शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

प्रशासन म्हणते जिल्ह्यातील सर्वच गावांमध्ये पिकांची स्थिती उत्तम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2022 22:40 IST

गडचिरोली जिल्ह्यात एकूण १ हजार ६८९ गावे आहेत. खरीप पिकांची गावे १ हजार ५४८ आहेत. खरीप गावांमध्ये पिके नसलेली गावे ४५ आहेत.  खरीप पीक असलेल्या गावांपैकी ५० पैशाच्या आत पैसेवारी असलेले एकही गाव नाही. १ हजार ५११ गावांची पैसेवारी ५० पैशांच्यावर वर आहे. गडचिरोली जिल्ह्याची खरीप हंगामाची हंगामी पैसेवारी ही ६८ आहे. असे जिल्हाधिकारी गडचिरोली यांनी कळविले आहे. यावरून पिकांची स्थिती उत्तम असल्याचे दिसून येत आहे. 

लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : तहसीलदार यांचेकडून माहिती संकलीत करून गडचिरोली जिल्ह्याची सन २०२२-२०२३  या वर्षांची खरीप पिकांची हंगामी पैसेवारी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये सर्वच गावांतील पिकांची पैसेवारी ५० पैसेपेक्षा अधिक दाखविण्यात आली आहे. यावरून पिकांची स्थिती चांगली असल्याचा अंदाज आहे. गडचिरोली जिल्ह्यात एकूण १ हजार ६८९ गावे आहेत. खरीप पिकांची गावे १ हजार ५४८ आहेत. खरीप गावांमध्ये पिकेनसलेली गावे ४५ आहेत.  खरीप पीक असलेल्या गावांपैकी ५० पैशाच्या आत पैसेवारी असलेले एकही गाव नाही. १ हजार ५११ गावांची पैसेवारी ५० पैशांच्यावर वर आहे. गडचिरोली जिल्ह्याची खरीप हंगामाची हंगामी पैसेवारी ही ६८ आहे. असे जिल्हाधिकारी गडचिरोली यांनी कळविले आहे. यावरून पिकांची स्थिती उत्तम असल्याचे दिसून येत आहे. 

नदीकाठचे शेत पडीक तरीही पैसेवारी ५० पैसेच्यावरप्राणहिता, गाेदावरी, वैनगंगा, पर्लकाेटा, पामुलगाैतम, इंद्रावती या मुख्य नद्यांसह इतरही नद्यांना तीन ते चारवेळा पूर आला. पुराची माती अनेकांच्या शेतात जमा झाली आहे. दाेन ते तीन वेळा राेवणी केल्यानंतरही पूर आला. त्यामुळे अनेकांचे शेत आता पडीक आहेत. तरीही या गावांमधील पैसेवारी ५० पैशांच्यावर दाखविली आहे. 

धानपीक जाेमातखरीप हंगामात सुमारे ९० टक्के क्षेत्रावर धानपिकाची लागवड केली जाते. अगदी सुरूवातीपासून जिल्ह्यात पाऊस पडत आहे. ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची सुविधा उपलब्ध नव्हती, अशाही शेतकऱ्यांचे धान डाेलत आहे. ऑक्टाेबर महिन्यातही पाऊस झाल्याने तलाव, बाेड्यांच्या पाण्याची गरज न पडताच पीके निघाली आहेत. पुढे वातावरण चांगले राहिल्यास धानपिकाचे चांगले उत्पादन हाेऊन असा अंदाज कृषी विभागामार्फत व्यक्त केला जात आहे.

प्राथमिक अंदाज

हंगामी पैसेवारी सप्टेंबर महिन्याच्या शेवटी जाहीर केली जाते. यामध्ये पीक परिस्थितीचा प्राथमिक आढावा राहते. त्यामुळे या पैसेवारीला हंगामी पैसेवारी समजले जाते. कारण शेतात पीके अजूनही उभे आहेत. आता जरी पिकांची स्थिती चांगली असली तरी पुढे एखादा राेग, पूर, अतिवृष्टी किंवा दुष्काळामुळे पिकांचे नुकसान हाेऊ शकते. त्यामुळे हंगामी पैसेेवारीला फारसे महत्त्व नाही. ही पैसेवारी केवळ अंदाज आहे. डिसेंबर ते जानेवारी महिन्यात अंतिम पैसेवारी जाहीर केली जाते. यावेळी खरीप पिके निघाली असतात. या पैसेवारीवरूनच जिल्ह्यातील पीक परिस्थितीचा अंदाज येताे. त्यानुसार शासन संबंधित जिल्ह्यासाठी याेजना लागू करते. 

 

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी