शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: तोंडाला रुमाल बांधून आला अन् धाड, धाड; धारावीत भर बाजारात महिलेवर गोळीबार!
2
हिंजवडीत इमारतीवरून उडी मारून आयटी अभियंत्याची आत्महत्या, चिठ्ठीत लिहिले...
3
Badlapur: बदलापुरात रासायनिक कंपनीत आग!
4
Russia Ukraine War: 'रशियाकडे युद्ध थांबवण्याची शेवटची संधी' डोनाल्ड ट्रम्प यांचा पुतिन यांना इशारा!
5
मनसे कार्यकर्त्यांकडून कोचिंग सेंटरच्या संचालकाला मारहाण, कल्याण येथील व्हिडीओ व्हायरल
6
Sangli: नागपंचमीनिमित्त सांगलीत भाविकांना जिवंत नागांचे दर्शन घडणार, खेळावर बंदी कायम!
7
निशिकांत दुबेंना घेराव घातल्यानं राज ठाकरेंकडून वर्षा गायकवाड यांचे कौतुक, म्हणाले...
8
महापालिका निवडणुकीत आघाडी असणार की नाही, त्वरीत सांगा! पुण्यातून शरद पवार गटाची जाहीर मागणी
9
तब्बल ३८ तास बंद राहिला टोलनाका, तरीही २४ हजार लोकांनी प्रामाणिकपणे भरला टोल     
10
How To Deal With Heart Attack: घरात एकटे असताना 'हार्ट अटॅक' आला तर स्वत:चा जीव कसा वाचवाल? डॉक्टरांनी सांगितल्या 'या' सोप्या टिप्स
11
'नागपूरची लेक' वर्ल्ड चॅम्पियन दिव्या देशमुखला नितीन गडकरींचा 'व्हिडीओ कॉल', काय झाल्या गप्पा?
12
"महाराष्ट्राकडे 'बुद्धी आणि बळ' दोन्ही ओतप्रोत, ते जेव्हा..."; राज ठाकरेंकडून दिव्या देशमुखचं कौतुक
13
Pune Crime: 'छातीत दुखतंय', इंजिनिअर तरुण मीटिंग रुममधून उठला अन् सातव्या मजल्यावरून मारली उडी
14
वयोवृद्ध महिलेच्या खुनाचे रहस्य उलगडले, सावत्र मुलाला व पतीला अटक, गुन्हे शाखा दोनची कामगिरी
15
नागपुरला मिळाले ३५ वे पोलीस ठाणे; खापरखेडा पोलीस ठाणे आता नागपुरच्या कार्यकक्षेत
16
'अर्थव्यवस्था बंद करावी का?' रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करण्याच्या वादाला भारताचे प्रत्युत्तर, आरसा दाखवला
17
Divya Deshmukh: बुद्धिबळाच्या पटावर नव्या 'क्वीन'चं राज्य! 'महाराष्ट्राची लेक' दिव्या देशमुख 'वर्ल्ड चॅम्पियन'; कोनेरु हम्पी उपविजेती
18
"ऑपरेशनला सिंदूर नाव देणं म्हणजे भावनांशी खेळ, एकाही देशाने साथ दिली नाही’’, अरविंद सावंत यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
19
'लाडकी बहीण योजनेला सुद्धा भ्रष्टाचारातून सुट्टी नाही'; रोहित पवारांचा अजित पवारांवर पलटवार, आदिती तटकरेंच्या खात्याचं प्रकरण काढलं
20
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा

आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना भारत भ्रमणाची संधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2018 01:13 IST

आदिवासी विकास विभागाअंतर्गत जिल्ह्यातील अहेरी, भामरागड, गडचिरोली या तिनही प्रकल्पातून शासकीय आश्रमशाळेत शिकणाऱ्या गुणवत्ताप्राप्त ४४ विद्यार्थ्यांना टी.एस.पी. योजनेअंतर्गत २०१८-१९ च्या जिल्हा नावीण्यपूर्ण उपयोजनेतून प्रथमच भारत भ्रमणाची संधी प्राप्त झाली आहे.

ठळक मुद्दे४४ विद्यार्थी करणार सहल : टी.एस.पी. योजनेतून घडणार विमानवारी

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : आदिवासी विकास विभागाअंतर्गत जिल्ह्यातील अहेरी, भामरागड, गडचिरोली या तिनही प्रकल्पातून शासकीय आश्रमशाळेत शिकणाऱ्या गुणवत्ताप्राप्त ४४ विद्यार्थ्यांना टी.एस.पी. योजनेअंतर्गत २०१८-१९ च्या जिल्हा नावीण्यपूर्ण उपयोजनेतून प्रथमच भारत भ्रमणाची संधी प्राप्त झाली आहे. सहलीतील या ४४ आदिवासी विद्यार्थ्यांना विमानवारीही घडणार आहे.गडचिरोली प्रकल्पात २४, अहेरी ११, भामरागड ८ अशा एकूण ४४ शासकीय आश्रमशाळा आहेत. या आश्रमशाळांमध्ये यावर्षी शिकणाºया इयत्ता सातवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना सहलीत सहभागी होता येणार आहे. या सहलीदरम्यान दिल्ली येथील कुतुबमीनार, लोटस टेम्पल, लाल किल्ला, राष्टÑपती भवन, संसद भवन, राजघाट, स्पोर्ट अ‍ॅथोरेटी आॅफ इंडिया, जवाहरलाल नेहरू स्टेडियम, इंदिरा गांधी स्टेडियम, आग्रा येथील ताजमहल, आग्रा किल्ला, फत्तेपूर शिकरी, जयपूर येथील प्रेक्षणीय स्थळे पाहायला मिळणार आहे. याशिवाय सहलीतील विद्यार्थी राष्टÑपती, प्रधानमंत्री, संरक्षणमंत्री, आदिवासी विकास मंत्री आदींची भेट घेणार आहेत.मागील वर्षी शासकीय आश्रमशाळेत इयत्ता सातवी ते नववीमध्ये शिकत असलेल्या व वर्गातून प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या मुला, मुलींची ३० सप्टेंबरला दुपारी १२ ते १ दरम्यान प्रकल्पस्तरावर निवड चाचणी होणार आहे. गडचिरोली प्रकल्पातील विद्यार्थ्यांची निवड चाचणी इंग्रजी माध्यम आश्रमशाळेत तर अहेरी व भामरागड प्रकल्पातील विद्यार्थ्यांची परीक्षा आलापल्ली येथे होणार आहे. सदर निवड परीक्षेतून ४४ गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांची भारत भ्रमण सहलीसाठी निवड करण्यात येणार आहे. यामध्ये २२ मुले व २२ मुलींचा समावेश राहणार आहे. सदर परीक्षेला गडचिरोली प्रकल्पातील १९०, अहेरी प्रकल्पातील ८८ व भामरागड प्रकल्पातील ६४ असे एकूण ३४२ विद्यार्थी बसणार आहेत.जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या संकल्पनेतून व प्रकल्प अधिकारी डॉ.सचिन ओंबासे, सहायक प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार यांच्या प्रयत्नाने प्रथमच जिल्ह्यातील आदिवासी विद्यार्थ्यांना शासकीय आश्रमशाळेच्या माध्यमातून भारत भ्रमणाची संधी मिळणार असून त्यांच्या ज्ञानात भर पडणार आहे. आदिवासी विकासाच्या वतीने प्रथमच असा उपक्रम राबविला जात आहे.

टॅग्स :tourismपर्यटन