शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारतीय सैन्याने 35-40 पाकिस्तानी सैनिक मारले', ऑपरेशन सिंदूरबाबत DGMO यांची मोठी माहिती
2
Eknath Shinde: ...तर जगाच्या नकाशातून पाकिस्तानचं नाव कायमचं गायब केलं जाईल, एकनाथ शिंदे पेटले
3
Operation Sindoor : "दहशतवाद्यांचा खात्मा करणं हे 'ऑपरेशन सिंदूर'चं उद्दिष्ट, १०० हून अधिक दहशतवाद्यांना केलं ठार"
4
...तर पाकिस्तानची खैर नाही, आणखी टेन्शन वाढणार; आता दरवर्षी 100 ब्रह्मोस तयार होणार! 
5
India Pakistan Latest Update: भारत पाकिस्तानातील दहशतवादी अड्डे उडवणार, अमेरिकेला आठ दिवस आधीच होती माहिती
6
पन्हाळगडावर पावसाची जोरदार हजेरी, पहिल्याच पावसात मुख्य रस्त्यावर २ मोठ्या शिळा कोसळल्या
7
"वहां से गोली चलेगी, यहां से गोला चलेगा"; PM मोदींचा उच्चस्तरीय बैठकीत लष्कराला स्पष्ट मेसेज
8
"२६ जणांच्या मृत्यूचा बदला घेतला, आम्हाला मोदींचा अभिमान..."; आदिल हुसेनच्या भावाचं विधान
9
Operation Sindoor Live Updates: "जर पाकिस्तानने आज रात्री शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं तर आम्ही त्याला जोरदार प्रत्युत्तर देऊ"
10
कर्जावर जगणारा पाकिस्तान लढाऊ विमानं, ड्रोन अन् बॉम्ब खरेदीसाठी एवढा पैसा आणतो कुठूण? सैन्याचे उद्योगधंदे जाणून थक्क व्हाल!
11
"गर्व वाटतो... जे मी करू शकलो नाही, ते मुलानं करून दाखवलं...!"; हुतात्मा मेजर पवन यांच्या वडिलांचे शब्द वाचून तुमचेही डोळे पाणावतील
12
'...तर पाकिस्तानला विनाशकारी उत्तर दिलं जाईल', अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षांसोबत PM मोदींची चर्चा
13
लोणावळ्यात गुलाबी सुटकेसमध्ये आढळलेल्या मृतदेहाचे गूढ उकलले, दोघांना अटक, हत्येचे कारण...
14
दहशतवाद्यांना स्थानिकांची मदत; काश्मीरमध्ये 20 ठिकाणी छापे, स्लीपर सेल मॉड्यूलचा पर्दाफाश
15
मंदिरात दिवा लावण्यासाठी गेलेल्या वृद्ध महिलेची 8 ग्रँम सोने व १० ग्रँम चांदीसाठी हत्या
16
Seema Haider : "तुला कोणीही मारणार नाही, तू परत ये"; ढसाढसा रडली सीमाची बहीण, मोदींकडे मागितली मदत
17
१० वर्षांच्या प्रवासानंतर, एकमेकांचे झाले, अक्षय-साधनाचा सुंदर क्षण, पाहा भावूक करणारा Video
18
तिरंगी वनडे मालिकेत टीम इंडियाचा डंका! यजमान श्रीलंकेला पराभूत करत हरमनप्रीत ब्रिगेडनं जिंकली ट्रॉफी
19
Chandrapur Tiger Attack: चंद्रपुरात वाघाच्या हल्ल्यात ३ महिलांचा मृत्यू, गावकऱ्यांमध्ये घबराट
20
पर्सनल लोन फेडलं नाही तर बँक काय कारवाई करते? कर्ज घेताना काय काळजी घ्यावी?

आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना भारत भ्रमणाची संधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2018 01:13 IST

आदिवासी विकास विभागाअंतर्गत जिल्ह्यातील अहेरी, भामरागड, गडचिरोली या तिनही प्रकल्पातून शासकीय आश्रमशाळेत शिकणाऱ्या गुणवत्ताप्राप्त ४४ विद्यार्थ्यांना टी.एस.पी. योजनेअंतर्गत २०१८-१९ च्या जिल्हा नावीण्यपूर्ण उपयोजनेतून प्रथमच भारत भ्रमणाची संधी प्राप्त झाली आहे.

ठळक मुद्दे४४ विद्यार्थी करणार सहल : टी.एस.पी. योजनेतून घडणार विमानवारी

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : आदिवासी विकास विभागाअंतर्गत जिल्ह्यातील अहेरी, भामरागड, गडचिरोली या तिनही प्रकल्पातून शासकीय आश्रमशाळेत शिकणाऱ्या गुणवत्ताप्राप्त ४४ विद्यार्थ्यांना टी.एस.पी. योजनेअंतर्गत २०१८-१९ च्या जिल्हा नावीण्यपूर्ण उपयोजनेतून प्रथमच भारत भ्रमणाची संधी प्राप्त झाली आहे. सहलीतील या ४४ आदिवासी विद्यार्थ्यांना विमानवारीही घडणार आहे.गडचिरोली प्रकल्पात २४, अहेरी ११, भामरागड ८ अशा एकूण ४४ शासकीय आश्रमशाळा आहेत. या आश्रमशाळांमध्ये यावर्षी शिकणाºया इयत्ता सातवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना सहलीत सहभागी होता येणार आहे. या सहलीदरम्यान दिल्ली येथील कुतुबमीनार, लोटस टेम्पल, लाल किल्ला, राष्टÑपती भवन, संसद भवन, राजघाट, स्पोर्ट अ‍ॅथोरेटी आॅफ इंडिया, जवाहरलाल नेहरू स्टेडियम, इंदिरा गांधी स्टेडियम, आग्रा येथील ताजमहल, आग्रा किल्ला, फत्तेपूर शिकरी, जयपूर येथील प्रेक्षणीय स्थळे पाहायला मिळणार आहे. याशिवाय सहलीतील विद्यार्थी राष्टÑपती, प्रधानमंत्री, संरक्षणमंत्री, आदिवासी विकास मंत्री आदींची भेट घेणार आहेत.मागील वर्षी शासकीय आश्रमशाळेत इयत्ता सातवी ते नववीमध्ये शिकत असलेल्या व वर्गातून प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या मुला, मुलींची ३० सप्टेंबरला दुपारी १२ ते १ दरम्यान प्रकल्पस्तरावर निवड चाचणी होणार आहे. गडचिरोली प्रकल्पातील विद्यार्थ्यांची निवड चाचणी इंग्रजी माध्यम आश्रमशाळेत तर अहेरी व भामरागड प्रकल्पातील विद्यार्थ्यांची परीक्षा आलापल्ली येथे होणार आहे. सदर निवड परीक्षेतून ४४ गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांची भारत भ्रमण सहलीसाठी निवड करण्यात येणार आहे. यामध्ये २२ मुले व २२ मुलींचा समावेश राहणार आहे. सदर परीक्षेला गडचिरोली प्रकल्पातील १९०, अहेरी प्रकल्पातील ८८ व भामरागड प्रकल्पातील ६४ असे एकूण ३४२ विद्यार्थी बसणार आहेत.जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या संकल्पनेतून व प्रकल्प अधिकारी डॉ.सचिन ओंबासे, सहायक प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार यांच्या प्रयत्नाने प्रथमच जिल्ह्यातील आदिवासी विद्यार्थ्यांना शासकीय आश्रमशाळेच्या माध्यमातून भारत भ्रमणाची संधी मिळणार असून त्यांच्या ज्ञानात भर पडणार आहे. आदिवासी विकासाच्या वतीने प्रथमच असा उपक्रम राबविला जात आहे.

टॅग्स :tourismपर्यटन