शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
2
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
3
'सर्व भारतीयांचा DNA एकच; हिंदू राष्ट्र म्हणजे...', RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे विधान
4
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण
5
मराठा आरक्षणासाठी ३५ वर्षीय तरुणाने केला आत्महत्येचा प्रयत्न; लातूर जिल्ह्यातील घटना
6
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
7
विकासकामांत तोडली जाणारी झाडे वाचवण्याचा अनोखा उपक्रम! पुण्यात 'वृक्ष पुनर्रोपण' अभियान
8
फोनमधील 'या' सेटिंग्ज बदलाल तर वाचेल बराच इंटरनेट डेटा! अनेकांना माहीत नाहीत सोप्या टिप्स
9
प्रेरणादायी अध्यात्मिक वक्त्या जया किशोरी यांच्या हस्ते होणार श्रीमंत भाऊसाहेब रंगारी बाप्पाची प्राणप्रतिष्ठा!
10
सिंहगडावर 'त्या' ५ दिवसांत काय काय घडलं? बेपत्ता झालेल्या गौतम गायकवाडने सांगितला थरार
11
काश्मीर खोऱ्यातील तीन मंडळांना गणेश मूर्ती प्रदान; पुनीत बालन यांच्यासह मानाच्या गणेश मंडळाचा स्तुत्य उपक्रम!
12
वैष्णोदेवी यात्रा मार्गावर मोठा अपघात; भूस्खलनामुळे ५ भाविकांचा मृत्यू, १४ जखमी
13
Vidarbha Weather Alert: पावसाचा विदर्भाकडे मोर्चा; अनेक ठिकाणी मुसळधार कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?
14
आणखी एक 'निक्की', हुंड्याने घेतला संजूचा जीव; मुलीसह स्वतःला पेटवलं, चिठ्ठीत म्हणाली...
15
किचनमधील 'या' वस्तूंमुळे दुप्पट वाढतो कॅन्सरचा धोका; डॉक्टर म्हणाले, आताच उचला अन् बाहेर फेका
16
७ मुलांची आई २२ वर्षांच्या भाच्याच्या प्रेमात पडली, पळून जायचा प्लॅन केला अन् पतीचे तीन लाखही केले लांपास!
17
बदल्याची आग! लव्ह मॅरेजनंतर पहिल्यांदा गावी आलं कपल; कुटुंब झालं हैवान, केली जावयाची हत्या
18
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
19
पाकिस्तानला आसिम मुनीर यांचं किती कौतुक! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये आपटल्यानंतरही सरकारने दिलं मोठ बक्षीस
20
दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष ली व्हाईट हाऊसमध्ये, ट्रम्प यांची घेतली भेट! चर्चेत झाला किम जोंग उनचा उल्लेख

भाटियात सौरप्रकाशाचा उजेड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2020 05:00 IST

भामरागड तालुक्यातील मिरगुडवंचा ग्रामपंचायत अंतर्गत नारगुंडा हे गाव येते. २५ वर्षांपूर्वी गावापासून एक किलोमीटर अंतरावर भाटिया समाजाचे पाच कुटुंब घर बांधून वास्तव्य करू लागले. तेव्हापासून या गावाला नारगुंडा भाटिया टोला असे ओळखले जाते. कालांतराने येथील नागरिकांना ग्रामपंचायतमार्फत घरकूल मिळाले. रेशनकार्डमुळे या कुटुंबाना धान्यही मिळत आहे.

ठळक मुद्देअतिदुर्गम गाव : सीआरपीएफ व पोलिसांच्या पुढाकाराने नागरिकांना दिलासा

लोकमत न्यूज नेटवर्कभामरागड : तालुक्यातील बहुतांश गावे पक्के रस्ते, वीज व अन्य मूलभूत सोयींच्या प्रतीक्षेत आहेत. सायंकाळनंतर अनेक गावांमध्ये अंधार पसरतो. या गावातील नागरिकांना विजेची प्रतीक्षा आहे. २५ वर्षांपूर्वी वसलेल्या भाटियाटोला (नारगुंडा टोला) येथे वीज पोहोचली नाही. नागरिक उजेडाच्या प्रतीक्षेत होते. त्यांची ही प्रतीक्षा सीआरपीएफ व पोलिसांनी गावात सौरदिवे लाऊन पूर्णत्त्वास आणली.भामरागड तालुक्यातील मिरगुडवंचा ग्रामपंचायत अंतर्गत नारगुंडा हे गाव येते. २५ वर्षांपूर्वी गावापासून एक किलोमीटर अंतरावर भाटिया समाजाचे पाच कुटुंब घर बांधून वास्तव्य करू लागले. तेव्हापासून या गावाला नारगुंडा भाटिया टोला असे ओळखले जाते. कालांतराने येथील नागरिकांना ग्रामपंचायतमार्फत घरकूल मिळाले. रेशनकार्डमुळे या कुटुंबाना धान्यही मिळत आहे. मात्र आजही गावात जाण्यासाठी रस्ता, पाण्याची व विजेची सोय नाही. ही बाब सुरक्षा दलाच्या निदर्शनास आली. तेव्हा सीआरपीएफ ३७ बटालीयनचे कमांडंट श्रीराम मीना यांच्या लक्षात ही बाब आणून दिली. त्यांच्या सुचनेनुसार नारगुंडा पोलीस मदत केंद्रात कार्यरत सीआरपीएफ ३७ बटलियनचे पोलीस निरीक्षक सुरेंद्र सिंह, पोलीस मदत केंद्राचे प्रभारी अधिकारी पीएसआय तुकाराम खडके व पोलीस कर्मचारी गावात जाण्याचे ठरविले. सीआरपीएफच्या सिविक एक्शन कार्यक्रम अंतर्गत गावात सौर ऊर्जेवरील दिवे बसविण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार सौरदिवे लावले.गावात सौर ऊर्जेवरील दिवे लागल्याने प्रकाश पोहोचला. अनेक वर्षाच्या प्रतीक्षेनंतर किमान सौरदिव्यांचा तरी प्रकाश मिळाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले. मात्र पिण्याच्या पाण्यासाठी बोअरवेल खोदून द्यावे, अशी मागणी याप्रसंगी नागरिकांनी केली.खांद्यावरून साहित्याची केली वाहतूकभाटियाटोला गावात जाण्यासाठी पक्का रस्ता नसल्याने सौरदिव्याचे साहित्य पोहोचविण्याचे मोठे आव्हान सीआरपीएफ व पोलीस जवानांसमोर होते. तेव्हा जवानांनी खांद्यावर लोखंडी खांब, सिमेंट, गिट्टी व इतर साहित्य घेऊन पायवाटेने नाला पार करीत थेट गाव गाठले. त्यानंतर गावात सौरदिवे उभे करून नागरिकांना दिलासा दिला.

टॅग्स :Socialसामाजिक