शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंचा भुजबळांवर हल्लाबोल; मुख्यमंत्र्यांनी बाजू सावरली, म्हणाले...
2
"पाकिस्तानात निघून जा अन् तिथे मुस्लिमांना आरक्षण द्या"; CM सरमा यांचा लालू यादवांवर निशाणा
3
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
4
आधी पाया पडते, पदर पसरते म्हणणारे आता गुरगुरत आहेत; जरांगेंची मुंडे बहीण-भावावर टिका
5
Smriti Irani : "अमेठीत पोलिंग बूथ कॅप्चर करणारे एका सामान्य कार्यकर्तीकडून हरले..."; स्मृती इराणींचा घणाघात
6
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
7
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...
8
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!
9
"भारतापेक्षा अधिक तेजस्वी, प्रखर लोकशाही जगात कुठेही नाही"; व्हाईट हाऊसने केली स्तुती
10
रिपाईला एकही जागा मिळाली नाही, पण मला कॅबिनेट मिळणार - रामदास आठवले
11
...तर २८८ जागा लढवणार, ७ ते ८ उपमुख्यमंत्री करणार; मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ठरला
12
'राजा हिंदुस्तानी'साठी करिश्मा कपूर नाही तर ऐश्वर्या राय होती पहिली पसंती, या कारणामुळे अभिनेत्रीने नाकारला सिनेमा
13
१५,२०,२५ आणि ३० वर्षांसाठी घ्यायचंय ३० लाखांचं Home Loan, किती द्यावा लागेल EMI, किती व्याज?
14
सिंचन घोटाळ्याबाबत आम्ही अजित पवारांवर आरोप केले, कारण...; फडणवीस पहिल्यांदाच स्पष्टपणे बोलले!
15
MI च्या शेवटच्या सामन्यानंतर कोच बाऊचर यांचा प्रश्न, पुढे काय? रोहित शर्मानं स्पष्ट सांगितलं
16
सोमवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार की नाही; BSE-NSE बंद राहणार का? जाणून घ्या
17
मोठी बातमी! MI च्या खराब कामगिरीनंतर सूत्र हलली; BCCI चा फैसला, रोहितलाही फटका
18
मंगळाचा रुचक राजयोग: ५ राशींना मंगलमय काळ, अधिक कमाईची संधी; उत्तम यश, प्रगती योग!
19
मराठी भाषेचा तिरस्कार करणाऱ्या 'त्याला' युवकांनी चांगलीच अद्दल घडवली, काय घडलं?
20
Post Office Jansuraksha Scheme: कठीण काळात कुटुंबासाठी संकटमोचक बनतात 'या' ३ सरकारी स्कीम, पाहा याचे फायदे

रावणवाडीत मूलभूत साेयी-सुविधांचा अभाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2021 4:35 AM

संपूर्ण आदिवासी बांधव वास्तव्यास असलेल्या रावणवाडीत माडिया गोंड जातीचे २७५ लोक वास्तव्यास आहेत. गावात एकूण २९ कुटुंब आहेत. विशेष ...

संपूर्ण आदिवासी बांधव वास्तव्यास असलेल्या रावणवाडीत माडिया गोंड जातीचे २७५ लोक वास्तव्यास आहेत. गावात एकूण २९ कुटुंब आहेत. विशेष म्हणजे, तत्कालीन आमदार इंदूताई नाकाडे यांच्या व्यतिरिक्त आजपर्यंत कोणत्याही लोकप्रतिनिधी अथवा अधिकाऱ्यांनी गावाला भेट दिली नाही. १९९२ मध्ये गावाला मुख्य मार्गाशी जोडण्याकरिता कच्च्या रस्त्याचे खडीकरण करण्यात आले. तेव्हापासून आजतागायत मुख्य मार्गाशी रस्ता जोडण्याचे व त्यावर डांबरीकरणाचे काम झाले नाही.

या गावाने जंगलाचे संरक्षण व संवर्धन करून उपलब्ध जंगलाची व्याप्ती कायम ठेवली असून, संपूर्ण गाव धूरमुक्त झाले आहे. गावालगत असलेल्या २० हेक्टरमधील तलावामुळे सिंचनाची सोय झाली आहे. या गावाने आदिवासी पारंपरिक रेला नृत्याचे जतन करून आपली संस्कृती जोपासण्याचा पुरेपूर प्रयत्न केला आहे. देसाईगंज येथे होणाऱ्या विविध कार्यक्रमांमध्ये येथील नागरिक सहभाग घेतात. गावाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासकीय, प्रशासकीय स्तरावरून यथायोग्य प्रयत्न केल्या जात नाहीत. त्यामुळे या गावाचा विकास रखडला आहे. हे गाव आदिवासी असतानाही विकासापासून वंचित आहे.

बाॅक्स ......

स्वस्त धान्यासाठी ६ किमीची पायपीट

आरोग्य, शैक्षणिक सुविधेचा अभाव

जंगलव्याप्त या गावात एका अंगणवाडी व्यतिरिक्त शिक्षणाची कुठलीही सोय उपलब्ध नाही. येथील विद्यार्थ्यांना सहा किलोमीटर अंतरावरील कोरेगाव येथे शिक्षण घेण्याकरिता वन्यप्राण्यांचा धोका पत्करून जावे लागते. गावात शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही. संपूर्ण आदिवासी गाव असूनही या गावाचा समावेश पेसा क्षेत्रात नाही. याशिवाय गावातील एकाही नागरिकाला घरकुल योजनेचा लाभ मिळाला नाही. अनेक कुटुंब पडक्या कौलारू घरातच वास्तव्य करीत आहेत. येथील नागरिकांना कोरेगाव येथील स्वस्त धान्य दुकानातून धान्य आणावे लागते. याशिवाय आरोग्य सेवेसाठी सहा किमीची पायपीट करून कोरेगावला जावे लागते.