शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
2
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
3
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
4
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
5
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
6
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
7
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
8
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
10
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
11
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
12
परशुराम जयंती २०२६: महेंद्रगिरीवरील भगवान परशुराम मंदिराचा थक्क करणारा इतिहास माहितीय का?
13
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
14
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
15
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
16
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
17
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
18
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
19
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
20
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
Daily Top 2Weekly Top 5

वैनगंगा आटली, जिल्ह्यावर जलसंकट

By admin | Updated: January 16, 2016 01:48 IST

कमी प्रमाणात पडलेला पाऊस, भंडारा जिल्ह्यातील गोसेखुर्द प्रकल्पात अडविण्यात येणारे पाणी ...

गडचिरोली : कमी प्रमाणात पडलेला पाऊस, भंडारा जिल्ह्यातील गोसेखुर्द प्रकल्पात अडविण्यात येणारे पाणी व वाढलेल्या पाणी पुरवठा योजना यामुळे वैनगंगा नदीचा जलस्तर जानेवारी महिन्यात पहिल्यांदाच तब्बल दोन फुटाने घटला आहे. त्यामुळे एप्रिल महिन्यापासून जिल्ह्यात जलसंकट निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. याचा प्रत्यय गडचिरोली शहराला येण्यास सुरूवात झाली आहे. नदीमधील इंटेकवेलचा एक पाईप पूर्णपणे पाण्याच्या वर आला आहे. त्यामुळे मागील चार दिवसांपासून गडचिरोली शहराला दिवसातून केवळ एकदाच पाण्याचा पुरवठा केला जात आहे. गडचिरोली शहराला दररोज ७५ लाख लिटर पाण्याची गरजगडचिरोली शहराची सद्यस्थितीत लोकसख्ंया ५० हजार एवढी आहे. गडचिरोली शहरात एकूण सहा हजार पेक्षा अधिक नळ कनेक्शन असून दर दिवशी ७५ लाख लिटर (७.५ एमएलडी) पाण्याचा पुरवठा केला जातो. यासाठी जॅकवेलवर १०० हॉर्सपॉवरची मशीन बसविण्यात आली असून सदर मशीन एका तासाला पाच लाख लिटर पाण्याचा उपसा करते. मात्र पाणी पातळी घटल्याने मशीनची पाणी उपसा करण्याची क्षमता घटली आहे. दिवसरात्रभर मशीन सुरू ठेवल्यानंतरही ३० लाख लिटरपेक्षा अधिक पाण्याचा उपसा होत नाही. त्यामुळे गडचिरोली शहराला दिवसातून एकवेळाच पाणी पुरवठा केला जात आहे.पहिल्यांदाच जलपातळीने ओलांडली मर्यादागडचिरोली शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या योजनेचे बांधकाम २००३ साली करण्यात आले. तेव्हापासून १२ वर्षांच्या कालावधीत गडचिरोली शहराला मुबलक पाणी पुरवठा होत होता. मात्र यावर्षी पहिल्यांदाच इंटेकवेलचा एक पाईप पूर्णपणे जलपातळीच्या वर आला आहे. दुसरा पाईप सद्यस्थितीत पाण्यात बुडून असला तरी एप्रिल, मे महिन्यात जलस्तर दुसऱ्याही पाईपाच्या खाली जाऊन पाईप उघड्यावर पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. असे झाल्यास इंटेकवेलच्या पलिकडे एखादा छोटेखानी बंधारा बांधल्याशिवाय गडचिरोली शहराला पाणी पुरवठा करणे कठीण होणार आहे.वैनगंगा नदीची पातळी घटल्याने जॅकवेलमध्ये कमी प्रमाणात पाणी जमा होत आहे. इंटेकवेलच्या एका पाईपाच्या जलस्तर खाली गेला आहे. दुसरा पाईप पाण्यामध्ये आहे. मात्र त्याच्या अध्या भागापर्यंत गाळ साचला आहे. त्यामुळे त्या पाईपातूनही पाणी येण्यास अडचण निर्माण होत आहे. पाण्यामध्ये बुडून असलेल्या पाईपासभोवतालचे गाळ काढले जाणार आहे. यासाठी पाच ते सहा दिवसांचा कालावधी लागणार असून तोपर्यंत शहराला एकच वेळ पाणी पुरवठा केला जाणार आहे.- उमेश शेंडे, अभियंता, पाणी पुरवठा विभाग, नगर परिषद गडचिरोली