शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचे लाड सुरूच! अमेरिकेचा आणखी एक धक्का, 'या' संघटनेवर मारला दहशवादाचा शिक्का
2
Indian Embassy in Pakistan :'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान घाबरला! इस्लामाबादमधील भारतीय राजदूतांना पाणी, गॅस पुरवठा थांबवला, वर्तमानपत्रांवरही बंदी
3
शिवाजी विद्यापीठात विद्यार्थीनीने वसतिगृहात टोकाचे पाऊल उचलले; नेमके कारण काय?
4
कबुतरखान्यांबद्दल 'सर्वोच्च' निर्णय आला, आता सरकार काय करणार? CM फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
5
'एसआयआर'वरून विरोधकांच्या गदारोळावर निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा; पुरावा म्हणून व्हिडीओ जारी; काँग्रेस बॅकफूटवर
6
PM Modi and Zelenskyy phone Call : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी PM मोदींशी चर्चा केली; लवकरच भारत दौऱ्यावर येऊ शकतात
7
Donald Trump's Tariffs : मोठी तयारी! कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार! भारत या शस्त्राचा वापर करणार
8
ट्रेनिंगमध्ये जुळले सूत, स्वीटीसोबत लग्नानंतरही शरीरसंबंध; आता आयुष्यातूनच उठला, पोलीस उपनिरीक्षक महिलेला अटक
9
नाशिकमध्ये शिंदेसेनेच्या बैठकीत अहिल्यानगरचे दोन गट भिडले; शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा दावा
10
Bank Job: बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार; आयओबीमध्ये भरती, महाराष्ट्रासाठी 'इतक्या' जागा राखीव
11
टी-२० आशिया कपमध्ये सर्वात मोठी खेळी करणारे टॉप-५ फलंदाज!
12
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
13
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
14
अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप
15
सोन्याचं नक्षीकाम, एकधारी पातं, मुल्हेरी मूठ... महाराष्ट्राने लिलावात जिंकली 'फिरंग' तलवार (PHOTOS)
16
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
17
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
18
ट्रेनच्या फूटबोर्डवर बसताच गर्दुल्ल्याचा हल्ला; तोल जाऊन खाली पडलेल्या प्रवाशाने पाय गमावला, आरोपीला अटक
19
ChatGPT चा सल्ला घेणं बेतलं जीवावर, मिठाऐवजी खाल्लं 'विष', नेमकं काय आहे हे प्रकरण?
20
शेकडो वाहनांचा ताफा, फुलांचा वर्षाव, इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या आकाश दीपचं घरी जंगी स्वागत

विकास आराखडा बनविताना आधी साध्य ठरवा

By admin | Updated: June 29, 2016 01:32 IST

गावस्तरावर विकास नियोजनाचे उद्ष्टि प्रथम निश्चित करुन ते गाठण्यासाठीचे नियोजन केल्यास गावपातळीवर प्रतिमाणसी उत्पन्न वाढ होवू शकेल .

जिल्हाधिकाऱ्यांचे प्रतिपादन : तीन विभागांची संयुक्त बैठकगडचिरोली : गावस्तरावर विकास नियोजनाचे उद्ष्टि प्रथम निश्चित करुन ते गाठण्यासाठीचे नियोजन केल्यास गावपातळीवर प्रतिमाणसी उत्पन्न वाढ होवू शकेल असे प्रतिपादन जिल्हाधिकारी ए.एस.आर. नायक यांनी सोमवारीे केले. १४ वित्त आयोगाच्या निर्देशानुसार &‘‘आमचं गांव आमचा विकास’’ उपक्रमांतर्गत ग्रामपंचायत विकास आराखडा तयार करण्यासंदर्भात यशदा व जिल्हापरिषद आणि प्रकल्प अधिकारी विकास यांची एक संयुक्त बैठक जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात सोमवारी झाली. त्यावेळी ते बोलत होते.ग्रामपंचायत शब्द वापरण्यात आला असला तरी प्रत्यक्षात गाव पातळीवर नियोजन करण्याच्या दृष्टिकोनातून यात प्रथम साध्य निश्चित करावे लागेल, असे सांगून जिल्हाधिकारी म्हणाले की, शिक्षण, आरोग्य आणि उपजिविका यांचा स्तर उंचावतांना व्यक्तीनिहाय उत्पन्नवृद्धीचे नियोजन यात करण्यात यावे. या बैठकीत प्रकल्पअधिकारी कौस्तुभ दिवेगावकर, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी एस. आर. धनकर, यशदाचे राजेश डोंगरे, शिक्षणाधिकारी माणिक साखरे, आरोग्य अधिकारी डॉ. अमित साळवे आदींची उपस्थिती होती.गडचिरोली जिल्हयात पेसा गावांची संख्या अधिक आहे. त्यामुळे याचे मुल्यमापन करण्याच्या दृष्टिकोनातून राज्यातील इतर जिल्ह्यापेक्षा वेगळ्या पद्धतीचे नमुने तयार करणार आहेत. याबाबत या बैठकीत विस्तृत चर्चा झाली. गावाचा विकास करताना काही प्रमाणात प्रतिबंधात्मक उपाययोजनेतून व्यक्तिकबचत वाढू शकते. सोबतच कृषी यांत्रिकीकरणासारख्या उपायांची जोड दिली तर उत्पन्नवृद्धी होऊ शकते. याची सांगड घालून समूह विकासासोबतच वैयक्तिक विकासाकडेही लक्ष देणारे नियोजन असावे, असे जिल्हाधिकारी म्हणाले.१४ व्या वित्त आयोगातर्फे प्राप्त होणारा निधी, गावाला मिळालेला बक्षिसाचा निधी तसेच ५ टक्के पेसा निधी यांच्या जोडीला ग्रामपंचायतचा स्वत:चा निधी यावर हा उपक्रम आधारलेला आहे. गडचिरोलीत ग्रामपंचायतीव्यतिरिक्त गाव पातळीवर तेंदू व बांबू लिलावातून येणारा गावाचा पैसा या कामात वापरता यावा असा तांत्रिक बदल जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी सुचविले. गावपातळीवर येत्या ५ वर्षात विविध क्षेत्राचे साध्य ठेवत ५ वर्षात विकास घडावा या दृष्टिने हा उपक्रम जाहिर करण्यात आलेला आहे. यात वार्षिक आराखडा व पंचवार्षिक आराखडा आठ दिवसात तयार करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिले.