शहरं
Join us  
Trending Stories
1
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
2
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
3
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
4
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
5
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
6
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
7
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
8
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
9
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
10
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
11
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
12
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
13
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
14
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
15
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
16
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
17
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
18
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
19
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
20
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन

मेडीगड्डा प्रकल्प करणार सिरोंचातील शेतकऱ्यांना उद्ध्वस्त; दरवर्षीच शेतीला फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2022 10:50 IST

तीन वर्षांपूर्वी हा प्रकल्प पूर्णत्वास आला. तेव्हापासून दरवर्षीच या प्रकल्पामुळे सिरोंचा तालुक्यातील शेतीला मोठा फटका बसत आहे. त्यामुळे या भागातील शेतकरी उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे.

ठळक मुद्देसुपीक जमीन जातेय वाहून

गडचिरोली : महाराष्ट्र आणि तेलंगणाच्या सीमेवरून वाहणाऱ्या गोदावरी नदीवर तेलंगणा सरकारने उभारलेला भव्य असा मेडीगड्डा प्रकल्प (लक्ष्मी बॅरेज) तेलंगणातील नागरिकांसाठी तारक, तर महाराष्ट्राच्या हद्दीतील नागरिकांसाठी मारक ठरत आहे. तीन वर्षांपूर्वी हा प्रकल्प पूर्णत्वास आला. तेव्हापासून दरवर्षीच या प्रकल्पामुळे सिरोंचा तालुक्यातील शेतीला मोठा फटका बसत आहे. त्यामुळे या भागातील शेतकरी उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे.

तब्बल १८ लाख ५० हजार एकर शेतीला सिंचन करण्याची क्षमता असणाऱ्या या प्रकल्पाचे पाणी तेलंगणाच्या अनेक भागासह हैदराबादपर्यंत नेले जाते; पण प्रकल्पाला लागून असलेल्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या शेतीला थेंबभरही पाणी मिळत नाही. पावसाळ्यात मात्र गोदावरी तुडुंब भरल्यानंतर या नदीचे बॅक वॉटर, तसेच गोदावरीला येऊन मिळणाऱ्या प्राणहिता नदीचे बॅक वॉटर सिरोंचा तालुक्यातील अनेक गावे आणि शेतात पसरते. दुसरीकडे प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग सुरू झाल्यानंतर खालील बाजूकडील गावांना फटका बसतो.

जमीनच राहणार नाही तर शेती करायची कशी?

तब्बल ८५ गेट असलेल्या मेडीगड्डा प्रकल्पाचे सर्व गेट उघडल्यानंतर बाहेर पडणारे पाणी नदीकाठावरील शेकडो हेक्टर जमिनीला खरडून काढते. यामुळे सिरोंचा तालुक्यातील शेतकऱ्यांचे पीकच नाही तर सुपीक जमीनही दरवर्षी वाहून जात आहे. हे भरून न निघणारे नुकसान आहे. हे सत्र असेच सुरू राहिले तर काही वर्षांत येथील शेती पूर्णपणे उद्ध्वस्त होऊन शेतकऱ्यांकडे जमीनच शिल्लक राहणार नाही.

अनेकांचे संसार आले उघड्यावर

गेल्या दोन आठवड्यात तर प्रकल्पाच्या खालील भागातील १० ते १२ गावांमधील नागरिकांचे संसार उघड्यावर आले आहेत. पाण्याच्या विसर्गामुळे शेतासोबत राहत्या घरांमध्येही पाणी शिरल्याने अनेक लोकांनी महामार्गालगतच्या मोकळ्या जागेत तंबू ठोकून त्यात ते विस्थापितांचे जीवन जगत आहेत. वीज, पाणी, औषधोपचार अशा सर्वच बाबतीत त्यांची गैरसोय होत आहे. प्रशासनाने चार दिवस आश्रय देऊन गावाकडे रवाना केले असले तरी पुन्हा गावात पाणी शिरण्याच्या भीतीने त्यांना ग्रासले आहे. त्यामुळे ते सुरक्षित ठिकाणी तंबू ठोकून राहणे पसंत करत आहेत.

गोदावरीने ओलांडली १९८६ ची महत्तम पातळी

कालेश्वरम् (तेंलंगणा) येथील सरिता मापन केंद्रावर घेतलेल्या नोंदीनुसार यावर्षी गोदावरी नदीने १९८६ मधील महत्तम पाणी पातळी (१०७.०५ मीटर) ओलांडून १०८.१८ मीटर एवढी पातळी गाठली. मेडीगड्डा बॅरेजमुळेच गोदावरीने ही महत्तम पातळी गाठली असून, ही स्थिती यापुढे दरवर्षी येण्याची शक्यता नाकारता येत नाही.

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरीgadchiroli-acगडचिरोलीDamधरण