शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

मेडीगड्डा प्रकल्प करणार सिरोंचातील शेतकऱ्यांना उद्ध्वस्त; दरवर्षीच शेतीला फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2022 10:50 IST

तीन वर्षांपूर्वी हा प्रकल्प पूर्णत्वास आला. तेव्हापासून दरवर्षीच या प्रकल्पामुळे सिरोंचा तालुक्यातील शेतीला मोठा फटका बसत आहे. त्यामुळे या भागातील शेतकरी उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे.

ठळक मुद्देसुपीक जमीन जातेय वाहून

गडचिरोली : महाराष्ट्र आणि तेलंगणाच्या सीमेवरून वाहणाऱ्या गोदावरी नदीवर तेलंगणा सरकारने उभारलेला भव्य असा मेडीगड्डा प्रकल्प (लक्ष्मी बॅरेज) तेलंगणातील नागरिकांसाठी तारक, तर महाराष्ट्राच्या हद्दीतील नागरिकांसाठी मारक ठरत आहे. तीन वर्षांपूर्वी हा प्रकल्प पूर्णत्वास आला. तेव्हापासून दरवर्षीच या प्रकल्पामुळे सिरोंचा तालुक्यातील शेतीला मोठा फटका बसत आहे. त्यामुळे या भागातील शेतकरी उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे.

तब्बल १८ लाख ५० हजार एकर शेतीला सिंचन करण्याची क्षमता असणाऱ्या या प्रकल्पाचे पाणी तेलंगणाच्या अनेक भागासह हैदराबादपर्यंत नेले जाते; पण प्रकल्पाला लागून असलेल्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या शेतीला थेंबभरही पाणी मिळत नाही. पावसाळ्यात मात्र गोदावरी तुडुंब भरल्यानंतर या नदीचे बॅक वॉटर, तसेच गोदावरीला येऊन मिळणाऱ्या प्राणहिता नदीचे बॅक वॉटर सिरोंचा तालुक्यातील अनेक गावे आणि शेतात पसरते. दुसरीकडे प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग सुरू झाल्यानंतर खालील बाजूकडील गावांना फटका बसतो.

जमीनच राहणार नाही तर शेती करायची कशी?

तब्बल ८५ गेट असलेल्या मेडीगड्डा प्रकल्पाचे सर्व गेट उघडल्यानंतर बाहेर पडणारे पाणी नदीकाठावरील शेकडो हेक्टर जमिनीला खरडून काढते. यामुळे सिरोंचा तालुक्यातील शेतकऱ्यांचे पीकच नाही तर सुपीक जमीनही दरवर्षी वाहून जात आहे. हे भरून न निघणारे नुकसान आहे. हे सत्र असेच सुरू राहिले तर काही वर्षांत येथील शेती पूर्णपणे उद्ध्वस्त होऊन शेतकऱ्यांकडे जमीनच शिल्लक राहणार नाही.

अनेकांचे संसार आले उघड्यावर

गेल्या दोन आठवड्यात तर प्रकल्पाच्या खालील भागातील १० ते १२ गावांमधील नागरिकांचे संसार उघड्यावर आले आहेत. पाण्याच्या विसर्गामुळे शेतासोबत राहत्या घरांमध्येही पाणी शिरल्याने अनेक लोकांनी महामार्गालगतच्या मोकळ्या जागेत तंबू ठोकून त्यात ते विस्थापितांचे जीवन जगत आहेत. वीज, पाणी, औषधोपचार अशा सर्वच बाबतीत त्यांची गैरसोय होत आहे. प्रशासनाने चार दिवस आश्रय देऊन गावाकडे रवाना केले असले तरी पुन्हा गावात पाणी शिरण्याच्या भीतीने त्यांना ग्रासले आहे. त्यामुळे ते सुरक्षित ठिकाणी तंबू ठोकून राहणे पसंत करत आहेत.

गोदावरीने ओलांडली १९८६ ची महत्तम पातळी

कालेश्वरम् (तेंलंगणा) येथील सरिता मापन केंद्रावर घेतलेल्या नोंदीनुसार यावर्षी गोदावरी नदीने १९८६ मधील महत्तम पाणी पातळी (१०७.०५ मीटर) ओलांडून १०८.१८ मीटर एवढी पातळी गाठली. मेडीगड्डा बॅरेजमुळेच गोदावरीने ही महत्तम पातळी गाठली असून, ही स्थिती यापुढे दरवर्षी येण्याची शक्यता नाकारता येत नाही.

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरीgadchiroli-acगडचिरोलीDamधरण