शहरं
Join us  
Trending Stories
1
MLC Election Maharashtra: महाराष्ट्रात पुन्हा निवडणूक! विधान परिषदेच्या १६ जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर; पाहा संपूर्ण वेळापत्रक
2
"जगात असा एकही देश नाही, जेथे...!"; डच पंतप्रधानांच्या 'चिंते'ला भारताचं सडेतोड उत्तर दिले
3
Top Marathi News LIVE: ट्रक-व्हॅनचा भीषण अपघात, १० प्रवाशांचा मृत्यू, मृतांमध्ये तीन महिलांचा समावेश
4
Twisha Sharma: 'मी अडकलेय रे, पण तू अडकू नकोस', ट्विशाचा मीनाक्षीला मेसेज, त्यानंतर मृत्यूचीच बातमी आली; असं काय घडलं?
5
अशोक सराफ यांचा मुलगा अनिकेतही कान्समध्ये पोहोचला, आईचा फोटो शेअर करत म्हणाला...
6
'राजा शिवाजी' ठरला ब्लॉकबस्टर! १०० कोटी कमावणारा मराठीतला दुसरा सिनेमा, 'सैराट'चा विक्रम मोडणार?
7
"दीपिकाच्या शरीरावर जखमांच्या खुणा, हुंड्यासाठी केली हत्या"; काकांचा खळबळजनक दावा
8
इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये चूक झाल्यास आता डिलीट करायची झंझट मिटली; कंपनीने आणले भन्नाट 'Edit' फीचर!
9
Pavala Shyamala : ग्लॅमरच्या दुनियेतून थेट रस्त्यावर; पैसे नसल्यामुळे ज्येष्ठ अभिनेत्रीला रुग्णालयाने नाकारले उपचार
10
Fact Check: विश्वास नांगरे पाटील यांच्याबाबतचे 'ते' क्रिएटिव्ह FAKE; 'लोकमत'चे नाव आणि लोगो वापरून दिशाभूल
11
गोरखपूर इंजिनिअर मृत्यू प्रकरण; नवऱ्याला मृत्यूच्या दारात ढकलणारी 'ती' क्रूर पत्नी अखेर गजाआड
12
ना भरपाई देणार, ना मालमत्ता मुक्त करणार; आणि युरेनियम...; इराणच्या प्रस्तावावर अमेरिकेच्या पाच कठोर अटी
13
Neet Paper Leak Case : नीट पेपरफुटी प्रकरणात सर्वात मोठा ट्विस्ट! लातूरचे प्राध्यापक शिवराज मोटेगावकर सीबीआयच्या ताब्यात
14
सासाराम स्टेशनवर 'बर्निंग ट्रेन'चा थरार! पाटणा पॅसेंजरला लागली भीषण आग, एक बोगी जळून खाक
15
Hirkani Tigress: चकवा देणारी ‘हिरकणी’ पुन्हा कॅमेऱ्यात कैद; गळ्यातील जीपीएस कॉलर मात्र गायब
16
संसार वाचवण्याचे 'तोडगे' ठरले अपयशी अन् तिने मृत्यूला कवटाळले; उच्चशिक्षित विवाहितेचा करुण अंत
17
Earthquake In china : चीनमध्ये ५.२ तीव्रतेचा शक्तिशाली भूकंप! भीषण हादऱ्यांनी इमारती जमीनदोस्त, दोघांचा मृत्यू
18
"मी घाईत आहे...", घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान मौनीने पापाराझींना टाळलं, पण पुढे काय घडलं पाहा
19
'लग्नात स्कॉर्पिओ दिली, आता फॉर्च्युनर मागत होते'; सासरच्यांचा जाच! लग्नाच्या १४ महिन्यातच दीपिकाने संपवलं आयुष्य
20
Crime News: रेल्वेत सापडलेली पत्र्याची पेटी उघडताच दिसला तरुणीचा शीर नसलेला मृतदेह, अनेक तुकडे; रेल्वे स्थानकात खळबळ
Daily Top 2Weekly Top 5

भाकपाचे आरमोरीत रस्ता रोको

By admin | Updated: May 15, 2015 01:36 IST

केंद्र शासनाच्या भूमिअधिग्रहण अध्यादेशाच्या निषेधार्थ गुरूवारी आरमोरी येथील इंदिरा गांधी चौकात भारतीय कम्युनिस्ट पार्टीच्या वतीने रस्ता रोको आंदोलन करण्यात आले.

आरमोरी : केंद्र शासनाच्या भूमिअधिग्रहण अध्यादेशाच्या निषेधार्थ गुरूवारी आरमोरी येथील इंदिरा गांधी चौकात भारतीय कम्युनिस्ट पार्टीच्या वतीने रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात भाकपाच्या हजारो कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला.
केंद्र शासनाने शेतकरी व आदिवासींच्या जमीन हिसकावण्यासाठी भूमीअधिग्रहण अध्यादेश काढला आहे. या अध्यादेशामुळे शेतकऱ्यांच्या जमिनी हिसकावून देशी-विदेशी, कार्पोरेट कंपन्या व भांडवलदारांना देण्याचा डाव केंद्र सरकारने घातला आहे. २०१३ च्या कायद्यात सार्वजनिक हितासाठी ७० टक्के शेतकऱ्यांची संमती तर खासगी प्रकल्पासाठी ८० टक्के शेतकऱ्यांच्या संमतीची गरज होती. मात्र भाजपा सरकारने ती काढून टाकली आहे. महाराष्ट्र शासनाने ग्राम वनाचे नियम आणून पेसा कायद्याने मिळालेले ग्रामसभेचे अधिकारच काढून घेण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. धानाला अत्यंत कमी भाव असल्याने शेतकरी चिंताग्रस्त आहे. अजूनही ३० हजार जबरानजोत धारकांना पट्ट्यांचे वितरण करण्यात आले नाही आदी मागण्यांसाठी रस्ता रोको आंदोलन करण्यात आले.
आंदोलनाचे नेतृत्त्व भाकपाचे जिल्हा सचिव डॉ. महेश कोपुलवार, जि. प. सदस्य अमोल मारकवार, देवराव चवळे, हिरालाल येरमे, जगदीश मेश्राम, मिनाक्षी सेलोकर, प्रकाश खोब्रागडे, इलियास पठाण, राजीराम उईके, प्रकाश ठलाल, बुधराम सहारे, हरिपाल खोब्रागडे, चंद्रभान मेश्राम, संजय वाकडे, विशाल दाम्पल्लीवार, केवळराम नागोसे, टिकाराम प्रधान, भूपती ढाली, तुलाराम नेवारे, लक्ष्मण झरकार, प्रशांत खोब्रागडे, अनिल कन्नाके, मनोहर तोरे, कामेश काटेंगे यांनी केले.
आंदोलनापूर्वी भाकपा कार्यालयासमोर जाहीर सभा घेण्यात आली. यावेळी भाषणकर्त्यांनी भाजपा सरकारवर कडाकडून हल्ला केला. त्यानंतर दुपारी १.३० ते २ वाजेपर्यंत रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. यामुळे मुख्य मार्गावरील वाहतूक खोळंबली. आंदोलनात वयोवृद्ध नागरिक, शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी अटक करून सुटका केली. यावेळी भाजपा सरकारच्या विरोधात भाकपा कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणा दिल्या व भूमीअधिग्रहण विधेयक मागे घ्यावे, अन्यथा देशभरात आणखी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. (प्रतिनिधी)