याच्या रेगडी येथील दिना नदीवर बांधलेल्या दिना प्रकल्पात सध्या १२.८२ टक्के एवढाच पाणीसाठा शिल्लक आहे. पावसाळ्यात या प्रकल्पाचे पाणी धान पिकासाठी सोडण्यात आले होते. सदर प्रकल्पाच्या परिसरातील नळ योजनांच्या विहिरी कोरड्या पडू शकतात. रेगडी परिसरातील दिना धरणालगतच्या पाणी योजना प्रभावित होऊ शकतात.

 

टॅग्स :water scarcityपाणी टंचाईDamधरणGadchiroliगडचिरोली