बारमाही रस्त्याची प्रतीक्षा, पावसाळ्यात गावाला बेटाचे स्वरूप
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2025 13:37 IST2025-05-28T13:35:43+5:302025-05-28T13:37:43+5:30
Gadchiroli : स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवातही कर्जेली गाव उपेक्षितच !

Waiting for a perennial road, the village looks like an island during the monsoon
गडचिरोली : सिरोंचापासून ६४ कि.मी. अंतरावर असलेल्या रमेशगुडम ग्रामपंचायत अंतर्गत अतिदुर्गम गाव म्हणून कर्जेली या गावाची ओळख आहे. सिरोंचा तालुक्यातील हे शेवटचेच गाव. विपरीत भौगोलिक परिस्थिती आणि मोजक्याच लोकांची वस्ती, त्यामुळे आतापर्यंत या गावाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी कोणीच पुढाकार घेतला नाही. देश स्वातंत्र्याचा सुवर्णमहोत्सव साजरा करीत असतांना या गावाला स्वातंत्र्याची फळे कधी चाखायला मिळणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
अतिदुर्गम कर्जली या गावाला जाण्यासाठी बारमाही पक्का रस्ताही झालेला नाही. पावसाळ्यात एका बाजूला रमेशगुडम नाला, दुसऱ्या बाजूला बिडरघाट नाला, तिसऱ्या बाजूला इंद्रावती नदी अशा पद्धतीने हे गाव पाण्याने वेढलेले असते. गावातून बाहेर जाण्यासाठी नावेने जावे लागते. आजारी लोकांना, गरोदर मातांना प्राथमिक आरोग्य केंद्र झिंगानूरला नेण्यासाठी नावेने गावातून बाहेर निघून बैलबंडीने मोठी कसरत करून जावे लागते. आठवडी बाजारासाठीसुद्धा नावेने नाला पार करून देचलीपेठाला जावे लागते.
दूरसंचार सेवा तर सोडा, वीजपुरवठा एकदा खंडित झाला की पूर्ववत सुरू होण्यासाठी आठवडा लागतो. त्यामुळे या गावाचा तालुक्याशी नेहमीच संपर्क तुटलेला असतो. या गावाची लोकसंख्या जेमतेम 400 ते 500 असली तन चौथीपर्यंत प्राथमिक रेशनच्य अन्नधान्यासाठी नावेतून शाळा आणि एक अंगणवाडी या जाऊन रमेशगुडमवरून धान्य आणावे गावात आहे. शासन व प्रशासनाच्या योजन गावात पोहोचल्या नाही.
एकमेव टॅक्सीचा नागरिकांना आधार
या भागात चालणारी एकमेव खासगी टॅक्सी रमेशगुडमवरून चालते. या टॅक्सीने कर्जेलीवासीय तालुक्याला येतात. या गावाला बारमाही रस्ता झाल्यास गावकरी मुख्य प्रवाहात येऊ शकतात. शासनाच्या योजना या गावात कशा पोहोचतात माहीत नाही. अविकसित आणि प्रगतीपासून कोसो दूर असलेल्या या गावात विकासाचा चिखलातून मार्ग काढत पावसाच्या दिवसामध्ये नावेतून गावाबाहेर पडावे लागते. बऱ्याचदा अत्यावश्यक काम असल्यास तालुकास्तरावर पोहोचण्यासाठी विलंब होतो. प्रसंगी कुठेही मुक्काम करावा लागतो.