शहरं
Join us  
Trending Stories
1
उत्तर प्रदेशमध्ये मतदार यादीतून तब्बल २.८९ कोटी लोकांची नावं वगळणार, SIRबाबत धक्कादायक माहिती समोर 
2
पळवा पळवी! पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमानंतर लोकांनी कुंड्या, होर्डिंग आणि पुतळे पळवले   
3
स्वबळावर लढणाऱ्या काँग्रेसला ठाकरेंकडून मोठा धक्का, माजी नगरसेवक चंगेज मुलतानी उद्धवसेनेत
4
IND W vs SL W T20I : शफालीची वादळी खेळी! विजयी हॅटट्रिकसह टीम इंडियाचा मालिकेवर कब्जा; हरमनप्रीतनंही रचला इतिहास
5
"भाजपचे लोक हुशार, विरोधकांना सतत होमवर्क देतात", 'धुरंधर'चं नाव घेत कुमार विश्वास यांचा टोला
6
सीरियामध्ये मोठा हल्ला! नमाज पठणादरम्यान मशिदीत स्फोट, ८ जणांचा मृत्यू, १८ जण जखमी
7
IND W vs SL W : पहिल्या ओव्हरमध्ये धुलाई; मग रेणुकानं असा काढला राग! शेवटी 'चार चौघीं'वर पडली भारी
8
‘निष्ठावंतांना उमेदवारी न दिल्यास ते ज्या पक्षात जातील त्याचा प्रचार करणार’, भाजपाच्या ज्येष्ठ आमदाराचा इशारा
9
छत्रपती संभाजीनगरात एमआयएममध्ये 'राडा'; अधिकृत उमेदवारावर पक्ष कार्यकर्त्यांचाच हल्ला!
10
"भाजपाच्या पाठिंब्याशिवाय शिंदेसेना जिंकू शकत नाही"; मीरा-भाईंदरमध्ये महायुतीसाठी अटीशर्ती
11
लेडी DSP दीप्ती शर्मानं रचला इतिहास! असा पराक्रम करणारी ठरली पहिली भारतीय गोलंदाज
12
Ishan Kishan ने ठोकली सलग दोन शतकं, तरीही संघातून बाहेर; BCCIच्या आदेशानंतर घरी का परतला?
13
दिल्लीकडून खेळताना किंग कोहलीची ‘विराट’ कामगिरी! नव्या विश्वविक्रमासह ऑस्ट्रेलियन दिग्गजाला धोबीपछाड
14
"धर्म आणि विज्ञान यांच्यात कुठलाही संघर्ष नाही; दोघांचेही ध्येय एकच...!" नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
15
पित्याला मृत्युच्या दाढेतून ओढलं, थेट मगरीशी भिडला, चिमुकल्या अजयराजच्या शौर्याची कहाणी!
16
पुतण्यानेच रचला चुलत्याच्या हत्येचा कट; पराभवाचा बदला घेण्यासाठी मंगेश काळोखेंची हत्या, तटकरेंच्या निकटवर्तीयावरही गुन्हा दाखल
17
"कितीही अडथळे आले तरी परत आणणारच"; मोदी-माल्यांच्या लंडनमधील ‘त्या’ मस्करीला भारताचं चोख प्रत्युत्तर
18
"लोकं अडकून पडलेत, मुलांचं शिक्षण रखडलंय"; H1B व्हिसा मुद्द्यावर भारताची अमेरिकेशी चर्चा
19
जावळ काढण्याच्या प्रथेत आईचेही बळजबरीने मुंडन; दौंडमधील महिलांची राज्य महिला आयोगाकडे तक्रार
20
Viral Video: "ही कार आहे... बाईक नाही!" नको त्या कारणावरून जोडप्यामध्ये पेटला वाद, व्हिडीओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

भाटियात सौरप्रकाशाचा उजेड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2020 05:00 IST

भामरागड तालुक्यातील मिरगुडवंचा ग्रामपंचायत अंतर्गत नारगुंडा हे गाव येते. २५ वर्षांपूर्वी गावापासून एक किलोमीटर अंतरावर भाटिया समाजाचे पाच कुटुंब घर बांधून वास्तव्य करू लागले. तेव्हापासून या गावाला नारगुंडा भाटिया टोला असे ओळखले जाते. कालांतराने येथील नागरिकांना ग्रामपंचायतमार्फत घरकूल मिळाले. रेशनकार्डमुळे या कुटुंबाना धान्यही मिळत आहे.

ठळक मुद्देअतिदुर्गम गाव : सीआरपीएफ व पोलिसांच्या पुढाकाराने नागरिकांना दिलासा

लोकमत न्यूज नेटवर्कभामरागड : तालुक्यातील बहुतांश गावे पक्के रस्ते, वीज व अन्य मूलभूत सोयींच्या प्रतीक्षेत आहेत. सायंकाळनंतर अनेक गावांमध्ये अंधार पसरतो. या गावातील नागरिकांना विजेची प्रतीक्षा आहे. २५ वर्षांपूर्वी वसलेल्या भाटियाटोला (नारगुंडा टोला) येथे वीज पोहोचली नाही. नागरिक उजेडाच्या प्रतीक्षेत होते. त्यांची ही प्रतीक्षा सीआरपीएफ व पोलिसांनी गावात सौरदिवे लाऊन पूर्णत्त्वास आणली.भामरागड तालुक्यातील मिरगुडवंचा ग्रामपंचायत अंतर्गत नारगुंडा हे गाव येते. २५ वर्षांपूर्वी गावापासून एक किलोमीटर अंतरावर भाटिया समाजाचे पाच कुटुंब घर बांधून वास्तव्य करू लागले. तेव्हापासून या गावाला नारगुंडा भाटिया टोला असे ओळखले जाते. कालांतराने येथील नागरिकांना ग्रामपंचायतमार्फत घरकूल मिळाले. रेशनकार्डमुळे या कुटुंबाना धान्यही मिळत आहे. मात्र आजही गावात जाण्यासाठी रस्ता, पाण्याची व विजेची सोय नाही. ही बाब सुरक्षा दलाच्या निदर्शनास आली. तेव्हा सीआरपीएफ ३७ बटालीयनचे कमांडंट श्रीराम मीना यांच्या लक्षात ही बाब आणून दिली. त्यांच्या सुचनेनुसार नारगुंडा पोलीस मदत केंद्रात कार्यरत सीआरपीएफ ३७ बटलियनचे पोलीस निरीक्षक सुरेंद्र सिंह, पोलीस मदत केंद्राचे प्रभारी अधिकारी पीएसआय तुकाराम खडके व पोलीस कर्मचारी गावात जाण्याचे ठरविले. सीआरपीएफच्या सिविक एक्शन कार्यक्रम अंतर्गत गावात सौर ऊर्जेवरील दिवे बसविण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार सौरदिवे लावले.गावात सौर ऊर्जेवरील दिवे लागल्याने प्रकाश पोहोचला. अनेक वर्षाच्या प्रतीक्षेनंतर किमान सौरदिव्यांचा तरी प्रकाश मिळाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले. मात्र पिण्याच्या पाण्यासाठी बोअरवेल खोदून द्यावे, अशी मागणी याप्रसंगी नागरिकांनी केली.खांद्यावरून साहित्याची केली वाहतूकभाटियाटोला गावात जाण्यासाठी पक्का रस्ता नसल्याने सौरदिव्याचे साहित्य पोहोचविण्याचे मोठे आव्हान सीआरपीएफ व पोलीस जवानांसमोर होते. तेव्हा जवानांनी खांद्यावर लोखंडी खांब, सिमेंट, गिट्टी व इतर साहित्य घेऊन पायवाटेने नाला पार करीत थेट गाव गाठले. त्यानंतर गावात सौरदिवे उभे करून नागरिकांना दिलासा दिला.

टॅग्स :Socialसामाजिक