शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीतील स्फोटाचं पुलवामा कनेक्शन समोर, सलमानने काश्मीरमधील तारिकला विकली होती ती कार
2
ना स्फोटाच्या ठिकाणी खड्डा, ना मृतांच्या शरीरात सापडले तारा आणि खिळे, या कारणांनी गुढ वाढवलं
3
दिल्लीत लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ झालेल्या स्फोटातील जखमी आणि मृतांची यादी समोर
4
लाल किल्ल्याजवळ कारचा भीषण स्फोट, ८ ठार; 'प्रत्येक अँगलने तपास करा', गृहमंत्री अमित शाह यांचे तातडीचे आदेश!
5
दिल्लीतील ‘ब्लास्ट’, मागील पाच वर्षांतील केरळनंतरचा ठरला सर्वात मोठा स्फोट
6
लाल किल्ल्याजवळ स्फोट, दुर्घटनेनंतर देश हादरला! राहुल गांधी ते शरद पवार... कोण काय म्हणाले?
7
लाल किल्याजवळील स्फोटाने देश हादरला; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अमित शाह यांना फोन, पोस्ट करत म्हणाले-
8
Red Fort Blast Video: अनेकांच्या उडाल्या चिंधड्या! स्फोटानंतरची दृश्ये बघून होईल थरकाप, नेमकी कुठे घडली घटना?
9
Prem Chopra : दिग्गज अभिनेते प्रेम चोप्रा यांच्या प्रकृतीत सुधारणा; लीलावती रुग्णालयात दाखल
10
Red Fort Blast:  कार हळूहळू सिग्नलजवळ येऊन थांबली अन् झाला स्फोट; पोलीस आयुक्तांनी सांगितली घटना
11
लाल किल्ल्याजवळील स्फोटानंतर महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशमध्ये हाय अलर्ट! तपास यंत्रणा सतर्क
12
Delhi Red Fort Blast: मोठी बातमी! दिल्लीत लाल किल्ल्याजवळ भीषण स्फोट, 8 जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
13
कुणाचा हात तुटून पडला, कुणाचा कोथळा बाहेर आला; प्रत्यक्षदर्शीने सांगितली दिल्ली स्फोटाची हादरवून टाकणारी घटना
14
'त्या' जमीन गैरव्यवहार प्रकरणात पार्थ पवार, शीतल तेजवानींना पोलिसांकडून क्लीन चिट
15
भयानक कोसळणार ...! मी १९७१ पासून सोने खरेदी करतोय, पण...; रॉबर्ट कियोसाकी यांच्या दाव्याने खळबळ 
16
दहशतवाद्यांच्या टोळीत महिला डॉक्टरही सामील, थेट पाकिस्तानशी कनेक्शन; कारमध्ये घेऊन फिरत होती एके ४७!
17
जडेजाला संघाबाहेर काढण्यात धोनी सगळ्यात पुढे असेल! माजी क्रिकेटरनं त्यामागचं कारणही सांगून टाकलं
18
भारताच्या शेजारी देशांत भरतो 'नवरीचा बाजार', खरेदी करण्यासाठी चीनमधून येतात लोक! काय आहे प्रकार?
19
ताजमहालसमोर साखरपुडा...! दोनवेळा ऑस्ट्रेलियाला वर्ल्डकप जिंकविणारी भारताची सून होणार; कोण आहे ती...
20
अभिनेते धर्मेंद्र व्हेंटिलेटरवर? आयसीयूत सुरु आहेत उपचार; टीमने दिली हेल्थ अपडेट, म्हणाले...

आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना भारत भ्रमणाची संधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2018 01:13 IST

आदिवासी विकास विभागाअंतर्गत जिल्ह्यातील अहेरी, भामरागड, गडचिरोली या तिनही प्रकल्पातून शासकीय आश्रमशाळेत शिकणाऱ्या गुणवत्ताप्राप्त ४४ विद्यार्थ्यांना टी.एस.पी. योजनेअंतर्गत २०१८-१९ च्या जिल्हा नावीण्यपूर्ण उपयोजनेतून प्रथमच भारत भ्रमणाची संधी प्राप्त झाली आहे.

ठळक मुद्दे४४ विद्यार्थी करणार सहल : टी.एस.पी. योजनेतून घडणार विमानवारी

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : आदिवासी विकास विभागाअंतर्गत जिल्ह्यातील अहेरी, भामरागड, गडचिरोली या तिनही प्रकल्पातून शासकीय आश्रमशाळेत शिकणाऱ्या गुणवत्ताप्राप्त ४४ विद्यार्थ्यांना टी.एस.पी. योजनेअंतर्गत २०१८-१९ च्या जिल्हा नावीण्यपूर्ण उपयोजनेतून प्रथमच भारत भ्रमणाची संधी प्राप्त झाली आहे. सहलीतील या ४४ आदिवासी विद्यार्थ्यांना विमानवारीही घडणार आहे.गडचिरोली प्रकल्पात २४, अहेरी ११, भामरागड ८ अशा एकूण ४४ शासकीय आश्रमशाळा आहेत. या आश्रमशाळांमध्ये यावर्षी शिकणाºया इयत्ता सातवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना सहलीत सहभागी होता येणार आहे. या सहलीदरम्यान दिल्ली येथील कुतुबमीनार, लोटस टेम्पल, लाल किल्ला, राष्टÑपती भवन, संसद भवन, राजघाट, स्पोर्ट अ‍ॅथोरेटी आॅफ इंडिया, जवाहरलाल नेहरू स्टेडियम, इंदिरा गांधी स्टेडियम, आग्रा येथील ताजमहल, आग्रा किल्ला, फत्तेपूर शिकरी, जयपूर येथील प्रेक्षणीय स्थळे पाहायला मिळणार आहे. याशिवाय सहलीतील विद्यार्थी राष्टÑपती, प्रधानमंत्री, संरक्षणमंत्री, आदिवासी विकास मंत्री आदींची भेट घेणार आहेत.मागील वर्षी शासकीय आश्रमशाळेत इयत्ता सातवी ते नववीमध्ये शिकत असलेल्या व वर्गातून प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या मुला, मुलींची ३० सप्टेंबरला दुपारी १२ ते १ दरम्यान प्रकल्पस्तरावर निवड चाचणी होणार आहे. गडचिरोली प्रकल्पातील विद्यार्थ्यांची निवड चाचणी इंग्रजी माध्यम आश्रमशाळेत तर अहेरी व भामरागड प्रकल्पातील विद्यार्थ्यांची परीक्षा आलापल्ली येथे होणार आहे. सदर निवड परीक्षेतून ४४ गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांची भारत भ्रमण सहलीसाठी निवड करण्यात येणार आहे. यामध्ये २२ मुले व २२ मुलींचा समावेश राहणार आहे. सदर परीक्षेला गडचिरोली प्रकल्पातील १९०, अहेरी प्रकल्पातील ८८ व भामरागड प्रकल्पातील ६४ असे एकूण ३४२ विद्यार्थी बसणार आहेत.जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या संकल्पनेतून व प्रकल्प अधिकारी डॉ.सचिन ओंबासे, सहायक प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार यांच्या प्रयत्नाने प्रथमच जिल्ह्यातील आदिवासी विद्यार्थ्यांना शासकीय आश्रमशाळेच्या माध्यमातून भारत भ्रमणाची संधी मिळणार असून त्यांच्या ज्ञानात भर पडणार आहे. आदिवासी विकासाच्या वतीने प्रथमच असा उपक्रम राबविला जात आहे.

टॅग्स :tourismपर्यटन