शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
3
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
4
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
5
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
6
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
7
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
8
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
9
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
10
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
11
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
12
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
13
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
14
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
15
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
16
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
17
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
18
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
19
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
20
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी

प्रशासन म्हणते जिल्ह्यातील सर्वच गावांमध्ये पिकांची स्थिती उत्तम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2022 22:40 IST

गडचिरोली जिल्ह्यात एकूण १ हजार ६८९ गावे आहेत. खरीप पिकांची गावे १ हजार ५४८ आहेत. खरीप गावांमध्ये पिके नसलेली गावे ४५ आहेत.  खरीप पीक असलेल्या गावांपैकी ५० पैशाच्या आत पैसेवारी असलेले एकही गाव नाही. १ हजार ५११ गावांची पैसेवारी ५० पैशांच्यावर वर आहे. गडचिरोली जिल्ह्याची खरीप हंगामाची हंगामी पैसेवारी ही ६८ आहे. असे जिल्हाधिकारी गडचिरोली यांनी कळविले आहे. यावरून पिकांची स्थिती उत्तम असल्याचे दिसून येत आहे. 

लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : तहसीलदार यांचेकडून माहिती संकलीत करून गडचिरोली जिल्ह्याची सन २०२२-२०२३  या वर्षांची खरीप पिकांची हंगामी पैसेवारी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये सर्वच गावांतील पिकांची पैसेवारी ५० पैसेपेक्षा अधिक दाखविण्यात आली आहे. यावरून पिकांची स्थिती चांगली असल्याचा अंदाज आहे. गडचिरोली जिल्ह्यात एकूण १ हजार ६८९ गावे आहेत. खरीप पिकांची गावे १ हजार ५४८ आहेत. खरीप गावांमध्ये पिकेनसलेली गावे ४५ आहेत.  खरीप पीक असलेल्या गावांपैकी ५० पैशाच्या आत पैसेवारी असलेले एकही गाव नाही. १ हजार ५११ गावांची पैसेवारी ५० पैशांच्यावर वर आहे. गडचिरोली जिल्ह्याची खरीप हंगामाची हंगामी पैसेवारी ही ६८ आहे. असे जिल्हाधिकारी गडचिरोली यांनी कळविले आहे. यावरून पिकांची स्थिती उत्तम असल्याचे दिसून येत आहे. 

नदीकाठचे शेत पडीक तरीही पैसेवारी ५० पैसेच्यावरप्राणहिता, गाेदावरी, वैनगंगा, पर्लकाेटा, पामुलगाैतम, इंद्रावती या मुख्य नद्यांसह इतरही नद्यांना तीन ते चारवेळा पूर आला. पुराची माती अनेकांच्या शेतात जमा झाली आहे. दाेन ते तीन वेळा राेवणी केल्यानंतरही पूर आला. त्यामुळे अनेकांचे शेत आता पडीक आहेत. तरीही या गावांमधील पैसेवारी ५० पैशांच्यावर दाखविली आहे. 

धानपीक जाेमातखरीप हंगामात सुमारे ९० टक्के क्षेत्रावर धानपिकाची लागवड केली जाते. अगदी सुरूवातीपासून जिल्ह्यात पाऊस पडत आहे. ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची सुविधा उपलब्ध नव्हती, अशाही शेतकऱ्यांचे धान डाेलत आहे. ऑक्टाेबर महिन्यातही पाऊस झाल्याने तलाव, बाेड्यांच्या पाण्याची गरज न पडताच पीके निघाली आहेत. पुढे वातावरण चांगले राहिल्यास धानपिकाचे चांगले उत्पादन हाेऊन असा अंदाज कृषी विभागामार्फत व्यक्त केला जात आहे.

प्राथमिक अंदाज

हंगामी पैसेवारी सप्टेंबर महिन्याच्या शेवटी जाहीर केली जाते. यामध्ये पीक परिस्थितीचा प्राथमिक आढावा राहते. त्यामुळे या पैसेवारीला हंगामी पैसेवारी समजले जाते. कारण शेतात पीके अजूनही उभे आहेत. आता जरी पिकांची स्थिती चांगली असली तरी पुढे एखादा राेग, पूर, अतिवृष्टी किंवा दुष्काळामुळे पिकांचे नुकसान हाेऊ शकते. त्यामुळे हंगामी पैसेेवारीला फारसे महत्त्व नाही. ही पैसेवारी केवळ अंदाज आहे. डिसेंबर ते जानेवारी महिन्यात अंतिम पैसेवारी जाहीर केली जाते. यावेळी खरीप पिके निघाली असतात. या पैसेवारीवरूनच जिल्ह्यातील पीक परिस्थितीचा अंदाज येताे. त्यानुसार शासन संबंधित जिल्ह्यासाठी याेजना लागू करते. 

 

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी