वन विभागाच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून एका कंत्राटदाराने शेतकऱ्याच्या शेतातील वृक्षांची अवैध तोड केली आहे. तसेच या वृक्षांची नियमबाह्यपणे विक्री करण्यात आली आहे. या प्रकरणाची चौकशी करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. ...
कमी किमतीत महागड्या वस्तू देण्याचे आमिष दाखवून देसाईगंजवासीयांना लाखो रुपयांनी गंडविणाऱ्या शिफा उर्फ शबाना व तिचा पती राज मोहम्मद चौधरी यांना देसाईगंज पोलिसांनी उत्तरप्रदेशातील बहेरमपूर जिल्ह्यातून अटक केली. ...
उन्हाळ्यातील दोन महिन्यांच्या सुट्यानंतर २६ जूनपासून शाळा सुरू होत आहेत. विद्यार्थ्यांचा पहिला दिवस उत्साहात जावा, शाळेत आनंदाचे वातावरण निर्माण व्हावे, यासाठी प्रत्येक शाळेने विद्यार्थ्यांच्या स्वागत समारंभाचा कार्यक्रम आयोजित करावा, असे निर्देश शिक ...
मोठ्या नद्यांची देण असतानाही सिंचन सुविधांअभावी गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दुबार पिकांपासून वंचित राहावे लागत आहेत. अशा स्थितीत जिल्ह्याच्या दक्षिण भागात प्रस्तावित असलेल्या सिंचनाच्या योजनाही रखडल्या आहेत. ...
जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष तथा आरोग्य सभापती अजय कंकडालवार यांनी सोमवारी सकाळी ९ वाजताच्या सुमारास अहेरीपासून ७ किमी अंतरावर असलेल्या महागाव आरोग्य केंद्राला भेट दिली असता, येथे एकही कर्मचारी उपस्थित असल्याचे आढळून आले नाही. दरम्यान वैैद्यकीय अधिकारी ...
सलग तीन वर्षांपासून शेतशिवार परिसरातील बंधारा फुटल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. तक्रार करूनही प्रशासनाने कोणतीही दखल घेतली नाही. त्यामुळे यंदाच्या खरीप हंगामात धानपिकाची लागवड न करण्याचा निर्णय तुकूम येथील २५ ते ३० शेतकऱ्यांनी घेतला आहे. परि ...
तालुक्यातील गट्टा येथे रविवारी १३ गावांतील मुक्तिपथ गाव संघटनेच्या कार्यकर्त्यांची क्लस्टर कार्यशाळा घेण्यात आली. गावातील दारूबंदी, गाव संघटनेचे बळकटीकरण यासह इतरही विषयांवर यावेळी चर्चा झाली. सोबतच गावांमधील दारू व खर्राविक्री बंद व्हावी यासाठी स्वा ...
दुर्गम व अतिदुर्गम तथा संवेदनशील तालुका म्हणून ओळख असलेल्या धानोरा शहरासह ग्रामीण भागात पंधरवड्यापासून वीज समस्या आहे. दिवसातून अनेकदा वीज पुरवठा खंडित होत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. ...
अहेरी उपविभागाच्या आरोग्य सेवेत शासकीय रूग्णवाहिका चालविणारे कंत्राटी चालक गेल्या अनेक वर्षांपासून चांगले योगदान देत आहे. त्यांना शासनाने न्याय दिला नाही. आता तरी शासकीय सेवेत सामावून घेऊन न्याय देण्यात यावा, अशी मागणी महाराष्ट्र कंत्राटी वाहन चालक स ...
गडचिरोली जिल्ह्यात जंगल असल्याने इतर जिल्ह्यांच्या तुलनेत विजा पडण्याचे प्रमाण अधिक आहे. २०१३ ते २०१७ या कालावधीत वीज पडून सुमारे ३५ नागरिक व शेकडो पाळीव जनावरांचा मृत्यू झाला आहे. ...