शहरं
Join us  
Trending Stories
1
बारावीचा आज निकाल; या संकेतस्थळांवर पाहता येणार..., कुठे आणि कसा पहावा...
2
तंदूरी रोटी बनली मृत्यूचं कारण! लग्न समारंभात भिडले २ युवक; हाणामारीत दोघांचा जीव गेला
3
भारताने रोखले चिनाबचे पाणी, लवकरच झेलमचेही थांबवणार
4
राज्यातील २,९९७ प्रकल्पांत ३३ टक्के पाणी शिल्लक; पातळी आणखी खालावणार
5
कर्नाळा येथे खाजगी प्रवासी बस उलटली; दोन प्रवाशांचा मृत्यू 
6
‘भारताबरोबर युद्ध झाले तर मी इंग्लंडला पळून जाईन’; पाकिस्तानी खासदार शेर मारवत यांचे अजब विधान 
7
निवडणूक आयोगाचे ४० मोबाइल ॲप्स एकाच प्लॅटफॉर्मवर; नाव शोधणे, तक्रार करणे सोयीचे
8
बँक, विमा, म्युच्युअल फंड असाे की शेअर बाजार; एकाच ठिकाणी होणार ‘केवायसी’ 
9
२७,८३७ विद्यार्थी आज देणार एमएचटी सीईटीची फेरपरीक्षा 
10
पाऊस पडायला अजून दीड महिना, अन् मे महिन्याच्या प्रारंभीच मुंबईचा पाणीसाठा २३ टक्क्यांवर
11
मोदी पहलगाममधील दहशतवाद्यांना धडा कधी शिकवणार? काँग्रेस नेत्याचा सवाल, राफेलला म्हटलं खेळणं  
12
अजिंक्य रहाणेनं घेतलेला कॅच भारीच! याशिवाय या दोन गोष्टींची रंगली चर्चा (VIDEO)
13
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
14
KKR vs RR : "हम तो डूबे हैं सनम तुम को भी ले डूबेंगे..." गाणं वाजलंच होतं, पण कॅसेट गुंडाळलं अन्...
15
IPL 2025 : रियान परागचा मोठा पराक्रम; ६ चेंडूत सलग ६ षटकार मारत सेट केला नवा रेकॉर्ड
16
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
17
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
18
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
19
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
20
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या

किमान वेतनासाठी पालिका कामगार उतरले रस्त्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2021 05:00 IST

एका वर्षातील २४० दिवस कामगाराने काम केले, तर त्याला विनानोटीस कामावरून कमी करता येत नाही. अचानक जुन्या कामगारांना काढून नवीन कामगारांना कामावर ठेवण्यात येऊ नये, असे सर्व नियम असले तरी, या सर्व नियमांची अंमलबजावणी न होता हे सर्व कायदे कागदावरच पाहायला मिळतात. देसाईगंज नगरपालिकेत शंभराहून जास्त रोजंदारी कामगार आहेत. या कामगारांना किमान वेतन दिले जात नाही. किमान वेतनानुसार वेतन न देता अर्ध्यापेक्षा कमी मजुरीवर त्यांना राबवून घेतले जाते, असा आराेपही कामगारांनी केला.

लाेकमत न्यूज नेटवर्कदेसाईगंज : कामगारांच्या सततच्या लढ्यामुळे शासनाला किमान वेतन कायदा करावा लागला. त्यानुसार कामगारांचे किमान वेतन घोषित करण्यात आले. दर सहा महिन्यांनी कामगारांच्या महागाई भत्त्यात वाढदेखील केली जाते. कामगारांना अन्य योजनेचा लाभसुद्धा दिला जाताे; परंतु देसाईगंज नगरपरिषदअंतर्गत कार्यरत कामगारांना किमान वेतन न देता अल्प मानधन दिले जात असून, यातून त्यांची आर्थिक लूट केली जात आहे. तसेच याविराेधात आवाज उठविणाऱ्या कामगारांना नाेटीस न देताच कामावरून काढण्यात आले आहे, असा आराेप करीत कामगारांनी बुधवारी रस्त्यावर उतरून आंदाेलन केले.एका वर्षातील २४० दिवस कामगाराने काम केले, तर त्याला विनानोटीस कामावरून कमी करता येत नाही. अचानक जुन्या कामगारांना काढून नवीन कामगारांना कामावर ठेवण्यात येऊ नये, असे सर्व नियम असले तरी, या सर्व नियमांची अंमलबजावणी न होता हे सर्व कायदे कागदावरच पाहायला मिळतात. देसाईगंज नगरपालिकेत शंभराहून जास्त रोजंदारी कामगार आहेत. या कामगारांना किमान वेतन दिले जात नाही. किमान वेतनानुसार वेतन न देता अर्ध्यापेक्षा कमी मजुरीवर त्यांना राबवून घेतले जाते, असा आराेपही कामगारांनी केला. यासाठी कामगारांना किमान वेतन, बॅंकेमार्फत पगार देण्यात यावा, या मागणीला घेऊन नगर परिषदेसमोर कामगारांनी धरणे आंदाेलन केले. त्यानंतर मागण्यांचे निवेदन मुख्याधिकाऱ्यांना दिले. मुख्याधिकाऱ्यांनी कामगारांच्या मागण्यांचा विचार करून त्यांना दिलासा देण्यासाठी याेग्य निर्णय घ्यावा. तसेच या संदर्भात जिल्हा प्रशासन व शासनाकडे पाठपुरावा करावा, अशी मागणी केली.यावेळी संघटनेचे अध्यक्ष प्रा. रमेशचंद्र दहीवडे, कार्याध्यक्ष प्रमोद गोडघाटे, अमोल मारकवार, साजीदा पठाण, संदीप लोखंडे, सुरेश राऊत, दुर्गा करंडे, नीरा हाडे, श्रध्दा पिंपळकर, माधुरी निमकर उपस्थित हाेते. 

आश्वासन हवेत विरले काय?-    शासन निर्णयानुसार कामगारांना किमान वेतन द्यावे, या मागणीला घेऊन मागील महिन्यात कामगारांनी धरणे आंदोलन करून मुख्याधिकाऱ्यांना निवेदन दिले हाेते. तेव्हा किमान वेतन तसेच बँकेमार्फत वेतन देण्याचे आश्वासन मुख्याधिकाऱ्यांनी दिले होते. परंतु महिना उलटूनही त्याची अंमलबजावणी करण्यात आली नाही. मुख्याधिकाऱ्यांचे आश्वासन हवेतच विरले काय? असा सवाल नगरपरिषदेच्या कामगारांनी धरणे आंदाेलनादरम्यान केला.-    कामगारांना किमान वेतन न देता त्यांची आर्थिक लुबाडणूक करणाऱ्या कंत्राटदारावर कारवाई का केली जात नाही, असा सवालही कामगारांनी आंदाेलनादरम्यान केला. 

 

टॅग्स :agitationआंदोलनStrikeसंप