शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
3
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
4
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
5
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
6
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
7
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
8
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
9
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
10
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
11
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
12
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
13
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
14
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
15
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
16
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
17
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
18
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
19
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
20
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान

मिस्टर मिनिस्टर... धर्मरावबाबा जेव्हा जेव्हा आमदार तेव्हा तेव्हा मंत्रिमंडळात

By संजय तिपाले | Updated: July 3, 2023 12:27 IST

ग्रामपंचायत सदस्य ते कॅबिनेट मंत्री: जिल्ह्याच्या कारभाराची सत्तासूत्रे पुन्हा अहेरीच्या राजघराण्याकडे

संजय तिपाले

गडचिरोली : अजित पवार यांच्यासमवेत भाजप व शिवसेना (शिंदे गट) यांच्या सत्तेत सामील झालेले राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार व आदिवासींचे नेते धर्मरावबाबा आत्राम यांची कॅबिनेट मंत्री म्हणून वर्णी लागली.

त्यामुळे अहेरीतील आत्राम परिवाराच्या राजसत्तेचा रुतबा पुन्हा एकदा पहायला मिळाला आहे. विशेष म्हणजे धर्मरावबाबा जेव्हा जेव्हा आमदार म्हणून विधानसभेत गेले तेव्हा तेव्हा आमदार झाले. आमदारकीचा कार्यकाळ पूर्ण व्हायला वर्षभराचा अवधी शिल्लक असताना थेट कॅबिनेट मंत्री होऊन त्यांनी मिस्टर मिनिस्टर ही परंपराही अबाधित राखली.

ग्रामपंचायत सदस्य ते राज्याचे कॅबिनेट मंत्री असा धर्मरावबाबा यांचा विस्मयकारक राजकीय प्रवास आहे. अहेरीच्या आत्राम राजघराण्यातून आलेल्या धर्मरावबाबा यांनी १९७५ मध्ये अहेरी ग्रामपंचायतचे सदस्य म्हणून कारकिर्दीला सुरुवात केली. त्यानंतर १९८० मध्ये पंचायत समिती सभापतिपदी विराजमान झाले. त्यांनी ५० वर्षांच्या राजकीय प्रवासात सात वेळा विधानसभा निवडणूक लढवली, चारवेळा ते विजयी झाले, तर तीनवेळा त्यांना पराभवाचा सामना करावा लागला.

राजकीय चढ- उताराची कारकीर्द, गाजले अपहरण प्रकरण

धर्मरावबाबा १९९० मध्ये पूर्वीच्या सिरोंचा मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकिटावर पहिल्यांदा विधानसभेत निवडून गेले. १९९५ मध्ये बंधू राजे सत्यवानराव आत्राम यांनी त्यांचा पराभव केला. पुढे १९९९ मध्ये गोंडवाना गणतंत्र पार्टीकडून नशिब आजमावत त्यांचा अवघ्या ३७५ मतांनी विजय झाला. २००४ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडून ते विधानसभेत पोहोचले. २००९ मध्ये आदिवासी विद्यार्थी काँग्रेसचे दीपक आत्राम व २०१४ मध्ये पुतणे अंब्रिशराव आत्राम यांच्याकडून त्यांना पराभवाचा सामना करावा लागला.

२०१९ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडून धर्मरावबाबा यांनी विधानसभेत कमबॅक केले. १९९०, १९९९, २००४ अशा तिन्ही वेळच्या आमदारकीच्या कार्यकाळात त्यांनी परिवहन, सामाजिक न्याय, आदिवासी विकास, खणीकर्म, वनमंत्री म्हणून कारकीर्द गाजवली. दोनवेळा पालकमंत्रिपदही भूषविले. आता आमदारकीच्या चौथ्या टर्मच्या अखेरच्या दिवसांत त्यांना कॅबिनेट मंत्रिपदाची लॉटरी लागली आहे. दरम्यान, १९९१ मध्ये धर्मरावबाबा आत्राम हे नक्षलवाद्यांच्या हिटलिस्टवर होते, यातून त्यांचे अपहरण झाले होते. नक्षल्यांच्या तावडीत सापडलेले धर्मरावबाबा नंतर सुखरूप घरी परतले होते. या अपहरणनाट्याने तेव्हा राज्य हादरून गेले होते.

भाजप नेत्यांपुढे नवा पेच

धर्मरावबाबांना लोकसभा लढवायची आहे. त्यादृष्टीने त्यांनी राजकीय डावपेच आखण्यास सुरुवात केली हाेती. राष्ट्रवादी काँग्रेस अहेरीपुरती मर्यादित आहे, लोकसभेची जागा आघाडीत काँग्रेसकडे आहे, त्यामुळे भाजपसह सर्व पर्याय खुले ठेवल्याची चर्चा असतानाच ते अजित पवारांसोबत सत्तेत गेले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील भाजपच्या आजी- माजी नेत्यांपुढे नवा पेच निर्माण झाला आहे. धर्मरावबाबा लोकसभेसाठी कशी खेळी करतात, हे पाहणे मोठे रंजक ठरणार आहे.

टॅग्स :PoliticsराजकारणNCPराष्ट्रवादी काँग्रेसAjit Pawarअजित पवारMaharashtra Political Crisisमहाराष्ट्रातील सत्तासंघर्षGadchiroliगडचिरोलीBJPभाजपाShiv Senaशिवसेना