शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
5
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
6
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
7
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
8
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
9
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
10
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
11
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
12
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
13
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
14
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
15
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
16
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
17
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
18
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
19
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
20
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
Daily Top 2Weekly Top 5

चार वर्षांपासून गाळ उपशाकडे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2020 20:55 IST

पावसाळ्यापूर्वी स्थानिक स्तरावर नाल्यातील गाळाचा उपसा करणे, पथदिवे लावणे तसेच स्वच्छतेच्या दृष्टीने उपाययोजना करण्याची जबाबदारी प्रशासनाची असते. यासाठी विशिष्ट निधी ग्रा. पं. ला शासनाकडून मिळतो. मात्र याकडे दुर्लक्ष केले जाते. घोट येथे मागील चार वर्षांपासून वॉर्ड क्रमांक ४ च्या नालीतील गाळाचा उपसा करण्यात आला नाही. या नालीलगतच बोअरवेल असून सभोवताल घाण पसरली आहे.

ठळक मुद्देग्राम पंचायत उदासीन : घोटच्या वॉर्ड क्रमांक ४ मधील प्रकार; कच्च्या रस्त्यानेच आवागमन

लोकमत न्यूज नेटवर्कघोट : घोट येथील वॉर्ड क्रमांक ४ मधील नालीतील गाळाचा उपसा मागील चार वर्षांपासून करण्यात आला नाही. त्यामुळे पाऊस आल्यानंतर रस्त्यावरून पाणी वाहते. पावसाचे पाणी सांडपाण्यात मिसळत असल्याने दुर्गंधीचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. मात्र या प्रकाराकडे ग्राम पंचायतीचे दुर्लक्ष आहे. पावसाळा सुरू झाला असतानाही पथदिवे लावले नाही. कच्च्या रस्त्यानेच नागरिकांना आवागमन करावे लागत आहे.पावसाळ्यापूर्वी स्थानिक स्तरावर नाल्यातील गाळाचा उपसा करणे, पथदिवे लावणे तसेच स्वच्छतेच्या दृष्टीने उपाययोजना करण्याची जबाबदारी प्रशासनाची असते. यासाठी विशिष्ट निधी ग्रा. पं. ला शासनाकडून मिळतो. मात्र याकडे दुर्लक्ष केले जाते.घोट येथे मागील चार वर्षांपासून वॉर्ड क्रमांक ४ च्या नालीतील गाळाचा उपसा करण्यात आला नाही. या नालीलगतच बोअरवेल असून सभोवताल घाण पसरली आहे. येथून आवागमन करणाऱ्या नागरिकांना दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत आहे. याशिवाय वॉर्डातील पथदिवे तीन महिन्यापासून बंद पडले आहेत. ग्रा. पं. ला याबाबत सूचना करूनही बदलण्यात आले नाही. वॉर्डात सिमेंट काँक्रिट रस्त्याचे बांधकाम करण्यासाठी ग्रामसभेत अनेकदा मुद्दा मांडण्यात आला. परंतु काहीच झाले नाही. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष घालून वॉर्ड क्रमांक ४ मधील समस्या सोडवावी, अशी मागणी प्रकाश सातार, प्रफुल राऊत, आकाश सातार, दिवाकर सरपे, रवी सातार, अजय सरपे, सुरेंद्र सातार, अतुल सातार, नितीन सातार, नागेश राऊत, अजय सातार यांच्यासह नागरिकांनी केली.बीडीओंकडे तक्रारघोट येथील वॉर्ड क्रमांक ४ येथील नालीतील गाळाचा उपसा चार वर्षापासून झाला नाही. स्थानिक प्रशासन या वॉर्डातील समस्या सोडविण्याकडे हेतुपुरस्सर दुर्लक्ष करीत आहेत. त्यामुळे या प्रकरणात वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष घालून समस्या सोडवावी, अशी मागणी करीत प्रशासनाची तक्रार संवर्ग विकास अधिकारी, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे घोट येथील नागरिकांनी केली आहे.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायत