शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
2
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
3
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
4
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
5
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
6
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
7
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
8
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
9
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
10
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
11
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
12
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
13
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
14
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
15
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
16
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
17
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
18
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
19
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
20
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर

किमान वेतनासाठी पालिका कामगार उतरले रस्त्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2021 05:00 IST

एका वर्षातील २४० दिवस कामगाराने काम केले, तर त्याला विनानोटीस कामावरून कमी करता येत नाही. अचानक जुन्या कामगारांना काढून नवीन कामगारांना कामावर ठेवण्यात येऊ नये, असे सर्व नियम असले तरी, या सर्व नियमांची अंमलबजावणी न होता हे सर्व कायदे कागदावरच पाहायला मिळतात. देसाईगंज नगरपालिकेत शंभराहून जास्त रोजंदारी कामगार आहेत. या कामगारांना किमान वेतन दिले जात नाही. किमान वेतनानुसार वेतन न देता अर्ध्यापेक्षा कमी मजुरीवर त्यांना राबवून घेतले जाते, असा आराेपही कामगारांनी केला.

लाेकमत न्यूज नेटवर्कदेसाईगंज : कामगारांच्या सततच्या लढ्यामुळे शासनाला किमान वेतन कायदा करावा लागला. त्यानुसार कामगारांचे किमान वेतन घोषित करण्यात आले. दर सहा महिन्यांनी कामगारांच्या महागाई भत्त्यात वाढदेखील केली जाते. कामगारांना अन्य योजनेचा लाभसुद्धा दिला जाताे; परंतु देसाईगंज नगरपरिषदअंतर्गत कार्यरत कामगारांना किमान वेतन न देता अल्प मानधन दिले जात असून, यातून त्यांची आर्थिक लूट केली जात आहे. तसेच याविराेधात आवाज उठविणाऱ्या कामगारांना नाेटीस न देताच कामावरून काढण्यात आले आहे, असा आराेप करीत कामगारांनी बुधवारी रस्त्यावर उतरून आंदाेलन केले.एका वर्षातील २४० दिवस कामगाराने काम केले, तर त्याला विनानोटीस कामावरून कमी करता येत नाही. अचानक जुन्या कामगारांना काढून नवीन कामगारांना कामावर ठेवण्यात येऊ नये, असे सर्व नियम असले तरी, या सर्व नियमांची अंमलबजावणी न होता हे सर्व कायदे कागदावरच पाहायला मिळतात. देसाईगंज नगरपालिकेत शंभराहून जास्त रोजंदारी कामगार आहेत. या कामगारांना किमान वेतन दिले जात नाही. किमान वेतनानुसार वेतन न देता अर्ध्यापेक्षा कमी मजुरीवर त्यांना राबवून घेतले जाते, असा आराेपही कामगारांनी केला. यासाठी कामगारांना किमान वेतन, बॅंकेमार्फत पगार देण्यात यावा, या मागणीला घेऊन नगर परिषदेसमोर कामगारांनी धरणे आंदाेलन केले. त्यानंतर मागण्यांचे निवेदन मुख्याधिकाऱ्यांना दिले. मुख्याधिकाऱ्यांनी कामगारांच्या मागण्यांचा विचार करून त्यांना दिलासा देण्यासाठी याेग्य निर्णय घ्यावा. तसेच या संदर्भात जिल्हा प्रशासन व शासनाकडे पाठपुरावा करावा, अशी मागणी केली.यावेळी संघटनेचे अध्यक्ष प्रा. रमेशचंद्र दहीवडे, कार्याध्यक्ष प्रमोद गोडघाटे, अमोल मारकवार, साजीदा पठाण, संदीप लोखंडे, सुरेश राऊत, दुर्गा करंडे, नीरा हाडे, श्रध्दा पिंपळकर, माधुरी निमकर उपस्थित हाेते. 

आश्वासन हवेत विरले काय?-    शासन निर्णयानुसार कामगारांना किमान वेतन द्यावे, या मागणीला घेऊन मागील महिन्यात कामगारांनी धरणे आंदोलन करून मुख्याधिकाऱ्यांना निवेदन दिले हाेते. तेव्हा किमान वेतन तसेच बँकेमार्फत वेतन देण्याचे आश्वासन मुख्याधिकाऱ्यांनी दिले होते. परंतु महिना उलटूनही त्याची अंमलबजावणी करण्यात आली नाही. मुख्याधिकाऱ्यांचे आश्वासन हवेतच विरले काय? असा सवाल नगरपरिषदेच्या कामगारांनी धरणे आंदाेलनादरम्यान केला.-    कामगारांना किमान वेतन न देता त्यांची आर्थिक लुबाडणूक करणाऱ्या कंत्राटदारावर कारवाई का केली जात नाही, असा सवालही कामगारांनी आंदाेलनादरम्यान केला. 

 

टॅग्स :agitationआंदोलनStrikeसंप