शहरं
Join us  
Trending Stories
1
बॅक टू बॅक! उद्धव ठाकरे कणकवलीत सभा घेणार, दुसऱ्याच दिवशी राज यांचीही तोफ धडाडणार
2
Narendra Modi : "काँग्रेस इथे मरतेय, तिकडे पाकिस्तान रडतंय; राजपुत्राला पंतप्रधान बनवण्यासाठी उतावीळ"
3
'मोदींनी तुम्हाला लायक समजलं नाही'; CM पदाची ऑफर होती म्हणणाऱ्या फडणवीसांना राऊतांचे प्रत्युत्तर
4
"माझ्या 40 वर्षांच्या आयुष्यात असं कधीच घडलं नाही", काँग्रेस प्रवक्त्या राधिका यांचा माजी मुख्यमंत्र्यांवर निशाणा
5
मालकीण-मोलकरणीचा जुळलेला अचूक 'योग', कसा आहे 'नाच गं घुमा?' वाचा
6
दिंडोरीत भाजपाला मोठा धक्का, माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांची बंडखोरी, अपक्ष निवडणूक लढवणार 
7
SPARC shares: १४ दिवसांपासून घसरत होता शेअर, ४९% नी आपटला; आता खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
8
"ज्या बूथवर काँग्रेसला एक मतही मिळणार नाही, तिथे 25 लाखांची विकासकामं केली जातील"
9
उच्च कोलेस्ट्रॉलमुळे हृदयविकाराचा धोका; रोजच्या आहारात करा आवश्यक बदल!
10
"अनंत गीतेंचे आयुष्य धर्माच्या नावाखाली निवडणूक लढण्यात गेले, ही निवडणूक भवितव्य घडवणारी"
11
'उर्दू भाषेसोबत अन्याय का?' संजय लीला भन्साळींची 'हीरामंडी'सीरिज पाहून भडकला शीजान खान
12
Fact Check: अधीर रंजन चौधरींनी भाजपाला मतदान करण्याचे आवाहन केलेले नाही! व्हायरल झालेला व्हिडीओ 'अर्धवट'!
13
तुम्हाला ‘श्री स्वामी समर्थ’ नामाचा अर्थ माहिती आहे का? प्रभावी मंत्र अन् सुखी जीवनाची वचने
14
कोव्हिशिल्ड साईड इफेक्ट: दोन मृत मुलींचे पालक सीरम इन्स्टिट्यूटला कोर्टात खेचणार
15
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : उद्धव ठाकरेंकडूनच कोल्हापूरच्या गादीचा अपमान, उदय सामंत यांचा आरोप
16
सर्पदंशाने तरुणाचा मृत्यू; जिवंत करण्यासाठी मृतदेह दोन दिवस गंगेच्या पाण्यात लटकवला...
17
ठाकरे गटाला पॉर्न संस्कृती रुजवायची आहे का? चित्रा वाघ यांचा हल्लाबोल
18
Rahul Gandhi : "न रहेगा बांस, न बजेगी बांसुरी म्हणजे सरकारी नोकऱ्या नाहीत, आरक्षण नाही"; राहुल गांधींचा घणाघात
19
उद्धव ठाकरेंनी मागितली संभाजीराजेंची माफी; "आम्ही शेण खाल्लं म्हणून तुम्ही..."
20
Lok Sabha Election 2024: लोकसभेला 'मविआ' किती जागा जिंकणार? विधानसभा निवडणुकीत काय घडणार? Jayant Patil यांनी केले २ मोठे दावे

मजुरांसाठी धावली लालपरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2020 5:00 AM

राजस्थान, मध्यप्रदेश, आसाम, तामिलनाडू, आंध्रप्रदेश, तेलंगणा आदी राज्यातील मजूर लॉकडाऊनमुळे गडचिरोली जिल्ह्यात अडकून पडले होते. या मजुरांना देसाईगंज, नागपूर येथे सोडून देण्यात आले आहे. लॉकडाऊनच्या कालावधी इतर सर्व सेवा बंद होत्या. तसेच मजुरांच्या गर्दीमुळे वाहक, चालकांना कोरोनाचा संसर्ग होण्याची भीती असतानाही एसटी कर्मचाऱ्यांनी मजुरांना त्यांच्या गावापर्यंत सोडून दिले.

ठळक मुद्देअडचणीच्या काळात मदत : लॉकडाऊनच्या कालावधित अडीच हजार मजुरांना पोहोचविले घरी

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : लॉकडाऊनमुळे सेवा बंद असल्याने एसटीवरील आर्थिक संकट अधिकच गडद झाले आहे. अशाही परिस्थितीत एसटीने सामाजिक जबाबदारी पार पाडताना जिल्हाभरातील जवळपास २ हजार ५०० मजुरांना त्यांच्या गावापर्यंत एसटीने पोहोचवून दिले आहे.केंद्र शासनाने ४ मे पासून मजुरांना त्यांच्या घरी जाण्याची परवानगी दिली. गडचिरोली जिल्ह्यातील बहुतांश मजूर तेलंगणा राज्यात मिरची तोडण्यासाठी गेले होते. या मजुरांना तेलंगणा राज्यातील वाहने आष्टी, सिरोंचा येथे सोडत होते. लॉकडाऊनच्या कालावधीत सर्वच खासगी वाहनांची सेवा बंद असल्याने एसटीशिवाय पर्याय नव्हता. अशा संकटकाळात एसटीने सामाजिक जबाबदारीची जाणीव ठेवत मजुरांना त्यांच्या गावापर्यंत पोहोचवून दिले आहे. विशेष म्हणजे शारीरिक अंतर ठेवून प्रवाशी बसविल्याने एसटीच्या प्रवाशी क्षमतेच्या केवळ अर्धेच प्रवाशी बसविले जात होते. त्यामुळे एसटीचा खर्चही भरून निघणे कठीण होते. तरीही एसटी बसगाड्या सोडण्यात आल्या. प्रत्यक्ष त्यांच्या गावापर्यंत मजुरांना सोडण्यात आले.आंध्रप्रदेश राज्यातून काही मजूर रेल्वेने देसाईगंज येथे आले. या प्रवाशांनाही त्यांच्या गावी सोडण्यात आले. काही प्रवाशी चालत गडचिरोलीपर्यंत पोहोचत होते. गडचिरोली येथील बसस्थानकात पोहोचल्यानंतर एसटीने सोडून देण्याची विनवणी करीत होते. अशाही प्रवाशांना एसटीने त्यांच्या गावार्यंत सोडून दिले आहे.राजस्थान, मध्यप्रदेश, आसाम, तामिलनाडू, आंध्रप्रदेश, तेलंगणा आदी राज्यातील मजूर लॉकडाऊनमुळे गडचिरोली जिल्ह्यात अडकून पडले होते. या मजुरांना देसाईगंज, नागपूर येथे सोडून देण्यात आले आहे. लॉकडाऊनच्या कालावधी इतर सर्व सेवा बंद होत्या. तसेच मजुरांच्या गर्दीमुळे वाहक, चालकांना कोरोनाचा संसर्ग होण्याची भीती असतानाही एसटी कर्मचाऱ्यांनी मजुरांना त्यांच्या गावापर्यंत सोडून दिले. गावापर्यंत पोहोचलेल्या मजुरांच्या चेहऱ्यावर एसटीच्या मदतीमुळे हास्य उमलल्याचे दिसून येत होते.पायदळ मजूर आशेने गाठतात बसस्थानकचंद्रपूर व इतर जिल्ह्यातून काही मजूर अजूनही परत येत आहेत. सदर मजूर गडचिरोलीपर्यंत मालवाहू किंवा इतर साधनाने येतात. गडचिरोली येथे आल्यानंतर सर्वप्रथम बसस्थानक गाठतात. या मजुरांसाठी बससेवा उपलब्ध करून दिली जात आहे. कोरोनाच्या भीतीमुळे खासगी बसचालकांनी सेवा पूर्णपणे बंद केली आहे. अशा परिस्थितीत मजूर व सामान्य व्यक्तीच्या मदतीला एसटी धावून आली आहे.एसटीने आजपर्यंत अनेक चढ-उतार बघितले आहेत. एसटीने उत्पन्नापेक्षा सामाजिक जबाबदारीला नेहमीच प्राधान्य दिले आहे. लॉकडाऊनच्या कालावधीत निम्मेच प्रवाशी बसविण्याचे निर्देश केंद्र शासनाने दिले आहेत. एवढे प्रवाशी बसवून एसटी चालविणे कठीण आहे. मात्र लॉकडाऊनच्या कालावधीत मजुरांचे हाल होऊ नयेत, यासाठी बसेस सोडण्यात आल्या. अडचणीच्या काळात एसटी मजुरांच्या मदतीसाठी धाऊन गेली, याचे समाधान आहे.- अशोककुमार वाडीभस्मे,विभाग नियंत्रक, गडचिरोली

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याstate transportएसटी