शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
2
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
3
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
4
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
5
'आमच्यावर युद्ध लादले; आत्मसमर्पण करणार नाही', खमेनी यांचा इस्रायसह अमेरिकेलाही थेट इशारा
6
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
7
जिद्दीला सॅल्यूट! २३ वेळा अपयश पण मानली नाही हार; शेतकऱ्याचा लेक झाला असिस्टंट कमांडंट
8
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
9
भाजपा सरकारच्या ‘या’ निर्णयाचे जयंत पाटलांनी केले स्वागत; गडकरींचा उल्लेख करत म्हणाले...
10
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
11
Ashadhi Ekadashi 2025: विठ्ठल नामोच्चारात हृदयविकार टाळण्याची ताकद? वैद्यकीय संशोधन सांगते...
12
उत्पन्न वाढलं, महागाईही नियंत्रणात पण खिशात पैसेच शिल्लक राहत नाहीत; बचत झाली कमी, कर्ज वाढली
13
Anaya Sanjay Bangar, IND vs ENG: अनाया बांगरचे वडील संजय बांगरने इंग्लंड दौऱ्यावर टीम इंडियाकडून केलेली धमाकेदार खेळी
14
Share Market Update : सलग दुसऱ्या दिवशी बाजार घसरला! निफ्टी बँक तेजीत, पण इतर ठिकाणी विक्रीचा जोर, पाहा आजचे आकडे!
15
नोकरीला कंटाळलात? फक्त २०,००० रुपयांमध्ये सुरू करा 'हे' ४ छोटे व्यवसाय, दरमहा बंपर कमाईची संधी!
16
Raj Kushwaha : "सोनमने तिच्या पतीला खाल्लं आणि आता..." असं म्हणणाऱ्या राजच्या आजीचा झाला मृत्यू
17
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
18
सोशल मीडियावर व्हायरल झालेले खान सर निवडणूक लढवणार?,'आप'च्या संजय सिंह यांची भेट घेतली
19
२४ वर्षाच्या युवतीचा कारनामा, ८ बॉयफ्रेंडकडून लुटले २५ लाख; नवव्याला फसवणार होती, पण... 

दोन वर्षानंतर यावर्षी पुन्हा मलेरियाचा कहर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2020 05:00 IST

जंगलव्याप्त गडचिरोली जिल्ह्यात जंगलालगतच्या गावांमध्ये डासांचे प्रमाण जास्त राहते. त्यामुळेच मलेरिया, डेंग्यु अशा डासजन्य आजारांचे प्रमाणही या जिल्ह्यात इतर जिल्ह्यांच्या तुलनेत जास्त असते. गेल्या पाच वर्षाच्या मलेरिया रुग्णांच्या आकडेवारीवर नजर टाकल्यास २०१४ मध्ये ९१६३ मलेरिया रुग्ण आढळून ४ जणांचा मृत्यू झाला होता.

ठळक मुद्दे७ महिन्यात ५ मृत्यू : जिल्ह्यात ३३६४ जणांना लागण

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : राज्यभरात सर्वाधिक मलेरिया, डेंग्युचे रुग्ण आढळणाऱ्या गडचिरोलीत गेल्या दोन वर्षात डासजन्य आजारांचे प्रमाण बरेच कमी झाले होते. परंतू यावर्षी पुन्हा मलेरियाने डोके वर काढले आहे. जुलै अखेरपर्यंतच्या सात महिन्यात ३३६४ जणांना मलेरियाची लागण होऊन त्यात ५ जणांचा मृत्यू झाला आहे. ऑगस्ट महिन्यात सर्वत्र पावसाचा जोर वाढल्यामुळे जिकडे-तिकडे पाण्याचे डबके साचले आहे. त्यामुळे डासांची उत्पत्ती वाढून मलेरियाचा उद्रेक आणखी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.जंगलव्याप्त गडचिरोली जिल्ह्यात जंगलालगतच्या गावांमध्ये डासांचे प्रमाण जास्त राहते. त्यामुळेच मलेरिया, डेंग्यु अशा डासजन्य आजारांचे प्रमाणही या जिल्ह्यात इतर जिल्ह्यांच्या तुलनेत जास्त असते. गेल्या पाच वर्षाच्या मलेरिया रुग्णांच्या आकडेवारीवर नजर टाकल्यास २०१४ मध्ये ९१६३ मलेरिया रुग्ण आढळून ४ जणांचा मृत्यू झाला होता.२०१७ मध्ये ५४८४ रुग्ण आढळले आणि ५ जणांचा मृत्यू झाला होता. २०१८ पासून हे प्रमाण कमी झाले. त्या वर्षी २५८४ रुग्ण आढळून ३ जणांचा मृत्यू झाला तर २०१९ मध्ये २४२८ जणांना मलेरियाची लागण होऊन केवळ एका रुग्णाचा मृत्यू झाला होता. यावर्षी मात्र ७ महिन्यातच ५ मृत्यू झाल्यामुळे उर्वरित ५ महिन्यात किती जणांना मलेरियाची बाधा होऊन किती मृत्यू होतील हे सांगता येत नाही.यावर्षी ५५६ गावांमध्ये २२२ हंगामी कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून डासनाशकाची फवारणी करण्याचे नियोजन जिल्हा हिवताप कार्यालयाने केले होते. त्यासाठी प्रत्येकी ६ लोकांची एक टीम अशा ३७ टीम बनविल्या. जून-जुलैमधील पहिल्या फवारणीनंतर दुसरी फवारणी सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात केली जाणार आहे. परंतू जंगलालगतच्या अनेक दुर्गम गावांमध्ये जाण्यासाठी मार्गच बंद राहात असल्यामुळे ही फवारणी कशी केली जाणार हे कळायला मार्ग नाही.यासंदर्भात जिल्हा हिवताप अधिकारी डॉ.कुणाल मोडक यांना विचारणा करण्यासाठी वारंवार संपर्क केला, मात्र त्यांनी मोबाईल कॉल स्वीकारला नाही.मच्छरदाण्या वाटपावर प्रश्नचिन्हगेल्या दोन वर्षात जिल्ह्यात मच्छरदाण्यांचे वाटप झाले नाही. तरीही मलेरिया नियंत्रणात होता. यावर्षी आरोग्य विभागाकडून तब्बल ४ लाख ६९५ मच्छरदाण्या देण्यात आल्या. त्या १३७७ गावांमध्ये वाटप केल्या जात असल्याचे या विभागाकडून सांगण्यात आले. ऐन पावसाळ्याच्या तोंडावर मिळालेल्या त्या मच्छरदाण्या गरजवंत गावांपर्यंत पोहोचल्या का, आणि तालुकास्थळापर्यंत पोहोचलेल्या मच्छरदाण्या गरजवंतांपर्यंत पोहोचल्या का, यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.पावसामुळे आणखी वाढणार रूग्णविशेष म्हणजे यावर्षी ३३६४ जणांना झालेली मलेरियाची लागण ही जोरदार पाऊस येण्याआधीच्या काळातील आहे. जून आणि जुलै महिन्यामिळून झालेल्या पावसापेक्षा आॅगस्ट महिन्यातील पाऊस जास्त आहे. सप्टेंबर महिन्यातही या जिल्ह्यात पाऊस हजेरी लावतो. त्यामुळे मलेरियाला नियंत्रित करण्याचे खरे आव्हान आता उभे यापुढील काही महिन्यात उभे ठाकणार आहे.मलेरिया प्रतिरोध महिना कागदावरचजून महिना हिवताप प्रतिरोध महिना म्हणून पाळला जातो. यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सदर महिन्यात राबवायचे विविध कार्यक्रम प्रत्यक्षात कमी आणि कागदावरच जास्त राबविल्या गेले. जून महिना अर्धाअधिक संपेपर्यंत नियोजित कार्यक्रमातील कोणत्याही जनजागृतीपर कार्यक्रमांना सुरूवात झालेली नव्हती. त्यातच निधीही पुरेसा नसल्याचे सांगत अनेक ठिकाणी काटकसर करण्यात आली. मलेरियाचे रुग्ण वाढण्यामागे या सर्व बाबी तर कारणीभूत नाही ना? असाही प्रश्न निर्माण झाला आहे.

टॅग्स :Healthआरोग्य