शहरं
Join us  
Trending Stories
1
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
2
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
3
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
4
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
5
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
6
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
7
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
8
Pitru Paksha 2025: घरात पितरांचे फोटो आहेत, पण दिशा चुकीची असेल तर कसा जाईल वास्तुदोष?
9
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
10
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
11
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
12
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?
13
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
14
जबरदस्त कॅमेरा आणि दमदार बॅटरी, किंमत १० हजारांहून कमी; नव्या 5G फोनची सर्वत्र चर्चा!
15
“PM मोदींच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त ७५ ST बसस्थानकावर मोफत वाचनालय सुरू करणार”: सरनाईक
16
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...
17
भारतात पारडे पालटले! इन्स्टाने रील्समध्ये युट्यूबला मागे टाकले; मेटाने काय ट्रेडिंग असते ते जाहीर केले
18
२१ लाख लोक रस्त्यावर, आतापर्यंत ९०० जणांचा मृत्यू! पाकिस्तानात पुराचं थैमान 
19
वेफर्स अन् भुजिया बनवणारी कंपनीत हिस्सेदारीसाठी चुरस; पेप्सिको, आयटीसीसह अनेक कंपन्या शर्यतीत
20
शेअर बाजारातील नुकसानीपासून वाचण्याचा सॉलिड फंडा, नितीन कामथ यांनी सांगितली भन्नाट ट्रिक

शिक्षणासाठी धडपड, बांबूच्या झाल्या भिंती, झाडाचा झाला फळा !

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2022 13:44 IST

बांबूपासून बनविलेल्या भिंती व ताडीच्या झाडाच्या बुंध्याचा फळ्यासारखा वापर करून विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यासाठी आटापिटा सुरू आहे.

रवी रामगुंडेवार

एटापल्ली (जि. गडचिरोली) : शाळांच्या इमारती विद्यार्थ्यांना बसण्यायोग्य नाहीत. जीर्ण, धोकादायक  इमारतींमुळे विद्यार्थ्यांचे शिक्षण वंचित राहू नये म्हणून नवा प्रयोग एटापल्ली तालुक्यातील वाळवी गावात सुरू आहे. 

बांबूपासून बनविलेल्या भिंती व ताडीच्या झाडाच्या बुंध्याचा फळ्यासारखा वापर करून विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यासाठी आटापिटा सुरू आहे.   गट्टा केंद्रांतर्गत वाळवी या दुर्गम गावात जिल्हा परिषदेची एकशिक्षकी शाळा आहे. या छोट्या गावात आदिवासींमधील माडिया जमातीची जेमतेम ३० ते ४० कुटुंबं आहेत. चारही बाजूंनी घनदाट जंगल. गावात जायला  पायवाट हाच पर्याय. पावसाळ्यात तर पाण्यातून वाट काढत गावात पोहोचणे म्हणजे जीवाची कसरतच. अशातही गावात वर्ग १ ते ४ पर्यंतची शाळा भरते; पण भौतिक सुविधा नसतानाही शिक्षक, गावकऱ्यांनी शिक्षणाचे महत्त्व ओळखून अडचणींवर मात केली आहे.

जीर्ण इमारतीवर शोधला पर्यायधोकादायक इमारतीत विद्यार्थ्यांचे वर्ग भरविणे जिकिरीचे. हे ओळखून वाळवीचे ग्रामस्थ आणि मुख्याध्यापक श्रीकांत काटेलवार यांनी गावातील ‘गोटूल’मध्ये शाळा भरविण्याचे ठरविले. गावातील सांस्कृतिक कार्यक्रम घेण्याचे हेछोटेसे समाजभवन म्हणजेच गोटूल. गावकऱ्यांनी गोटूलरुपी भवनाला सजवून शाळेचे रूप दिले.

नवीन रूप भावलेताडीच्या झाडांपासून तयार केलेली वैविध्यपूर्ण,  विनाखर्चाची पण टिकाऊ  शैक्षणिक साधने गोटूलमध्ये लावण्यात आली. शब्दांचे झाड, स्मृतिशेष फलक गोटूलची शोभा वाढविण्याबरोबर विद्यार्थ्यांचे भाषिक कौशल्य वाढवितात. ही मिनी शाळा पंचक्रोशीत कौतुकाचा विषय ठरत आहे.

टॅग्स :SchoolशाळाGadchiroliगडचिरोली