शहरं
Join us  
Trending Stories
1
शतकातील सर्वात दीर्घ सूर्यग्रहण, ६ मिनिटे २३ सेकंदांपर्यंत परसेल अंधकारा, कोण कोणत्या देशांत दिसणार? भारतात कुठे-कुठे दिसणार? जाणून घ्या
2
२० वर्षांनी राज ठाकरे घरी गेले, सक्रीय होताच संजय राऊतांना भेटले; अर्धा तास चर्चा, काय घडले?
3
इंडिगोच्या ७० हून अधिक विमानांचे उड्डाण रद्द! क्रूच्या कमतरतेमुळे मुंबई, पुणे, नागपूरसह देशभरातील हजारो प्रवासी हैराण
4
'मी खोटे काम केलं नाही!' छत्रपती संभाजीनगरची बोगस 'IAS' कल्पना भागवत अखेर 'बोलली'...
5
₹६७००००० चं टॉयलेट, ₹७६००० चा ब्रश अन्... किती श्रीमंत आहेत रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन? रहस्यमय आहे संपत्ती!
6
MS धोनीचा लाडका, वर्ल्डकपही खेळला; पण नंतर १० वर्ष संघाबाहेर बसला... अखेर क्रिकेटला रामराम
7
पुतिन यांच्या भारत दौऱ्यामुळे शेअर बाजारात खळबळ, 'हे' शेअर्स फोकसमध्ये राहणार...
8
Team India's New Jersey For T20 World Cup 2026: रोहितनं दाखवली टीम इंडियाची नवी जर्सी; कॉलरवरील तिरंगा चर्चेत!
9
मोठी बातमी! बिजापूरमध्ये भीषण चकमक; 7 नक्षलवादी ठार, तर 2 जवान शहीद
10
सायको काकी! सुंदर मुलांचा काटा काढायची अन् पार्टी करायची, स्वत:च्या मुलालाही सोडलं नाही
11
India's Squad For T20I vs SA: टी-२० मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा! हार्दिक पांड्यासह गिलचं कमबॅक!
12
एलॉन मस्कची धडकी भरवणारी भविष्यवाणी, म्हणाला- येत्या काळात महायुद्ध अटळ! २०३० पर्यंत...
13
हाहाकार! जमिनीतून अचानक विषारी गॅस बाहेर पडू लागला; धनबादमध्ये मुलाचा मृत्यू, शेकडो पक्षी दगावले
14
फोनचा पासवर्ड विसरलात? सर्व्हिस सेंटरला जायची गरज नाही; 'अशा' प्रकारे ५ मिनिटांत घरबसल्या करू शकता अनलॉक!
15
गुरुनिष्ठेचा आदर्श, रामदास स्वामींचे दर्शन; संप्रदायाचा समर्थ प्रचार करणारे श्रीधर स्वामी!
16
चमत्कार! कडाक्याच्या थंडीत निर्दयी आईने रस्त्यावर फेकलं, भटक्या कुत्र्यांनी नवजात बाळाला वाचवलं
17
"भारताचे तुकडे झाले, तरच...!"; बांगलादेशच्या माजी लष्करी अधिकाऱ्याचे विषारी फुत्कार, कोण आहेत अब्दुल्लाहिल अमान आजमी?
18
Virat Kohli Century : किंग कोहलीचा 'शतकी रोमान्स'! रायपूरच्या मैदानातही विक्रमांची 'बरसात'
19
गुरुवारी दत्त जयंती २०२५: ‘असे’ करा पूजन; पाहा, शुभ मुहूर्त, सोपा विधी अन् काही मान्यता!
20
मोठी उलथापालथ! ओला इलेक्ट्रीक रसातळाला पोहोचली; नोव्हेंबरच्या रेसमध्ये बाहेर फेकली गेली 
Daily Top 2Weekly Top 5

वैभव व इतिहासाची साक्ष देणाऱ्या वैरागड येथील किल्ल्याचे खास्तहाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2020 05:00 IST

चंद्रपूरचा गाेंड राजा बाबाजी बल्हाळशहा यांनी वैरागडातील हिऱ्यांच्या खाणीच्या संरक्षणार्थ हा किल्ला बांधला. या किल्ल्यावर माेगलांनी अनेक स्वाऱ्या केल्या. सेनापती युसूफ खान याने शेवटची स्वारी करून किल्ला लुटण्याचा प्रयत्न केला. या लढाईत त्याचे सर्व सैनिक मारल्या गेले. त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ राजा बल्हाळशहा याने याच परिसरात मस्जिद बांधली आहे. बाराव्या शतकातील हाथीगुंफा या शिलालेखात वैरागडचा उल्लेख आहे. हिऱ्याला संस्कृतमध्ये वाज्रागर म्हणतात. वाज्रागरच्या अपभ्रंषावरून वैरागड हे नाव पडले.

ठळक मुद्देगडप्रेेमींमध्ये नाराजी : डागडुजी न झाल्यास वास्तू नष्ट हाेण्याचा आहे धाेका

  प्रदीप बाेडणे लाेकमत न्यूज नेटवर्कवैरागड : प्राचीन काळातील राज वैभवाची साक्ष देणारा वैरागड येथील किल्ला काळाच्या ओघात ढासळत चालला आहे. काही ठिकाणी तर केवळ अवशेष शिल्लक आहेत. किल्ल्याची ही स्थिती बघून पर्यटन व अभ्यासासाठी आलेल्या गडप्रेमींना अश्रु अनावर हाेतात. ऐतिहासिक वारसा असलेल्या वैरागड किल्ल्याची सध्या कमालीची दुरवस्था झाली आहे.  किल्ल्याचे चार बाजुचे बुरूज, तट, झाडाझुडुपांनी वेढले आहेत. शेकडाे वर्षांपासून उन, वारा, पाऊस झेलणाऱ्या तट व बुरूजांची कमालीची दुरवस्था झाली आहे. किल्ल्याच्या मुख्य दरवाजाची मागील पाच वर्षांपासून भारतीय पुरातत्व विभागाकडून दुरूस्ती केली जात आहे. त्यामुळे मुख्य दरवाजाची स्थिती चांगली आहे. मात्र किल्ल्याच्या आतील भागातील राजाचा महल, किल्ला परिसरात असलेली चाैकाेनी, पंचकाेनी, अष्टकाेनी व इतर विविध आकाराच्या विहीरी, भूयार व किल्ल्याबाहेर पडण्यासाठी असलेल्या मागच्या दरवाजाची पूर्णपणे पडझड झाली आहे. काही भिंती काेसळल्याने त्यांचे दगड अस्ताव्यस्त परसले आहेत. किल्ल्याची आत्ताची स्थिती बघून गडप्रेमींबराेबरच सामान्य माणसांचेही मन हेलावल्याशिवाय राहत नाही.

बल्हाळशहाचे हाेते राज्यचंद्रपूरचा गाेंड राजा बाबाजी बल्हाळशहा यांनी वैरागडातील हिऱ्यांच्या खाणीच्या संरक्षणार्थ हा किल्ला बांधला. या किल्ल्यावर माेगलांनी अनेक स्वाऱ्या केल्या. सेनापती युसूफ खान याने शेवटची स्वारी करून किल्ला लुटण्याचा प्रयत्न केला. या लढाईत त्याचे सर्व सैनिक मारल्या गेले. त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ राजा बल्हाळशहा याने याच परिसरात मस्जिद बांधली आहे. बाराव्या शतकातील हाथीगुंफा या शिलालेखात वैरागडचा उल्लेख आहे. हिऱ्याला संस्कृतमध्ये वाज्रागर म्हणतात. वाज्रागरच्या अपभ्रंषावरून वैरागड हे नाव पडले.

०५ वर्षांपूर्वी झाली हाेती डागडुजी 

२०१५-१६ या वर्षात किल्ल्याच्या साैंदर्यीकरणाच्या कामाला पुरातत्व विभागाने सुरूवात केली. जानेवारी २०२० पासून काम पूर्णपणे बंद पडले आहे. या कालावधीत मुख्य प्रवेशद्वाराची दुरूस्ती झाली. जुन्याप्रमाणेच किल्ला दिसावा, यासाठी जुने दगड व नवीन चुना वापरला आहे. 

वैरागड किल्ला व भंडारेश्वर मंदिराच्या दुरूस्तीसाठी दरवर्षी निधी खर्च केला जात आहे. या ठिकाणी पुरातत्व विभागाने कायमस्वरूपी कर्मचाऱ्याची नेमणूक केली आहे. थांबलेले दुरूस्तीचे काम पुन्हा सुरू हाेणार आहे.  के. आर. के. रेड्डी, पुरातत्व अधिकारी

भावी पिढीला जुने वैभव, इतिहास व  कलाकृतींची साक्ष  पटण्यासाठी किल्ला दुरूस्त हाेणे आवश्यक आहे. केवळ थातुरमातुर दुरूस्त करून ऐतिहासिक वास्तुंचे संवर्धन करण्याचा केवळ देखावा केला जात असल्याचे दिसून येते.दत्तात्रेय हर्षे, गडप्रेमी, वैरागड

टॅग्स :Fortगड