शहरं
Join us  
Trending Stories
1
"PM मोदी जगात भारताची प्रतिष्ठा जपण्याचं काम करताहेत", शरद पवारांकडून पंतप्रधानांच्या कामाचं कौतुक, काय बोलले?
2
PM मोदी यांनी जॉर्जिया मेलोनी यांना गिफ्ट केले 'मेलोडी चॉकलेट्स'! इटलीच्या पंतप्रधान व्हिडिओ शेअर करत म्हणाल्या...
3
Top Marathi News LIVE Updates: गॅस पाईपलाईन असूनही अर्ज केला नाही तर सिलेंडर बंद होणार! छगन भुजबळांचा ग्राहकांना इशारा
4
घरगुती क्रिकेट गाजवलं, आयपीएलमध्ये चमकले; आता थेट भारतीय संघात निवड, कोण आहेत 'हे' ४ खेळाडू!
5
Indian Railway आता Logo बदलणार, मंत्रालयाचा होकार; नवे काय पाहायला मिळेल, डिझाइन कसे असेल?
6
राज्यात पेट्रोल-डिझेलचा एक महिन्याचा साठा; इंधन टंचाईवर छगन भुजबळांची टेन्शन वाढवणारी माहिती
7
Khushboo Patani : Video - "बेटी विदा नहीं, कुर्बान हुई, गप्प बसणारे आई-वडीलही जबाबदार"; खुशबू पाटनीचा संताप
8
होर्मुझ संकटानंतर आता थेट हिंद महासागरात हायव्होल्टेज ड्रामा; इराणचा १० लाख बॅरलचा ऑइल टँकर केला जप्त!
9
Pune Crime: पुण्यात थरारक फायरिंग; टोळी युद्धातून एकावर गोळीबार, वनराज आंदेकर खून प्रकरणाशी दुवा
10
Vastu Tips: नोकरी-व्यवसायात हवीये मोठी झेप? 'या' ५ वास्तू टिप्स नक्की वापरुन पहा
11
मोठा खुलासा! इराणविरुद्धच्या युद्धात अमेरिकेची किती विमानं उद्ध्वस्त झाली? थक्क करणारा आहे आकडा; पाहा संपूर्ण यादी
12
Jinping on Iran War: इराण युद्ध थांबवण्यासाठी चीनचा पुढाकार, शी जिनपिंग यांनी दिला चार मुद्द्यांचा प्रस्ताव
13
अधिक मास २०२६: १ मंत्र ११ वेळा जपा, अशक्यही शक्य होईल; स्वामी सेवा तारेल, अद्भूत अनुभव येईल!
14
Twisha Sharma : ट्विशा शर्माचा कॉल कट होण्यापूर्वी आईने ऐकलेला आवाज; गच्चीवर तासाभरात नेमकं काय घडलं?
15
"खेळाडूंच्या वैयक्तिक आयुष्यावर बोलू नका, फक्त क्रिकेटवर लक्ष द्या" रियान पराग समालोचकांवर भडकला!
16
अधिक मास २०२६: गुरुपुष्यामृताचा सुवर्ण योग, भाग्योदयाचा शुभ काळ; ५ कामे करा, अमृत पुण्य लाभ!
17
दुचाकीच्या धडकेनंतर लक्झरी बसने घेतला पेट, बाळापूर शेगाव मार्गावरील घटना
18
Twisha Sharma : "३० लोक बोलावून मारहाण करीन"; आता ट्विशा शर्माच्या वहिनीने उघड केला सासरच्यांचा क्रूर चेहरा
19
हा निव्वळ भास नाही! तुमच्यातल्या 'सिक्स सेन्स'ची जागृती दर्शवणारे 'हे' १० बदल अनुभवलेत का?
20
नवी मुंबई हादरली! घणसोलीत रिक्षाचालकांच्या हाणामारीत मध्यस्थी करणाऱ्या तरुणाची हत्या; दोन आरोपींना अटक
Daily Top 2Weekly Top 5

रात्रीच्या सुमारास वीज कर्मचाऱ्यांची गस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2017 00:31 IST

वन्यजीवांपासून शेतीचे संरक्षण करण्यासाठी शेताच्या सभोवताल वीज तारेचा प्रवाह सोडण्याचे प्रमाण वाढल्याने वन्यजीव ठार होण्याचे प्रमाणही वाढले आहे.

ठळक मुद्देआकड्यांचा घेत आहेत शोध : अवैध वीज पुरवठा घेणाऱ्यांवर कारवाई होणार

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : वन्यजीवांपासून शेतीचे संरक्षण करण्यासाठी शेताच्या सभोवताल वीज तारेचा प्रवाह सोडण्याचे प्रमाण वाढल्याने वन्यजीव ठार होण्याचे प्रमाणही वाढले आहे. वीज आकड्यांचा शोध घेण्यासाठी वन विभागाने रात्रीच्या सुमारास जंगल परिसराला लागून असलेल्या शेतांवर गस्त घालण्याची मोहीम मागील पाच दिवसांपासून सुरू केली आहे.
जंगलच्या जवळ असलेल्या शेतांचे वन्यजीव मोठ्या प्रमाणात नुकसान करतात. या वन्यजीवांना शेतात येण्याला प्रतिबंध घालण्यासाठी काही शेतकरी शेताच्या सभोवताल विद्युत प्रवाह सोडून ठेवतात. या विद्युत प्रवाहामुळे गडचिरोली जिल्ह्यात मागील १५ दिवसात एक वाघीण व शेतकºयाचा मृत्यू झाला आहे. अशा प्रकारच्या अनुचित घटनांवर आळा घालण्यासाठी रात्रीच्या सुमारास वीज कर्मचाºयांनी गस्त घालावी व आकड्यांचा शोध घ्यावा, असे निर्देश राज्य शासनाने वन विभाग व वीज विभागाला दिले आहेत. त्यामुळे वन विभाग व वीज विभागाचे संयुक्त पथक तयार करण्यात आले आहे. सदर पथक त्यांच्या परिसरात रात्री गस्त घालून आकड्यांचा शोध घेत आहेत. बेकायदेशीरपणे विजेचा प्रवाह सोडला असल्याचे लक्षात आल्यानंतर संबंधित शेतकºयावर कारवाई केली जात आहे. पथक गस्त घालत असल्याची माहिती शेतकºयांना होताच आकडे टाकण्याचे प्रमाणही कमी झाले आहे.
रात्रीच्या गस्तीवर महावितरणचे अधीक्षक अभियंता अशोक म्हस्के, कार्यकारी अभियंता विजय मेश्राम हे नियंत्रण ठेवून आहेत.
रबी हंगामात वन्यजीवांची शेतांकडे धाव
आॅक्टोबर महिन्यापासून रबी पिकांच्या पेरणीला सुरूवात होते. या कालावधीत जंगलातील पाण्याचे स्त्रोत आटण्यास सुरूवात होते. पाण्याअभावी गवतही कमी होते. त्यामुळे वन्यजीव पाणी व चाºयाच्या शोधात जंगलाजवळ असलेल्या शेतात जातात. रबी हंगामाचे सर्वाधिक नुकसान वन्यजीवांकडून होत असल्याने या कालावधीत काही शेतकरी मचान उभारून स्वत: रात्री उपस्थित राहून वन्यजीवांपासून पिकांचे रक्षण करतात. तर काही शेतकरी शेताच्या सभोवताल वीज प्रवाह सुरू करण्याचा सोपा मात्र धोकादायक मार्ग अवलंबतात. वन विभागाने सुरू केलेल्या मोहिमेमुळे आकडे टाकण्यास प्रतिबंध बसेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.