शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: "आता राजही सोबत आलेला आहे", उद्धव ठाकरे यांचं मोठं विधान; १९ जुलैला 'राज' उलगडणार?
2
“२६३३ दिवस अध्यक्ष, ७ वर्षांत एकही सुट्टी घेतली नाही, एक पाऊल मागे घेतोय, पण...”: जयंत पाटील
3
चार पॅराशूटच्या मदतीने यान समुद्रात उतरले, भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला पृथ्वीवर सुखरूप परतले
4
1 कोटी Facebook अकाउंट्स ब्लॉक, Meta ने का केली इतकी मोठी कारवाई?
5
रोनाल्डोचा फॅन; सिराजनं बॅटिंग केली छान! पण फुटबॉल 'स्कील' जमलं नाही अन् चेंडू थेट... (VIDEO)
6
भारतीय लष्कराच्या मानहानी प्रकरणात राहुल गांधी लखनौ न्यायालयात सरेंडर, तत्काळ मिळाला जामीन; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
7
छांगूर बाबाच्या बेनामी मालमत्तेवर ED ची कारवाई; पुण्यात आढळली २०० कोटी रुपयांची जमीन
8
Arijit Singh: गायक अरिजीत सिंहची नवी इनिंग, 'या' सिनेमातून करणार दिग्दर्शनात पदार्पण
9
उद्धव ठाकरेंपाठोपाठ शरद पवारांनाही धक्का! भाजपामध्ये 'इनकमिंग' सुरूच; अनेकांचा पक्षप्रवेश
10
ऑलिम्पिक क्रिकेटसाठी केवळ ६ संघांना संधी, कशी ठरणार पात्रता, कोण घेणार निर्णय? नीट समजून घ्या
11
शाळा सोडली, स्वप्न थांबली, पण हार नाही मानली; आव्हानांना तोंड देत पार पाडतेय कर्तव्य
12
धक्कादायक! 'पंचायत' फेम आसिफ खानला हृदयविकाराचा झटका, म्हणाला- "एका क्षणात सगळं बदललं..."
13
एक कोटी रुपये कमाई, तरीही तो दु:खी, सोशल मीडियावर मांडली व्यथा, म्हणाला, पैसा आहे पण...   
14
५ लाखांपर्यंतचे उपचार मोफत! आयुष्मान कार्ड अंतर्गत नेमके कोणते आजार येतात? लगेच तपासा!
15
शुभांशू शुक्ला परतले, पंतप्रधान मोदींनी स्वागत केले; गगनयान मोहिमेचा उल्लेख करत म्हणाले...
16
Astro Tips: सगळं काही चांगलं आहे, तरी लग्न होत नाही; याला कारणीभूत ठरू शकते ग्रहदशा!
17
Olympics 2028: ऑलिंम्पिकचं वेळापत्रक जाहीर! कधी, कुठं रंगणार क्रिकेट सामने? A टू Z माहिती
18
फक्त २० रुपयांमध्ये २ लाखांचा विमा! मोदी सरकारची 'ही' योजना संकटात बनेल आधार! कसा करायचा अर्ज?
19
"मराठी माणसानेच मराठी भाषेचं नुकसान केलं...", आपल्याच भाषेबद्दल हे काय बोलून गेला आस्ताद काळे? भडकले चाहते
20
"खाण्यासाठीच कमावतोय..."; मॅनेजरने लंच ब्रेक घेण्यापासून रोखलं, कर्मचाऱ्याने सडेतोड उत्तर दिलं

शेतात एकही थेंब न जाता लाखाे रुपये पाण्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:45 IST

गडचिराेली जिल्ह्यात सिंचनाच्या साधनांचा अभाव आहे. माेजक्याच शेतकऱ्यांकडे सिंचनाची साेय असल्याने ते वर्षभर शेती कसत आहेत. परंतु ज्या शेतकऱ्यांकडे ...

गडचिराेली जिल्ह्यात सिंचनाच्या साधनांचा अभाव आहे. माेजक्याच शेतकऱ्यांकडे सिंचनाची साेय असल्याने ते वर्षभर शेती कसत आहेत. परंतु ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची साेय नाही, असे शेतकरी पावसाच्या पाण्यावर शेती करतात. जाेगीसाखरा परिसरात शेतकऱ्यांच्या मागणीनुसार २७-२८ वर्षांपूर्वी गावालगतच्या नाल्यावर सिंचनासाठी बंधारे बांधण्यात आले. परंतु त्यांचा उपयाेग शेतकऱ्यांना झाला नाही. नाल्यावरील बंधाऱ्यातून पाणी नेण्यासाठी मोठे पाॅवर हाऊस बांधून माेटारीसुद्धा बसवण्यात आल्या. परंतु शेतकऱ्यांची सिंचन व्यवस्थापन समिती गठित करून त्यांच्यावर जबाबदारी सोपविण्यासाठी सिंचन विभागाने लक्ष घातले नाही. परिणामी शेतकऱ्यांचे संघटन न झाल्यामुळे सिंचनाची परिपूर्ण सोय होऊ शकली नाही. सिंचनापासून शेतकऱ्यांना वंचित राहावे लागले. शेतकऱ्यांच्या शेतात एकही थेंब पाणी न जाता लाखो रुपये पाण्यात गेले. त्याला सिंचन विभागासोबतच लाभ घेणारे शेतकरीही तेवढेच जबाबदार आहेत.

जाेगीसाखरा परिसरात बहुतांश शेतकऱ्यांनी शेतजमिनीत बाेअर मारले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या विहिरीतील पाणी तळाला गेले. सिंचनाशिवाय शेती नाही, हे पटल्याने या परिसरातील शेतकरी सिंचनाची साेय करण्यासाठी धडपडत आहेत. शासनाने नाल्यावरील जुन्या बंधाऱ्यांची दुरुस्ती करावी, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.

बाॅक्स

लाभ नसतानाही शेती ओलिताखाली

जाेगीसाखरालगतच्या नाल्यावर बंधारे बांधून येथून शेतापर्यंत पाणी पाेहाेचविण्यासाठी प्रत्येक विहिरीमध्ये मोठी पाईपलाईन आणि सर्व सोयी-सुविधा उपलब्ध करून दिल्या होत्या; परंतु सिंचन याेजना पूर्णपणे कार्यान्वित न झाल्याने तिचा उपयाेग शेतकऱ्यांना याेग्यप्रकारे हाेऊ शकला नाही. शेताजवळ सिंचन बंधारे असल्याची नोंद सात-बारावर असल्यामुळे शेती ओलिताखाली असल्याचे दर्शविले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना सिंचन विहिरीचा लाभ घेता येत नाही. बहुतांश शेतकरी अल्पशिक्षित असल्याने त्यांनी सात-बारावरील ही नाेंद काढली नाही. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष घालून बंधाऱ्याची दुरुस्ती करावी किंवा शेतकऱ्यांना सिंचनाचा लाभ द्यावा, अशी मागणी हाेत आहे.