शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
3
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
4
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
5
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
6
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
7
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
9
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
10
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
11
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
12
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
13
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
14
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
16
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
17
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
18
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
19
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर

जिल्ह्यातील ग्रामीण साहित्यिक व साहित्याला राजमान्यताच नाही; विचारवंतांची खंत

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2023 13:15 IST

मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त ‘मराठी साहित्यात गडचिरोली जिल्ह्याचे वाङ्मयीन योगदान’ या विषयावर एक दिवसीय विशेष व्याख्यानाचे आयोजन

कुरखेडा (गडचिरोली) : गडचिरोली जिल्ह्यातील लेखक-कवी आणि साहित्यिकांनीसुद्धा प्रभावी लेखन करीत कथा, कविता, कादंबरी, नाटकांची निर्मिती केली आहे. मात्र, पुणे-मुंबईचा पगडा असलेल्या या क्षेत्रात दुर्दैवाने येथील साहित्याला अपवाद वगळता राजमान्यताच मिळत नाही, अशी खंत कवी, समीक्षक तथा माजी सनदी अधिकारी प्रभू राजगडकर यांनी व्यक्त केली.

महाराष्ट्र शासन मराठी भाषा संचालनालयाच्या वतीने येथील मुनघाटे महाविद्यालयाच्या सभागृहात सोमवारी (दि. २३) मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त ‘मराठी साहित्यात गडचिरोली जिल्ह्याचे वाङ्मयीन योगदान’ या विषयावर एक दिवसीय विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी प्रमुख वक्ते म्हणून प्रभू राजगडकर बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. राजाभाऊ मुनघाटे तर प्रमुख अतिथी म्हणून उपप्राचार्य प्रा. किशोर खोपे, भाषा संचालनालय विभागाचे प्रतिनिधी भाषातज्ज्ञ हरेश सूर्यवंशी, भाषांतर तज्ज्ञ स्नेहा पुनसे, मराठी विभाग प्रमुख प्रा.डॉ. नरेंद्र आरेकर आदी उपस्थित होते.

यावेळी हरेश सूर्यवंशी व स्नेहा पुनसे यांनी मराठी भाषा संचालनालयाच्या मराठी विभागाच्या कार्याची ओळख व संवर्धनाकरिता होत असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली.

प्रास्ताविकातून डॉ. नरेंद्र आरेकर यांनी कार्यक्रमाची रूपरेषा व राज्यात १४ ते २८ जानेवारीदरम्यान राबविण्यात येत असलेल्या मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त नियोजित उपक्रमांची माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. हेमलता उराडे यांनी केले.

दुर्लक्षित साहित्याला सूचीबद्ध करणार

प्राचार्य मुनघाटे यांनी अध्यक्षीय मार्गदर्शनात जिल्ह्यात मोठ्या संख्येने लेखक व त्यांनी निर्मिती केलेले साहित्य आहे, मात्र परिस्थिती व राजाश्रय नसल्याने त्यांची प्रसिद्धी होऊ शकली नाही. हे दुर्लक्षित असलेले लेखक व त्यांचे साहित्य मुनघाटे महाविद्यालयाचा वतीने सूचीबद्ध करीत ते पुस्तक स्वरूपात प्रसिद्ध करण्याचे आश्वासन त्यांनी आपल्या मार्गदर्शनातून दिले.

ग्रामीण मराठीला हिणवू नका

यावेळी मार्गदर्शन करताना राजगडकर म्हणाले, मराठी भाषा जिवंत ठेवण्याचे कार्य खऱ्या अर्थाने ग्रामीण भागाने केले आहे. त्यामुळे शासनाने भाषा संवर्धनाचा उपक्रम राबविताना ग्रामीण भागात विशेष मोहिमेची आखणी करावी. ग्रामीण मराठीला गावरान मराठी म्हणून न हिणवता येथील साहित्यालाही राजमान्यता प्रदान करावी, अशी मागणी त्यांनी आपल्या भाषणात केली. जिल्ह्यातील लेखक व त्यांचे साहित्य यांची एक लांबलचक यादीच त्यांनी वाचून दाखविली.

टॅग्स :literatureसाहित्यGadchiroliगडचिरोली