शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्राच्या खाली एकामागोमाग एक ३० धक्के! अमेरिकेच्या समुद्र किनाऱ्यावर सहा फूट लाटा उसळल्या, जगभरात हाहाकार... 
2
कृषिमंत्री कोकाटे किती मिनिटे रमी खेळत होते?, विधिमंडळ चौकशी अहवालात उघड, रोहित पवारांचा दावा
3
दोन मोर्चांवर वेगळे लढले...! विरूच्या निधनानंतर महिन्याभराने जयनेही प्राण सोडले; गीरचे जंगल आता त्यांच्या मैत्रीच्या गोष्टी सांगणार...
4
"हा माझा नवरा"; इन्स्पेक्टरच्या मृत्यूनंतर हायव्होल्टेज ड्रामा; मृतदेहासाठी २ बायका भिडल्या, अखेर...
5
NSDL IPO: ८०० रुपये प्राईज बँड, १२७ रुपये GMP; LIC नं केली गुंतवणूक, तुमचा विचार काय?
6
सलमान खानला भेटण्यासाठी ३ अल्पवयीन मुलांनी केला मोठा कांड; २ राज्यांची पोलीस झाली हैराण
7
रश्मिका मंदानाची कॉपी? छत्रपती संभाजीनगरची लेक, विजय देवरकोंडासोबत करणार रोमान्स
8
'ऑपरेशन महादेव'नंतर आता 'ऑपरेशन शिवशक्ती' सुरू! भारतीय सैन्याने दोन दहशतवाद्यांना घातलं कंठस्नान
9
थंडबस्त्यात गेला अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' सिनेमा, रेणुका शहाणे म्हणाल्या - "मला धक्काच बसला.."
10
कमाल! स्मार्टफोन App द्वारे आतड्यांतील बॅक्टेरियावर नियंत्रण, आली ओरल कॅप्सूल, कसा होणार फायदा?
11
Kamchatka Earthquake: ५ जुलैचे भविष्य ३० जुलैला खरे होणार? रशियातील भुकंपाच्या उंच लाटा जपानच्या किनाऱ्यावर धडकू लागल्या...
12
"दीड लाख देऊन इथं आलोय, मला बोलू द्या..."; संसदेत हजेरी लावणं खासदार राशीद यांना इतकं महाग का पडलं?
13
Reliance Jio ची आपल्या ग्राहकांना मोठी भेट; फक्त ₹५९९ मध्ये घरच्या TV ला बनवा कॉम्प्यूटर
14
PM किसान योजनेचा २० वा हप्ता जाहीर! २००० रुपये थेट बँक खात्यात, लगेच 'असं' तपासा तुमचं नाव!
15
भीक मागणाऱ्या व्यक्तीच्या दोन बायका, आता त्याची तक्रार तर ऐका; कलेक्टरकडे पोहोचला अन् म्हणाला...
16
Pranjal Khewalkar Arrest : मोबाईलमधून हाऊस पार्टीतील महिलांशी केलेली चॅटिंग व पार्टीचे व्हिडिओ सापडले
17
UPI मध्ये १ ऑगस्टपासून होणार बदल; बॅलन्स चेक ते ऑटो-पे पर्यंत सर्वकाही बदलणार, पाहा तुमच्यासाठी काय नवं?
18
Sonam Raghuvanshi : बेवफा सोनमवर चित्रपट येणार, 'हे' नाव असणार; दिग्दर्शकाने घेतली राजा रघुवंशीच्या भावाची भेट
19
Share Market Today: तेजीसह शेअर बाजाराची सुरुवात; Sensex १९० अंकांपेक्षा जास्त वधारला, 'या' शेअर्समध्ये तेजी
20
शेजारी राहणाऱ्या महिलेवर केले वार, गुप्तांगावरही ओरबाडलं अन् जंगलात फेकून दिलं! तरुण का झाला हैवान?

‘ताे’ नरभक्षक वाघ हाेणार जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2022 05:00 IST

१४ एप्रिल राेजी कुरूड येथील व ३ मे राेजी चाेप येथील एका नागरिकाचा शिवराजपूर जंगल परिसरात वाघाने बळी घेतला. विशेष म्हणजे शिवराजपूर जंगलात असलेला वाघ नरभक्षक असल्याची बाब वनविभागाच्या लक्षात आली. त्यामुळे सदर वाघाला पकडण्यासाठी १४ एप्रिलच्या घटनेनंतर देसाईगंज वनविभागाने वन्यजीव विभागाकडे परवानगी मागितली हाेती. या विभागाने परवानगी दिल्यानंतर २८ एप्रिल राेजी पथक दाखल झाले आहे.

लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिराेली : देसाईगंज तालुक्यातील शिवराजपूर जंगल परिसरात मागील २० दिवसांच्या कालावधीत दाेन नागरिकांचा बळी घेणाऱ्या वाघाला जेरबंद करण्यासाठी ताडाेबा येथील ९ जणांचे पथक दाखल झाले आहे.१४ एप्रिल राेजी कुरूड येथील व ३ मे राेजी चाेप येथील एका नागरिकाचा शिवराजपूर जंगल परिसरात वाघाने बळी घेतला. विशेष म्हणजे शिवराजपूर जंगलात असलेला वाघ नरभक्षक असल्याची बाब वनविभागाच्या लक्षात आली. त्यामुळे सदर वाघाला पकडण्यासाठी १४ एप्रिलच्या घटनेनंतर देसाईगंज वनविभागाने वन्यजीव विभागाकडे परवानगी मागितली हाेती. या विभागाने परवानगी दिल्यानंतर २८ एप्रिल राेजी पथक दाखल झाले आहे. यापूर्वी नागझिरा अभयारण्यातील आठ जणांची टीम आली हाेती. ही टीम आता परत जात आहे. त्यामुळे ताडाेबा येथील ९ जणांची टीम बाेलाविण्यात आली आहे. मागील पाच ते सहा दिवसांपासून वाघाचा शाेध घेतला जात आहे. मात्र वाघ हुलकावणी देत आहे. 

लाखांदूरवरून देसाईगंजात दाखलनरभक्षक वाघाचे नाव सीटी-१ असे आहे. हा वाघ मूळचा ब्रम्हपुरी तालुक्यातील आहे. ताे काही दिवस लाखांदूर तालुक्यात हाेता. त्यानंतर हा वाघ देसाईगंज तालुक्यातील शिवराजपूर जंगलात दाखल झाला आहे. हा वाघ नरभक्षक असल्याचे लक्षात आल्यानंतर वनविभागाने सुरूवातीपासूनच या वाघापासून सावध राहण्याचे आवाहन नागरिकांना केले हाेते. 

४० ट्रॅप कॅमेऱ्यांनी शाेधवाघाला शाेधून   काढण्यासाठी वनविभागाने शिवराजपूर, उसेगाव जंगल परिसरात विविध ठिकाणी ४० ट्रॅप कॅमेरे लावले आहेत. तसेच पथक जंगलात  फिरून वाघाचा शाेध घेत आहे. 

शिवराजपूर-उसेगाव मार्गावर रात्री प्रतिबंधशिवराजपूर-उसेगाव हे चार किमीचे अंतर आहे. यादरम्यान जंगल आहे. याच परिसरात सदर वाघ आढळून येत आहे. रात्रीच्या सुमारास प्रवाशांना धाेका हाेऊ नये, यासाठी या मार्गावरून सायंकाळनंतर दुचाकी, सायकलस्वार व पायदळ व्यक्तीला जाण्यास प्रतिबंध घातला जातो. यासाठी शिवराजपूर व उसेगावच्या दाेन्ही बाजूला वनविभागाचा नाका तयार करण्यात आला आहे. 

नागरिकांवर हल्ला करणाऱ्या वाघाला पकडण्यासाठी वनविभाग प्रयत्न करीत आहे. नागरिकांनीही सावधानता बाळगावी. जंगलात जाऊ नये. स्थानिक नागरिकांमध्ये जागृती केली जात आहे. - धर्मवीर सालविठ्ठल, उपवनसंरक्षक, देसाईगंज

 

टॅग्स :Tigerवाघ