शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
2
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
जय शाह T20 WC साठीचा भारतीय संघ फायनल करणार, अजित आगरकर लिस्ट घेऊन अहमदाबादला 
4
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
5
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
6
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
7
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
8
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
9
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
10
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
11
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
12
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
13
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
14
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
15
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
16
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
17
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
18
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
19
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
20
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका

शेतकरी, शेतमजुरांना सर्वाधिक फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 07, 2020 5:00 AM

शेतमालाची खरेदी बंद असल्यासारखी आहे. त्यामुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांजवळचे पैसे संपत आल्याने दैनंदिन गरजा व औषधोपचारावर होणारा खर्च कसा भागवावा, असा प्रश्न शेतकरी व शेतमजुरांसमोर निर्माण झाला आहे. शेतीची इतर कामेही करणे बंद झाले आहे. शेतमजुरांची अवस्था अतिशय बिकट झाली आहे.

ठळक मुद्देअर्थसाहाय्य व कर्ज पुरवठ्याची मागणी : कोरोना संकटामुळे ग्रामीण भागातील आर्थिक नियोजन कोलमडले

रत्नाकर बोमिडवार ।लोकमत न्यूज नेटवर्कचामोर्शी : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी देशभर लॉकडाऊन करण्यात आले. यात शहराबरोबरच खेडेही भरडल्या जात आहेत. कोरोनाचा फटका उद्योगाला बसला. परंतु ग्रामीण भागातील कृषी क्षेत्राला सर्वाधिक फटका बसल्याचे दिसून येत आहे.शेतमालाची खरेदी बंद असल्यासारखी आहे. त्यामुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांजवळचे पैसे संपत आल्याने दैनंदिन गरजा व औषधोपचारावर होणारा खर्च कसा भागवावा, असा प्रश्न शेतकरी व शेतमजुरांसमोर निर्माण झाला आहे. शेतीची इतर कामेही करणे बंद झाले आहे. शेतमजुरांची अवस्था अतिशय बिकट झाली आहे.चामोर्शी तालुक्यात शेतकऱ्यांची संख्या जिल्ह्यात सर्वाधिक आहे. तालुक्यातील शेतकरी खरीप व रबी अशा दोन्ही हंगामात पीक घेतले जाते. मात्र आता कोरोनाच्या संचारबंदीने शेतमालाला बाजारपेठ उपलब्ध होत नसल्याची समस्या निर्माण झाली आहे. शेतमजुरांची अवस्था अतिशय बिकट झाली आहे. काम मिळत नसल्याने आर्थिक विवंचनेत राहावे लागत आहे. एकीकडे मजूर मिळत नाही तर दुसरीकडे काम करता येत नाही, अशा द्विधा अवस्थेत शेतकरी, शेतमजूर सापडल्याने त्यांचे आर्थिक नियोजन ढेपाळले आहे.अनेक ठिकाणी कापणीला आलेले कडधान्य तसेच शेवटचा तोडा असलेल्या कापसाची वेचणी केव्हा होईल, याची चिंता शेतकऱ्यांना सतावत आहे. अशावेळी शासन व स्वयंसेवी संस्था त्यांना जीवनावश्यक वस्तू पुरविण्याचा पुरेपूर प्रयत्न करीत आहेत. परंतु केवळ जीवनावश्यक वस्तू पुरवून उपयोग नाही तर त्यांचा आर्थिक स्तर उंचाविण्यासाठी प्रयत्न करणे गजेचे आहे. शेतकºयांची कर्जमाफी झाली की नाही, शेतकऱ्यांना तातडीने व पुरेसा कर्जपुरवठा होतो की नाही? शेतकºयाला शेतीपयोगी वस्तू रास्त भावात उपलब्ध होतात की नाही या बाबीकडे लक्ष देणे गरजेचे आहे.कर्मचारी कोरोनाविरोधात लढत असताना त्यांनी शेतकऱ्यांचे व शेतमजुरांचे अश्रू पुसणे तितकेच महत्त्वाचे आहे. देशाची अर्थव्यवस्था ग्रामीण कृषी अर्थव्यवस्थेवर अवलंबून आहे. शेतकऱ्यांना वेळेवर अर्थ पुरवठा न झाल्यास लॉकडाऊन थांबल्यावर शेतकरी, शेतमजूर आर्थिकदृष्ट्या कोसळून पडल्याशिवाय राहणार नाही.लघु व्यावसायिक व अत्यल्प मानधनावर असणाºयांचे होणार बेहालचामोर्शी, गडचिरोली तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यात छोटे-मोठे व्यवसाय ठप्प पडले आहेत. तालुक्यासह जिल्हा मुख्यालयी असलेल्या दुकानांमध्ये अत्यल्प मानधनावर बरेच युवक काम करतात. अनेक सुशिक्षित बेरोजगारांनी ५० हजार ते १ लाख रुपयांचे भांडवल उभारून छोटे व्यवसाय उभे केले आहेत. कोणी भाड्याची खोली घेऊन, दुकानचाळीत तर कुणी ठेला लावून विविध प्रकारच्या वस्तू विक्रीचे दुकान थाटले आहेत. मात्र कोरोना संचारबंदीने गेल्या १५ ते २० दिवसांपासून किराणा वगळता इतर सर्व दुकाने व व्यवसाय पूर्णत: ठप्प पडले आहेत. डेकोरेशन, फुलवारी व इतर व्यवसाय बंद आहेत. या व्यवसायात काम करणारे मजूर व मालक आर्थिक अडचणीत सापडले आहेत.

टॅग्स :Farmerशेतकरी