शहरं
Join us  
Trending Stories
1
“उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांसोबत केले, तेच आदित्य करताहेत”; शिंदेंच्या नेत्यांनी इतिहास काढला
2
LPG Gas Cylinder Booking Rules : गॅस सिलिंडर बुकिंगशी संबंधित २ नवीन अपडेट्स, एलपीजी पुरवठ्याबाबत सरकारने काय सांगितले? जाणून घ्या
3
Latest Marathi News LIVE Updates: भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली
4
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
5
Savita Pradhan : "नवरा छळायचा, बादलीत लघवी करुन अंगावर फेकली", IAS सविता प्रधान सांगतात असह्य छळ
6
"तर महाराष्ट्राला मोठी किंमत चुकवावी लागेल"; विजय वडेट्टीवार यांचा महायुतीला सूचक इशारा
7
'या' दिग्गज टेक कंपनीकडून भारतीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट: ५ लाखांपासून १ कोटीपर्यंत मिळणार बोनस
8
आता प्रवासावेळी टायर फाटलं तरी टेन्शन नाही...! या नव्या SUV ची जोरदार चर्चा; फीचर्सही भन्नाट
9
Home Decoration: मातीची गरज नाही, फक्त हवी काचेची बरणी आणि रोपटं! 'वॉटर गार्डनिंग'ने बदला घराचा लूक
10
छ. संभाजीनगर, वाठार, पेठवडगाव, जयसिंगपूर ४ बस स्थानकांचे उद्घाटन; प्रताप सरनाईकांचा दौरा
11
पाकिस्तान कोणता खेळ खेळतंय? इराण युद्ध काळात तुर्की, सौदी अन् कतारला चाललेत PM शहबाज शरीफ
12
'देखणी नवरी मिळेल' सांगितलं अन् ७ हजार जणांना लुटलं; लोकांना फसवणाऱ्या मॅट्रिमोनियल साईटचा असा झाला गेम!
13
अमरावतीत 'योगी स्टाईल' कारवाई! अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
14
होर्मुझनंतर आता 'मलक्का'वर अमेरिकेची नजर; ट्रम्प यांची नवी खेळी! भारतासाठी ठरणार गेमचेंजर?
15
“सुनेत्रा काकींना ९९% मतदान होईल, अजितदादांना स्मरून मतदान करा”; रोहित पवार प्रचाराला लागले
16
आदित्य ठाकरे आता उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होणार?; संजय राऊतांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
17
कोविड लसींच्या सक्तीमुळे शेन वॉर्नचा मृत्यू, मुलाचा खळबळजनक दावा
18
Vastu Tips: घरात ठेवलेली रोपं केवळ शोभेची वस्तू नाहीत, ती निर्माण करतात 'लाईव्ह एनर्जी'; वाचा वास्तू रहस्य
19
चीनला इराणकडून तेल खरेदी करू देणार नाही; ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाने दिली मोठी धमकी
20
मोबाईल दुकानदार होता टार्गेट, बळी गेला व्यापाऱ्याचा; कोल्हापुरात खंडणीसाठी बॅटरीचा शॉक देऊन हत्या
Daily Top 2Weekly Top 5

विकास आराखडा बनविताना आधी साध्य ठरवा

By admin | Updated: June 29, 2016 01:32 IST

गावस्तरावर विकास नियोजनाचे उद्ष्टि प्रथम निश्चित करुन ते गाठण्यासाठीचे नियोजन केल्यास गावपातळीवर प्रतिमाणसी उत्पन्न वाढ होवू शकेल .

जिल्हाधिकाऱ्यांचे प्रतिपादन : तीन विभागांची संयुक्त बैठकगडचिरोली : गावस्तरावर विकास नियोजनाचे उद्ष्टि प्रथम निश्चित करुन ते गाठण्यासाठीचे नियोजन केल्यास गावपातळीवर प्रतिमाणसी उत्पन्न वाढ होवू शकेल असे प्रतिपादन जिल्हाधिकारी ए.एस.आर. नायक यांनी सोमवारीे केले. १४ वित्त आयोगाच्या निर्देशानुसार &‘‘आमचं गांव आमचा विकास’’ उपक्रमांतर्गत ग्रामपंचायत विकास आराखडा तयार करण्यासंदर्भात यशदा व जिल्हापरिषद आणि प्रकल्प अधिकारी विकास यांची एक संयुक्त बैठक जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात सोमवारी झाली. त्यावेळी ते बोलत होते.ग्रामपंचायत शब्द वापरण्यात आला असला तरी प्रत्यक्षात गाव पातळीवर नियोजन करण्याच्या दृष्टिकोनातून यात प्रथम साध्य निश्चित करावे लागेल, असे सांगून जिल्हाधिकारी म्हणाले की, शिक्षण, आरोग्य आणि उपजिविका यांचा स्तर उंचावतांना व्यक्तीनिहाय उत्पन्नवृद्धीचे नियोजन यात करण्यात यावे. या बैठकीत प्रकल्पअधिकारी कौस्तुभ दिवेगावकर, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी एस. आर. धनकर, यशदाचे राजेश डोंगरे, शिक्षणाधिकारी माणिक साखरे, आरोग्य अधिकारी डॉ. अमित साळवे आदींची उपस्थिती होती.गडचिरोली जिल्हयात पेसा गावांची संख्या अधिक आहे. त्यामुळे याचे मुल्यमापन करण्याच्या दृष्टिकोनातून राज्यातील इतर जिल्ह्यापेक्षा वेगळ्या पद्धतीचे नमुने तयार करणार आहेत. याबाबत या बैठकीत विस्तृत चर्चा झाली. गावाचा विकास करताना काही प्रमाणात प्रतिबंधात्मक उपाययोजनेतून व्यक्तिकबचत वाढू शकते. सोबतच कृषी यांत्रिकीकरणासारख्या उपायांची जोड दिली तर उत्पन्नवृद्धी होऊ शकते. याची सांगड घालून समूह विकासासोबतच वैयक्तिक विकासाकडेही लक्ष देणारे नियोजन असावे, असे जिल्हाधिकारी म्हणाले.१४ व्या वित्त आयोगातर्फे प्राप्त होणारा निधी, गावाला मिळालेला बक्षिसाचा निधी तसेच ५ टक्के पेसा निधी यांच्या जोडीला ग्रामपंचायतचा स्वत:चा निधी यावर हा उपक्रम आधारलेला आहे. गडचिरोलीत ग्रामपंचायतीव्यतिरिक्त गाव पातळीवर तेंदू व बांबू लिलावातून येणारा गावाचा पैसा या कामात वापरता यावा असा तांत्रिक बदल जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी सुचविले. गावपातळीवर येत्या ५ वर्षात विविध क्षेत्राचे साध्य ठेवत ५ वर्षात विकास घडावा या दृष्टिने हा उपक्रम जाहिर करण्यात आलेला आहे. यात वार्षिक आराखडा व पंचवार्षिक आराखडा आठ दिवसात तयार करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिले.