शहरं
Join us  
Trending Stories
1
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
2
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
3
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
4
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
5
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
6
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!
7
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
8
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
9
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
10
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
11
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
12
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
13
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
14
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
15
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
16
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
17
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
18
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
19
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
20
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप

जिल्ह्यातील ग्रामीण साहित्यिक व साहित्याला राजमान्यताच नाही; विचारवंतांची खंत

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2023 13:15 IST

मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त ‘मराठी साहित्यात गडचिरोली जिल्ह्याचे वाङ्मयीन योगदान’ या विषयावर एक दिवसीय विशेष व्याख्यानाचे आयोजन

कुरखेडा (गडचिरोली) : गडचिरोली जिल्ह्यातील लेखक-कवी आणि साहित्यिकांनीसुद्धा प्रभावी लेखन करीत कथा, कविता, कादंबरी, नाटकांची निर्मिती केली आहे. मात्र, पुणे-मुंबईचा पगडा असलेल्या या क्षेत्रात दुर्दैवाने येथील साहित्याला अपवाद वगळता राजमान्यताच मिळत नाही, अशी खंत कवी, समीक्षक तथा माजी सनदी अधिकारी प्रभू राजगडकर यांनी व्यक्त केली.

महाराष्ट्र शासन मराठी भाषा संचालनालयाच्या वतीने येथील मुनघाटे महाविद्यालयाच्या सभागृहात सोमवारी (दि. २३) मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त ‘मराठी साहित्यात गडचिरोली जिल्ह्याचे वाङ्मयीन योगदान’ या विषयावर एक दिवसीय विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी प्रमुख वक्ते म्हणून प्रभू राजगडकर बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. राजाभाऊ मुनघाटे तर प्रमुख अतिथी म्हणून उपप्राचार्य प्रा. किशोर खोपे, भाषा संचालनालय विभागाचे प्रतिनिधी भाषातज्ज्ञ हरेश सूर्यवंशी, भाषांतर तज्ज्ञ स्नेहा पुनसे, मराठी विभाग प्रमुख प्रा.डॉ. नरेंद्र आरेकर आदी उपस्थित होते.

यावेळी हरेश सूर्यवंशी व स्नेहा पुनसे यांनी मराठी भाषा संचालनालयाच्या मराठी विभागाच्या कार्याची ओळख व संवर्धनाकरिता होत असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली.

प्रास्ताविकातून डॉ. नरेंद्र आरेकर यांनी कार्यक्रमाची रूपरेषा व राज्यात १४ ते २८ जानेवारीदरम्यान राबविण्यात येत असलेल्या मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त नियोजित उपक्रमांची माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. हेमलता उराडे यांनी केले.

दुर्लक्षित साहित्याला सूचीबद्ध करणार

प्राचार्य मुनघाटे यांनी अध्यक्षीय मार्गदर्शनात जिल्ह्यात मोठ्या संख्येने लेखक व त्यांनी निर्मिती केलेले साहित्य आहे, मात्र परिस्थिती व राजाश्रय नसल्याने त्यांची प्रसिद्धी होऊ शकली नाही. हे दुर्लक्षित असलेले लेखक व त्यांचे साहित्य मुनघाटे महाविद्यालयाचा वतीने सूचीबद्ध करीत ते पुस्तक स्वरूपात प्रसिद्ध करण्याचे आश्वासन त्यांनी आपल्या मार्गदर्शनातून दिले.

ग्रामीण मराठीला हिणवू नका

यावेळी मार्गदर्शन करताना राजगडकर म्हणाले, मराठी भाषा जिवंत ठेवण्याचे कार्य खऱ्या अर्थाने ग्रामीण भागाने केले आहे. त्यामुळे शासनाने भाषा संवर्धनाचा उपक्रम राबविताना ग्रामीण भागात विशेष मोहिमेची आखणी करावी. ग्रामीण मराठीला गावरान मराठी म्हणून न हिणवता येथील साहित्यालाही राजमान्यता प्रदान करावी, अशी मागणी त्यांनी आपल्या भाषणात केली. जिल्ह्यातील लेखक व त्यांचे साहित्य यांची एक लांबलचक यादीच त्यांनी वाचून दाखविली.

टॅग्स :literatureसाहित्यGadchiroliगडचिरोली