शहरं
Join us  
Trending Stories
1
माँसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर रंग फेकला, ठाकरे गट आक्रमक, दादरमध्ये तणाव
2
मारुती व्हिक्टोरिससाठी २ लाखांचे डाऊनपेमेंट केले तर किती बसेल EMI? बेस मॉडेलसाठी...
3
पगारापेक्षा जास्त घरभाडे; SEBI ने आपल्या प्रमुखांसाठी घेतले अपार्टमेंट, मासिक भाडे तब्बल ₹७ लाख
4
"अभिषेकच्या शेजारीच माझ्यावर अंत्यसंस्कार करा"; भावाच्या मृत्युनंतर बहिणीने संपवलं आयुष्य, हातावरच लिहिली शेवटची इच्छा
5
अपघाताने आयुष्य उद्ध्वस्त! स्ट्रेचरवर जखमी पत्नी अन् शेजारी पतीचा मृतदेह; डोळे पाणावणारा फोटो
6
चिंताजनक! मेंदू खाणाऱ्या अमिबाने घेतला १८ जणांचा जीव, तापासह 'ही' लक्षणं दिसताच व्हा सावध
7
७५ वर्षांचे झाले नरेंद्र मोदी! ११ वर्षांच्या कार्यकाळात शेअर बाजार सुस्साट, २४०% ची वाढ, काय आहेत कारणं?
8
अदलाबदली! २ मुलांचा बाप 'मेहुणी'सोबत पळाला; भाऊ चिडला, भावोजीच्या 'बहिणी'सोबत छूमंतर
9
जखमी नवजोत सिंह आणि त्यांच्या पत्नीला २२ किलोमीटर दूर असलेल्या हॉस्पिटलमध्ये का घेऊन गेली गगनप्रीत? झाला खुलासा!
10
६० मुस्लीम देशांच्या बैठकीत पाकिस्ताननं दिला 'इस्लामिक नाटो'चा प्रस्ताव; भारतासाठी किती चिंताजनक?
11
PM Modi Turns 75: वयाची ७५ वी अमृत महोत्सव म्हणून का साजरी केली जाते? सनातन धर्मात सापडते उत्तर 
12
ind vs oman: ओमानविरुद्धच्या सामन्याआधी भारतीय खेळाडूंनी मैदानात गाळला घाम, पाहा फोटो!
13
कॅनडातील वाणिज्य दूतावास ताब्यात घेणार; खलिस्तान समर्थकांची भारताला खुली धमकी...
14
"नक्कीच जुळं होणार", प्रिया बापटचा बेबी बंपचा व्हिडीओ पाहून चाहत्यांच्या कमेंट्स
15
२० वर्षांनंतर घेता येणार स्वेच्छा निवृत्ती, पण पूर्ण पेन्शनसाठी एवढ्या वर्षांची असणार अट
16
PM Modi Birthday: पंतप्रधान मोदींचा डुप्लिकेट कोण? राजकीय सभांपासून बॉलिवूड सिनेमांमध्ये केलंय काम
17
Urban Company IPO Listing: ५६ टक्क्यांचं लिस्टिंग गेन, ₹१०३ च्या शेअरची धमाकेदार एन्ट्री; गुंतवणूकदार मालामाल
18
Nupur Bora : पैसाच पैसा! ५ वर्षांच्या सेवेत ९२ लाख, १ कोटीचे दागिने...; कोट्यवधींच्या कमाईने मुख्यमंत्रीही हैराण
19
"तुमच्या सक्षम मार्गदर्शनाखाली..."; शरद पवार यांनी पंतप्रधान मोदींना दिल्या खास शुभेच्छा
20
PM Modi Birthday: जिथे गेले तिथे गाजवलं वर्चस्व! जगातील 'या' मोठ्या देशांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना दिला सर्वोच्च सन्मान 

मेडीगड्डा प्रकल्प करणार सिरोंचातील शेतकऱ्यांना उद्ध्वस्त; दरवर्षीच शेतीला फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2022 10:50 IST

तीन वर्षांपूर्वी हा प्रकल्प पूर्णत्वास आला. तेव्हापासून दरवर्षीच या प्रकल्पामुळे सिरोंचा तालुक्यातील शेतीला मोठा फटका बसत आहे. त्यामुळे या भागातील शेतकरी उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे.

ठळक मुद्देसुपीक जमीन जातेय वाहून

गडचिरोली : महाराष्ट्र आणि तेलंगणाच्या सीमेवरून वाहणाऱ्या गोदावरी नदीवर तेलंगणा सरकारने उभारलेला भव्य असा मेडीगड्डा प्रकल्प (लक्ष्मी बॅरेज) तेलंगणातील नागरिकांसाठी तारक, तर महाराष्ट्राच्या हद्दीतील नागरिकांसाठी मारक ठरत आहे. तीन वर्षांपूर्वी हा प्रकल्प पूर्णत्वास आला. तेव्हापासून दरवर्षीच या प्रकल्पामुळे सिरोंचा तालुक्यातील शेतीला मोठा फटका बसत आहे. त्यामुळे या भागातील शेतकरी उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे.

तब्बल १८ लाख ५० हजार एकर शेतीला सिंचन करण्याची क्षमता असणाऱ्या या प्रकल्पाचे पाणी तेलंगणाच्या अनेक भागासह हैदराबादपर्यंत नेले जाते; पण प्रकल्पाला लागून असलेल्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या शेतीला थेंबभरही पाणी मिळत नाही. पावसाळ्यात मात्र गोदावरी तुडुंब भरल्यानंतर या नदीचे बॅक वॉटर, तसेच गोदावरीला येऊन मिळणाऱ्या प्राणहिता नदीचे बॅक वॉटर सिरोंचा तालुक्यातील अनेक गावे आणि शेतात पसरते. दुसरीकडे प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग सुरू झाल्यानंतर खालील बाजूकडील गावांना फटका बसतो.

जमीनच राहणार नाही तर शेती करायची कशी?

तब्बल ८५ गेट असलेल्या मेडीगड्डा प्रकल्पाचे सर्व गेट उघडल्यानंतर बाहेर पडणारे पाणी नदीकाठावरील शेकडो हेक्टर जमिनीला खरडून काढते. यामुळे सिरोंचा तालुक्यातील शेतकऱ्यांचे पीकच नाही तर सुपीक जमीनही दरवर्षी वाहून जात आहे. हे भरून न निघणारे नुकसान आहे. हे सत्र असेच सुरू राहिले तर काही वर्षांत येथील शेती पूर्णपणे उद्ध्वस्त होऊन शेतकऱ्यांकडे जमीनच शिल्लक राहणार नाही.

अनेकांचे संसार आले उघड्यावर

गेल्या दोन आठवड्यात तर प्रकल्पाच्या खालील भागातील १० ते १२ गावांमधील नागरिकांचे संसार उघड्यावर आले आहेत. पाण्याच्या विसर्गामुळे शेतासोबत राहत्या घरांमध्येही पाणी शिरल्याने अनेक लोकांनी महामार्गालगतच्या मोकळ्या जागेत तंबू ठोकून त्यात ते विस्थापितांचे जीवन जगत आहेत. वीज, पाणी, औषधोपचार अशा सर्वच बाबतीत त्यांची गैरसोय होत आहे. प्रशासनाने चार दिवस आश्रय देऊन गावाकडे रवाना केले असले तरी पुन्हा गावात पाणी शिरण्याच्या भीतीने त्यांना ग्रासले आहे. त्यामुळे ते सुरक्षित ठिकाणी तंबू ठोकून राहणे पसंत करत आहेत.

गोदावरीने ओलांडली १९८६ ची महत्तम पातळी

कालेश्वरम् (तेंलंगणा) येथील सरिता मापन केंद्रावर घेतलेल्या नोंदीनुसार यावर्षी गोदावरी नदीने १९८६ मधील महत्तम पाणी पातळी (१०७.०५ मीटर) ओलांडून १०८.१८ मीटर एवढी पातळी गाठली. मेडीगड्डा बॅरेजमुळेच गोदावरीने ही महत्तम पातळी गाठली असून, ही स्थिती यापुढे दरवर्षी येण्याची शक्यता नाकारता येत नाही.

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरीgadchiroli-acगडचिरोलीDamधरण