ग्रामपंचायतीचे नगर पंचायतीमध्ये रूपांतर झाल्यानंतर सिरोंचा शहराचा विकास होऊन कायापालट होईल, अशी अपेक्षा येथील नागरिकांनी केली होती. मात्र नगर पंचायत अस्तित्वात येऊनही अपेक्षित विकास कामे होत नसल्याने नागरिकांचा नगर पंचायत प्रशासनावर रोष दिसून येत आहे ...
गोरगरीबांना महिनाभराचे धान्य आणि ५०० रुपये सानुग्रह मदत देऊन त्यांच्या घरात चूल पेटविण्याची व्यवस्था करणार, अशी माहिती राज्याचे मदत, पुनर्वसन व बहुजन कल्याणमंत्री विजय वडेट्टीवार यांनी गडचिरोलीत ‘लोकमत’शी बोलताना दिली. ...
वर्धा जिल्ह्याच्या सावंगी येथूून मोतीबिंदूची शस्त्रक्रिया आटोपून रविवारी आरमोरी येथे परतलेल्या वृद्ध रुग्णांना जनता कर्फ्यूचा मोठा फटका बसला. कर्फ्यूमुळे सर्वच दुकाने, हॉटेल व वाहतुकीची साधने बंद होती. त्यामुळे ४५ रुग्ण आरमोरी येथील उपजिल्हा रुग्णालय ...
गडचिरोली शहरातील रस्ते सकाळपासूनच निर्मनुष्य झाले होते. बसस्थानकात एकही प्रवाशी नसल्याने संपूर्ण बसफेऱ्या रद्द करण्यात आल्या. काही महत्त्वाच्या गावांमध्ये शनिवारी रात्री बस मुक्कामी होत्या. त्या बस रिकाम्या आल्या. आकस्मिक स्थितीत काही चालक व वाहकांची ...
मानवजातीला संकटात टाकणाऱ्या कोरोना विषाणूची साथ रोखण्यासाठी सरकारकडून विविध उपाय केले जात आहेत. त्यात नागरिकांचा सहभागही अपेक्षित धरला जात आहे. त्यातलाच एक उपाय म्हणजे अनावश्यक गर्दी टाळणे हा होय. अनेक नागरिकांकडून हा उपाय गांभीर्याने घेतला जात नाही. ...
धानोरा तालुका मुख्यालयापासून तीन किमी अंतरावर असलेल्या सोडे येथील केंद्रावर आविका संस्थेमार्फत ९ डिसेंबर २०१९ पासून धानाची खरेदी सुरू करण्यात आली. आतापर्यंत ४७८ शेतकऱ्यांच्या एकूण १२ हजार ६६४ क्विंटल धानाची खरेदी करण्यात आली. यापैकी केवळ १६०० क्विंटल ...
विद्यार्थ्यांना सुटी असल्याने बहुतांश शिक्षक शाळेला बुट्टी मारण्याची शक्यता होती. प्रत्येक शिक्षक उपस्थित राहावा, यासाठी शिक्षकांना त्यांच्या अॅन्ड्राईड मोबाईलवरून लाईव्ह लोकेशन घेणे आवश्यक आहे. प्रत्येक केंद्राचा एक ग्रुप तयार करण्यात आला आहे. या क ...
कोरोनाचा प्रसार थांबविण्यासाठी गर्दी टाळणे आवश्यक आहे. त्यामुळे गर्दी टाळण्यासाठी आवश्यक असलेल्या विविध उपाययोजना शासनामार्फत केल्या जात आहेत. शाळांना सुटी देण्यात आली आहे. शासकीय कार्यालयांमध्ये अर्धेच कर्मचारी उपस्थित राहण्याचे आदेश काढले आहेत. बाज ...
रविवारी जनता कर्फ्यू आणि सोमवारपासून गुरूवारपर्यंत बाजारपेठ बंद राहणार असल्यामुळे गडचिरोलीसह अनेक ठिकाणी नागरिकांनी आवश्यक साहित्यांच्या खरेदीसाठी झुंबड केली होती. त्यात भाजीपाला, किराणा दुकानात सर्वाधिक गर्दी होती. रविवारी घराबाहेर न निघण्याची नागरि ...
कोरोना विषाणूच्या प्रतिबंधासाठी शासनाने उचलेली पावले अत्यंत आवश्यक असून नागरिकांनी त्याला १०० टक्के साथ द्यावी असे आवाहन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. अभय बंग यांनी केले आहे. ...