शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
3
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
4
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
5
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
6
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
7
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
8
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
9
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
10
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
11
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
12
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
13
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
14
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
15
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
16
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
17
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
18
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
19
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
20
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका

जारावंडीत रस्त्यासाठी गावकºयांचे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2017 00:02 IST

एटापल्ली-जारावंडी मार्गाची दुरूस्ती करावी या मुख्य मागणीसह इतर मागण्यांसाठी जारावंडी येथील नागरिकांनी मंगळवारी रास्तारोको आंदोलन केले. त्याबरोबर व्यापाºयांनी बंद पाळून आंदोलनाला आपला पाठिंबा दर्शविला.

ठळक मुद्देदिवसभर रास्ता रोको : एटापल्ली-जारावंडी मार्गाची दुरूस्ती करण्याची मागणी; व्यापाºयांनीही पाळला बंद

लोकमत न्यूज नेटवर्कएटापल्ली : एटापल्ली-जारावंडी मार्गाची दुरूस्ती करावी या मुख्य मागणीसह इतर मागण्यांसाठी जारावंडी येथील नागरिकांनी मंगळवारी रास्तारोको आंदोलन केले. त्याबरोबर व्यापाºयांनी बंद पाळून आंदोलनाला आपला पाठिंबा दर्शविला.जारावंडी ते एटापल्ली हा एटापल्ली तालुक्यातील अत्यंत महत्त्वाचा व मुख्य मार्ग आहे. याच मार्गाने या परिसरातील कर्मचारी ये-जा करतात. एटापल्ली हे तालुका स्थळ असल्याने ग्रामीण भागातील नागरिकांनाही एटापल्ली येथे नेहमी ये-जा करावे लागते. त्यामुळे या मार्गावरून वाहनांची नेहमीच वर्दळ राहते. मात्र या मार्गाची मागील अनेक वर्षांपासून दुरूस्ती करण्यात आली नाही. त्यामुळे या मार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. काही ठिकाणी तर डांबराचे निशानसुद्धा शिल्लक नाही. खड्ड्यांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याने एक खड्डा चुकविताच दुसरा खड्डा येतो. त्यामुळे सर्वच वाहनधारक कमालीचे त्रस्त झाले आहेत. या मार्गाच्या दुरूस्तीसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे अनेकवेळा तक्रार करण्यात आली आहे. मात्र या मार्गाची दुरूस्ती करण्यात आली नाही. या मार्गावर अनेक ठेंगणे पुल आहेत. ठेंगण्या पुलांवरून पावसाळ्यात पाणी राहत असल्याने या मार्गावरील वाहतूकच ठप्प पडते. या कालावधीत एखात्या गंभीर रूग्णाला दवाखाण्यात पोहोचविणेही शक्य होत नाही. परिणामी त्याला जीव गमवावा लागतो. या सर्व अडचणी लक्षात घेवून या रस्त्याची दुरूस्ती व ठेंगण्या पुलांची दुरूस्ती करण्यात यावी या मुख्य मागणीसाठी आंदोलन करण्यात आले आहे.जिल्हा परिषद सदस्य संजय चरडुके व पंचायत समिती सदस्य शालीकराम गेडाम यांच्या नेतृत्वात जारावंडी परिसरातील शेतकरी, शेतमजूर व नागरिकांनी चक्काजाम आंदोलन केले. जारावंडी येथील वीर बाबुराव शेडमाके चौकात धरणे आंदोलन व चक्काजाम आंदोलन करण्यात आले. जक्काजाम आंदोलनामुळे वाहनांची मोठी रांग लागली होती. मंगळवारी एटापल्ली येथील आठवडी बाजार होता. या आंदोलनामुळे व्यापाºयांना आठवडी बाजारात पोहोचता आले नाही. या आंदोलनाला पाठिंबा म्हणून एटापल्ली येथील व्यापाºयांनी दिवसभर बंद पाळला.आंदोलनात सरपंच सुधाकर टेकाम, शामल मडावी, मंदा गेडाम, सुनंदा उईके, वर्षा उसेंडी, माजी सरपंच हरिदास टेकाम, मनोहर हिचामी, मोहन नामेवार, दिलीप दास, तुळशिदास मडावी, अंतराम नरोटे, घनश्याम नाईक, दुलाल कुंडू, युवक काँग्रेसचे अंकित वरगंटीवार, अरूण तेलकुंटलवार आदी उपस्थित होते.जारावंडी पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी जाधव व सहाय्यक पोलीस निरिक्षक पेंढारकर यांच्या नेतृत्त्वात आंदोलनादरम्यान चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. आदोलनकर्त्यांना स्थानबध्द करण्यात आले.