शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
5
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
6
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
7
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
8
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
9
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
10
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
11
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
12
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
13
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
14
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
15
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
16
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
17
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग
18
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
19
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
20
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  

जिल्ह्यातील ग्रामीण साहित्यिक व साहित्याला राजमान्यताच नाही; विचारवंतांची खंत

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2023 13:15 IST

मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त ‘मराठी साहित्यात गडचिरोली जिल्ह्याचे वाङ्मयीन योगदान’ या विषयावर एक दिवसीय विशेष व्याख्यानाचे आयोजन

कुरखेडा (गडचिरोली) : गडचिरोली जिल्ह्यातील लेखक-कवी आणि साहित्यिकांनीसुद्धा प्रभावी लेखन करीत कथा, कविता, कादंबरी, नाटकांची निर्मिती केली आहे. मात्र, पुणे-मुंबईचा पगडा असलेल्या या क्षेत्रात दुर्दैवाने येथील साहित्याला अपवाद वगळता राजमान्यताच मिळत नाही, अशी खंत कवी, समीक्षक तथा माजी सनदी अधिकारी प्रभू राजगडकर यांनी व्यक्त केली.

महाराष्ट्र शासन मराठी भाषा संचालनालयाच्या वतीने येथील मुनघाटे महाविद्यालयाच्या सभागृहात सोमवारी (दि. २३) मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त ‘मराठी साहित्यात गडचिरोली जिल्ह्याचे वाङ्मयीन योगदान’ या विषयावर एक दिवसीय विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी प्रमुख वक्ते म्हणून प्रभू राजगडकर बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. राजाभाऊ मुनघाटे तर प्रमुख अतिथी म्हणून उपप्राचार्य प्रा. किशोर खोपे, भाषा संचालनालय विभागाचे प्रतिनिधी भाषातज्ज्ञ हरेश सूर्यवंशी, भाषांतर तज्ज्ञ स्नेहा पुनसे, मराठी विभाग प्रमुख प्रा.डॉ. नरेंद्र आरेकर आदी उपस्थित होते.

यावेळी हरेश सूर्यवंशी व स्नेहा पुनसे यांनी मराठी भाषा संचालनालयाच्या मराठी विभागाच्या कार्याची ओळख व संवर्धनाकरिता होत असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली.

प्रास्ताविकातून डॉ. नरेंद्र आरेकर यांनी कार्यक्रमाची रूपरेषा व राज्यात १४ ते २८ जानेवारीदरम्यान राबविण्यात येत असलेल्या मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त नियोजित उपक्रमांची माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. हेमलता उराडे यांनी केले.

दुर्लक्षित साहित्याला सूचीबद्ध करणार

प्राचार्य मुनघाटे यांनी अध्यक्षीय मार्गदर्शनात जिल्ह्यात मोठ्या संख्येने लेखक व त्यांनी निर्मिती केलेले साहित्य आहे, मात्र परिस्थिती व राजाश्रय नसल्याने त्यांची प्रसिद्धी होऊ शकली नाही. हे दुर्लक्षित असलेले लेखक व त्यांचे साहित्य मुनघाटे महाविद्यालयाचा वतीने सूचीबद्ध करीत ते पुस्तक स्वरूपात प्रसिद्ध करण्याचे आश्वासन त्यांनी आपल्या मार्गदर्शनातून दिले.

ग्रामीण मराठीला हिणवू नका

यावेळी मार्गदर्शन करताना राजगडकर म्हणाले, मराठी भाषा जिवंत ठेवण्याचे कार्य खऱ्या अर्थाने ग्रामीण भागाने केले आहे. त्यामुळे शासनाने भाषा संवर्धनाचा उपक्रम राबविताना ग्रामीण भागात विशेष मोहिमेची आखणी करावी. ग्रामीण मराठीला गावरान मराठी म्हणून न हिणवता येथील साहित्यालाही राजमान्यता प्रदान करावी, अशी मागणी त्यांनी आपल्या भाषणात केली. जिल्ह्यातील लेखक व त्यांचे साहित्य यांची एक लांबलचक यादीच त्यांनी वाचून दाखविली.

टॅग्स :literatureसाहित्यGadchiroliगडचिरोली