शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

पोराला न्यायाला पोरगी दारात... फेसबुकची मैत्री लग्नाच्या रेशीमबंधनात

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2023 12:40 IST

तंटामुक्त समितीचा पुढाकार : भाकरोंडीत पार पडला विवाह

पुंजीराम मेश्राम

वडधा (गडचिरोली) : पोस्टर गर्ल चित्रपटात पोराला न्यायाला पोरगी दारात... हे गाणे प्रसिद्ध आहे. या गाण्यातील ओळी आरमोरी तालुक्यातील भाकराेंडी येथे प्रत्यक्षात अनुभवास आल्या.

फेसबुकवर झालेल्या ओळखीचे रूपांतर मैत्रीत व प्रेमातून नंतर नाते लग्नाच्या रेशीमबंधनात बांधले गेले; पण याकरिता बंधने झुगारून मुलीने चंद्रपूरहून भाकरोंडी गाव गाठले. अखेर तंटामुक्त समितीने २४ सप्टेंबरला दोघांचाही साध्या पद्धतीने विवाह लावून दिला.

राहुल जयदेव टेंभुर्णे (२८, रा. भाकरोंडी) व प्रज्ञा रवी रामटेके (२४, रा. चंद्रपूर) असे या प्रेमवीराचे नाव. त्या दोघांची फेसबुकवर ओळख झाली, फ्रेंडशिपचे रूपांतर प्रेमात झाले व नंतर दोघांनी या नात्याला रेशीमबंधनात बांधण्याचे ठरवले. राहुलचे शिक्षण बारावी झालेले असून शेती करतो, तर प्रज्ञा ही दहावी उत्तीर्ण आहे. दोघेही गरीब कुटुंबातील; पण एकमेकांवर त्यांचे घट्ट प्रेम. दोघेही एकाच जातीचे, त्यामुळे जातीची बंधने नव्हती; पण मुलीकडील लोकांचा राहुलसोबत लग्न लावण्यास विरोध होता. विशेष म्हणजे दोघे कधी समोरासमोर एकमेकांना भेटलेले नव्हते, त्यामुळे भेटीची ओढ होतीच.

१४ सप्टेंबरला प्रज्ञा चंद्रपूरहून बसने थेट भाकरोंडीत पोहोचली. त्यानंतर राहुलने कुटुंबाला प्रज्ञावर प्रेम असून विवाह करण्याची इच्छा बोलून दाखवली. तंटामुक्त समितीकडे अर्ज केल्यावर सभा बोलावण्यात आली. त्यात प्रज्ञाच्या कुटुंबास संपर्क करून विवाहाबद्दल संमती मागितली; पण त्यांचा विरोध कायम होता. अखेर सर्वांसमक्ष राहुल व प्रज्ञा यांच्या

संमतीने २४ सप्टेंबरला विवाह लावून दिला. तंटामुक्त समितीचे अध्यक्ष देवराव सहारे, उपाध्यक्ष मोबीन शेख, सदस्य उद्धव बोदेले, पोलिस पाटील मयुरी उसेंडी, यशवंत टेंभुर्णे, मनीराम पदा, नरेंद्र टेंभुर्णे व गावकरी या सोहळ्याचे साक्षीदार होते.

राहुल आई- वडिलांच्या प्रेमाला पारखा

राहुल टेंभुर्णे याच्या आयुष्याची चित्तरकथा आहे. त्याच्या वडिलांचे निधन झालेले आहे. आईदेखील सोडून गेल. त्यामुळे राहुल याला मामा हिराजी जनबंधू यांचाच आधार आहे. त्यांच्याकडेच तो राहतो. आता त्याच्या आयुष्यात प्रज्ञाच्या रूपाने हक्काची जीवनसाथी आली आहे.

टॅग्स :Socialसामाजिकmarriageलग्नGadchiroliगडचिरोलीSocial Mediaसोशल मीडिया