शहरं
Join us  
Trending Stories
1
उमेदवारी अर्ज मागे घेऊन काँग्रेस उमेदवार भाजपत; तिसऱ्या जागी विजय निश्चित
2
एआयद्वारे फेक व्हिडीओ; अघटित घडविण्याचा डाव; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विराेधकांवर हल्लाबाेल
3
सेक्स स्कँडल : प्रज्वलची पक्षातून हकालपट्टी; माजी पंतप्रधान देवेगौडांचे कुटुंब आरोपांनी घेरले
4
भाजप व रा. स्व. संघाची संविधान बदलण्याची योजना : राहुल गांधी
5
तीन विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी घसरली, तरीही राज ठाकरे महायुतीला का हवे आहेत?
6
पारा वाढता वाढे, देशभरात उकाडा; वाढत्या तापमानाने नागरिक हैराण, राज्यातही उष्णता वाढणार
7
राहुल शेवाळे यांच्या स्थावर मालमत्तेत सात कोटींची वाढ; २०१९'ला स्थावर मालमत्ता नसल्याचे नमूद होते
8
अरविंद सावंत यांच्याकडे एकच कार; संपत्ती पाच वर्षांत दुप्पट
9
अनिल देसाई यांच्या मालमत्तेत पावणेतीन कोटींची वाढ; स्थावर मालमत्तेत वाढ नाही
10
कांद्याची फसवी फाेडणी; सरकारचे शेतमाल निर्यातीचे धाेरण नेहमीच ग्राहकहिताचे
11
मुख्यमंत्री खूप दिवस गैरहजर राहू शकत नाहीत; विद्यार्थ्यांचे हक्क पायदळी तुडवता येणार नाहीत; दिल्ली हायकोर्ट
12
राजन विचारे यांच्या मालमत्तेत ११ कोटींची वाढ; रत्नागिरी जिल्ह्यात शेतजमीन
13
नागपूर विमानतळ उडविण्याची धमकी; ई-मेलनंतर प्रशासन अलर्ट मोडवर; सुरक्षा व्यवस्थेत वाढ
14
‘ठाण्या’चे नाक दाबून तीन मतदारसंघ भाजपने घेतले सोडवून
15
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
16
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
17
भाजप नेते दुष्यंत गौतम यांच्या कारला अपघात, मणक्याला दुखापत
18
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
19
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
20
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे

एमआयडीसीत सुविधांचा अभाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2019 6:00 AM

वनसंपदा व नैसर्गिक संपदेने नटलेल्या गडचिरोली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कच्चा माल आहे. या कच्च्या मालावर आधारीत उद्योग सुरू करण्यासाठी चांगला वाव आहे. उद्योग स्थापन करण्यासाठी जमीन, पाणी, मजूर, वीज व भांडवल या गोष्टी आवश्यक आहेत.

ठळक मुद्देआठ वर्षांपासून दुर्लक्ष : अहेरी उपविभागात बेरोजगारीची समस्या गंभीर

लोकमत न्यूज नेटवर्कअहेरी : अहेरी येथे शासनाने एमआयडीसी स्थापन केली. मात्र या ठिकाणी उद्योगांसाठी आवश्यक असलेल्या सोयीसुविधा निर्माण करून दिल्या नाही. त्यामुळे उद्योजकांनी एमआयडीसीकडे पाठ फिरविली आहे. केवळ एमआयडीसीचा बोर्ड झळकत आहे.वनसंपदा व नैसर्गिक संपदेने नटलेल्या गडचिरोली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कच्चा माल आहे. या कच्च्या मालावर आधारीत उद्योग सुरू करण्यासाठी चांगला वाव आहे. उद्योग स्थापन करण्यासाठी जमीन, पाणी, मजूर, वीज व भांडवल या गोष्टी आवश्यक आहेत. या सर्व बाबी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने अहेरी येथे एमआयडीसीची स्थापना करण्यात आली. मात्र हा केवळ सोपस्कार ठरला आहे. एमआयडीसी स्थापन होऊन आठ वर्षांचा कालावधी उलटला तरी शासनाने या ठिकाणी कोणत्याही सोयसुविधा निर्माण करून दिल्या नाहीत. सुविधा नसल्याने उद्योजकांनी सुध्दा पाठ फिरविली आहे. अहेरी येथील एमआयडीसी प्राणहिता नदीच्या तिरावर आहे. त्यामुळे येथील उद्योगांना मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध होऊ शकते. मात्र इतर सुविधा नसल्याने उद्योजकांची अडचण झाली आहे. एकीकडे बेरोजगारी वाढत असताना शासन मात्र उद्योगांना चालना देण्याकडे व सोयीसुविधा पुरविण्याकडे दुर्लक्ष केले असल्याचे दिसून येते. उद्योग नसल्याने येथील जनतेला केवळ शेतीच्या भरवशावर अवलंबून राहावे लागते. शेतीतून केवळ चार महिन्यांचा रोजगार उपलब्ध होतो. उर्वरित कालावधीत मात्र बेरोजगारीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे राहणीमानाचा दर्जा उंचावण्याऐवजी खालावत चालला आहे. तरूण वर्ग विविध व्यसनांच्या आहारी जात आहे. अहेरी येथील एमआयडीसीत सोयीसुविधा पुरवाव्या, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.वनोद्योग उभारावेअहेरी उपविभागातील सर्वच तालुके जंगलाने व्यापले आहेत. जंगलातील लाकडाचा वन विभाग लिलाव करते. येथील लाकूड विविध राज्यांमध्ये पाठविला जाते. वनोपजाची सुध्दा अत्यंत कमी दराने विक्री केली जाते. वनोपज व लाकडावर आधारीत उद्योग स्थापन केल्यास स्थानिक युवकांना रोजगार मिळण्यास मदत होईल. 

टॅग्स :MIDCएमआयडीसी