शहरं
Join us  
Trending Stories
1
"पंतप्रधानांचा उपदेश की अपयशाचा पुरावा? देश चालवणं आता तुमच्या..." राहुल गांधींचा मोदींवर निशाणा
2
Rohit Pawar : "भ्रष्टाचार करू नका, आता निवडणुका झाल्याने पंतप्रधानांचं आवाहन म्हणजे..."; रोहित पवारांचा निशाणा
3
Jewellery Stocks Fall: पंतप्रधानांचं आवाहन आणि टायटन, सेनको, कल्याण यांना बसला फटका; लग्नसराईच्या हंगामात गोल्ड शेअर्स आपटले
4
‘वाह मोदीजी वाह! देशाला बर्बाद तुम्ही करायचं आणि जबाबदारी मात्र जनतेने घ्यायची?’  विजय वडेट्टीवार यांचा टोला
5
Nepal Plane Fire: नेपाळमध्ये काळ आला होता, पण वेळ आली नव्हती! लँडिंग दरम्यान विमानाच्या टायरला आग; २८९ प्रवाशांचे प्राण थोडक्यात वाचले
6
थलापती विजयच्या शपथविधीनंतर तृषा कृष्णन गर्दीत अडकली; अभिनेत्रीच्या संयमाचं होतंय कौतुक
7
Canara Bank मध्ये ४४४ दिवसांच्या FD मध्ये २ लाख जमा केल्यास किती मिळेल व्याज, खात्यात एकूण किती रक्कम येईल?
8
कल्याण रेल्वे स्थानक की रेडलाइट एरिया ? मध्यरात्री तीन वाजेपर्यंत बेकायदा धंदे, पोलिसांचे नियंत्रण नाही
9
हार्दिक पांड्या आणि मुंबई इंडियन्समध्ये बिनसलं? इन्स्टावर अनफॉलो केलं, MI च्या गोटात काल रात्री असं काही घडलं
10
महामुंबई: मुंबई महापालिका निधी वाटपातील गटबाजीने भाजपमध्येच अस्वस्थता 
11
Chandranath Rath : मोठी कारवाई! सुवेंदू अधिकारींचे PA चंद्रनाथ यांच्या हत्येप्रकरणी हिस्ट्रीशीटरसह ३ जणांना अटक
12
हंटाव्हायरसचा विळखा! ३ जणांचा मृत्यू झालेल्या क्रूझवरून भारतीय नागरिकांची सुखरूप सुटका; पुढे काय होणार?
13
केवळ पगारवाढीवर अवलंबून आहात का?; 'ही' ३ कारणे आहेत तुम्ही श्रीमंत होण्यातील अडथळा!
14
'असदुद्दीन ओवेसी हे ओसामा बिन लादेनसारखेच, त्यांच्यात काही फरक नाही', मंत्री नितेश राणेंचे विधान
15
Post Office मध्ये ३६ महिन्यांच्या एफडीमध्ये ₹२,००,००० जमा कराल तर किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
16
Adhik Maas 2026: अधिक मसात का लावली जाते वेणीमाधव वात? काय आहे वैशिष्ट्य, महत्त्व आणि लाभ? वाचा
17
मोदींचं आवाहन, पेट्रोलियम मंत्र्यांनी मांडलं गणित, देशात पेट्रोल, डिझेलचे दर भडकणार, किमती एवढ्या रुपयांनी वाढणार
18
रील बनवण्याचे वेड अन् दोन प्रियकरांचे लफडे; भरल्या घरात बेसबॉल बॅटने नव्या बॉयफ्रेंडचा खेळ खलास
19
विजयच्या शपथविधी सोहळ्याकडे पत्नी अन् मुलांनी फिरवली पाठ, लेकाने हटवलं वडिलांचं नाव
20
भारतीय रणरागिणींचा सुवर्णवेध! शांघाय तिरंदाजी विश्वचषकात जिंकलं गोल्ड, यजमान चीनचा उडवला धुव्वा
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळी गावांची संख्या वाढणार

By admin | Updated: November 18, 2015 01:29 IST

शासनाने दिलेल्या निर्देशानुसार दिलेल्या निर्देशानुसार जिल्हा प्रशासनाने सन २०१५- १६ या वर्षाची खरीप पिकांची सुधारित नजर अंदाज पैसेवारी जाहीर केली आहे.

रबी पिकांची : सुधारित नजर अंदाज पैसेवारी जाहीर
गडचिरोली : शासनाने दिलेल्या निर्देशानुसार दिलेल्या निर्देशानुसार जिल्हा प्रशासनाने सन २०१५- १६ या वर्षाची खरीप पिकांची सुधारित नजर अंदाज पैसेवारी जाहीर केली आहे. यामध्ये ५० पैसे व त्यापेक्षा कमी आणेवारी असलेल्या गावांमध्ये १ हजार १६३ गावांचा समावेश आहे. यामुळे पूर्वीपेक्षा आता दुष्काळी गावांच संख्या वाढणार असून दुष्काळी परिस्थितीमध्ये मिळणाऱ्या सवलतीचा लाभ या गावांना मिळणार आहे.
गडचिरोली जिल्ह्यात खरीप गावांपैकी पिके नसलेली ६१ गावे आहेत. यामध्ये धानोरा तालुक्यातील ६, चामोर्शी ६, अहेरी ६, एटापल्ली ३, भामरागड २१ व सिरोंचा तालुक्यातील ७ गावांचा समावेश आहे. खरीप गावांमध्ये १ हजार ५३१ गावांचा समावेश आहे. यामध्ये गडचिरोली तालुक्यातील १२७, धानोरा २२७, चामोर्शी १८९, मुलचेरा ६९, देसाईगंज ३८, आरमोरी ९१, कुरखेडा १२८, कोरची १३३, अहेरी १२४, एटापल्ली १९७, भामरागड १२८ व सिरोंचा तालुक्यातील ८२ गावांचा समावेश आहे.
जिल्हा प्रशासनाने काढलेले ५० पैसे व त्यापेक्षा कमी आणेवारी असलेल्या गावांमध्ये १ हजार १६३ गावांचा समावेश आहे. यामध्ये गडचिरोली तालुक्यातील १२७, धानोरा २२२, चामोर्शी २६, देसाईगंज १७, आरमोरी ९७, कुरखेडा १२३, कोरची १२७, अहेरी ११८, एटापल्ली १९४, भामरागड १०७ व सिरोंचा तालुक्यातील ५ गावांचा समावेश आहे. ५० पैसेपेक्षा जास्त आणेवारी असलेल्या गावांमध्ये ३०७ गावांचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये चामोर्शी तालुक्यातील १५७, मुलचेरा ५९, देसाईगंज २१ व सिरोंचा तालुक्यातील ७० गावांचा समावेश आहे. चामोर्शी, मुलचेरा व सिरोंचा तालुका वगळता इतर तालुक्यातील सुधारित पैसेवारी ५० पैसेपेक्षा कमी आहे. यामुळे या ठिकाणी दुष्काळी परिस्थितीमध्ये राबविल्या जाणाऱ्या उपाययोजना केल्या जातील, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.