शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 : किंग कोहलीचे षटकारांचे 'त्रिशतक'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
2
पाकिस्तानी महिलेशी केलेला विवाह लपवला; CRPF ने देशासाठी धोकादायक म्हणत मुनीर अहमदला केले बडतर्फ
3
अस्तनीतले निखारे! पहलगाम मुद्द्यावर काही भारतीयांचा पाकिस्तानला पाठिंबा! आतापर्यंत ३७ जणांना अटक
4
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
5
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
6
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
7
मुफ्ती दहशतवाद्यांच्या घरी जायच्या, काश्मिरी पंडितांना हाकलून कोणी दिलं? फारुख अब्दुल्लांचा आरोप
8
IPL 2025: कगिसो रबाडा ड्रग टेस्टमध्ये दोषी, झाले निलंबन! स्पर्धा सोडून परतला मायदेशी
9
"आम्ही पाकिस्तानी लोकांना मारणार नाही, कारण..."; काय म्हणाले फारुख अब्दुल्ला? सिंधूच्या पाण्यासंदर्भातही मोठं विधान
10
IHMCL Recruitment: आयएचएमसीएलमध्ये नोकरी, एक लाखांहून अधिक पगार; जाणून घ्या पात्रता आणि निवड
11
"घरं तोडायला येतील त्यांना सांगा, राज ठाकरेंशी बोलून घ्या"; एल्फिन्स्टन पूल बाधितांना मनसेने दिला धीर
12
"मी सत्तेसाठी कधीच हपापलेलो नाही, सर्वाधिक सत्ता..."; अजित पवारांनी मांडलं रोखठोक मत
13
Alka Kubal: अलका कुबल यांनी 'माहेरची साडी'साठी घेतलं होतं फक्त इतकं मानधन, पहिल्या कमाईचा आकडाही आला समोर
14
"दादांना विचारतो त्यांनी कुठल्या ज्योतिष्याकडे पाहिलं"; CM व्हावं वाटतं म्हणणाऱ्या अजित पवारांना गोगावलेंचा टोला
15
"शिंदे कसले वाघ, मंत्र्यांचा निधी वळवला जातो, अडचण येताच गावी पळून जातात": अंबादास दानवे
16
Temple: शिवालयाच्या पायरीवर असलेल्या 'या' राक्षसाला नमस्कार करून मंदिरात जाण्याचा प्रघात का?
17
पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा आखाती देशांतील मराठी अनिवासी भारतीयांकडूनही तीव्र निषेध
18
बलुचिस्तानात मोठा खेला...! भारताला पोकळ धमक्या देणारा पाक उघडा पडला; सरकारी इमारतींवर बंडखोरांचा ताबा, लावली आग
19
१३२ सेवा, २४ राज्ये, २८४ जिल्ह्यांना जोडणाऱ्या ‘वंदे भारत’मुळे रेल्वेची किती कमाई होते?
20
Pune Accident: कीर्तन ऐकून घरी परतताना भरधाव मर्सिडीजनं उडवलं; दुचाकीस्वार जागीच ठार

काेराेनाने सात महिन्यात 108 तर यावर्षी साडेतीन महिन्यांत 172 मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2021 05:00 IST

जिल्ह्यात गेल्यावर्षी मे महिन्यात काेराेनाच्या पहिल्या रूग्णाचा शिरकाव झाला. तेव्हापासून आतापर्यंत १६ हजर ९३६ जणांना काेराेनाची लागण झाली आहे. त्यापैकी १२ हजार ७७३ जणांनी काेराेनावर यशस्वीपणे मात केली. परंतु २८० जणांना प्राण गमवावे लागले. त्यातील अनेक जण लगतच्या चंद्रपूर, गाेंदिया, भंडारा एवढेच नाही तर काही नागपूर जिल्ह्यातील रूग्ण आहेत. काेराेनाच्या दुसऱ्या लाटेत ग्रामीण भागातील रूग्णांचे मृत्यू वाढत आहेत. 

ठळक मुद्देदुसऱ्या लाटेचा ग्रामीण भागातही कहर, ऑक्सिजनयुक्त बेड्सची कमतरता

लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिराेली : जिल्ह्यात जानेवारी महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यानंतर आलेल्या काेराेनाच्या दुसऱ्या लाटेने गडचिराेली शहरासह ग्रामीण भागातही चांगलाच कहर केला आहे. या साडेतीन महिन्यांत तब्बल १७२ जणांचा काेराेनाने मृत्यू झाला. त्यापैकी अर्धेअधिक लाेक ग्रामीण भागातील आहेत. ग्रामीण स्तरावर सुसज्ज आराेग्य सुविधेची गरज निर्माण झाली असून ती देताना आराेग्य यंत्रणेला कसरत करावी लागत आहे. गडचिराेली शहरात चार ठिकाणी काेरेानाबाधित रुग्णांवर उपचाराची साेय करण्यात आली आहे; परंतु ग्रामीण भागात तालुका मुख्यालयी एकच काेराेना केअर सेंटर आहे. त्यातही ऑक्सिजनयुक्त बेडची साेय माेजक्याच रुग्णालयात आहे. अशावेळी रुग्णाची प्रकृती बिघडल्यास किंवा त्याला तातडीने ऑक्सिजनची गरज भासल्यास जिल्हा मुख्यालयी आणण्याशिवाय पर्याय नसताे. या गडबडीत रुग्णाला जीव गमवावा लागू शकताे. त्यामुळे ग्रामीणस्तरावर आराेग्य सुविधांमध्ये वाढ करून ऑक्सिजनची साेय करण्याची गरज निर्माण झाली आहे. जानेवारी महिन्यापर्यंत जिल्ह्यात सक्रीय रूग्णांची संख्या १ हजार पेक्षा जास्त कधीच नव्हती. पण आताच्या स्थितीत सक्रीय रूग्णांची संख्या ४ हजाराचा पल्ला गाठत आहे. म्हणजेच सात महिन्यात जेवढे रूग्ण हाेते त्यापेक्षा दुप्पट रूग्ण गेल्या तीन महिन्यात वाढले आहेत. ही बाब जिल्हावासीयांसाठी चिंतेची आहे. 

आतापर्यंत २८० जणांनी गमावले प्राणजिल्ह्यात गेल्यावर्षी मे महिन्यात काेराेनाच्या पहिल्या रूग्णाचा शिरकाव झाला. तेव्हापासून आतापर्यंत १६ हजर ९३६ जणांना काेराेनाची लागण झाली आहे. त्यापैकी १२ हजार ७७३ जणांनी काेराेनावर यशस्वीपणे मात केली. परंतु २८० जणांना प्राण गमवावे लागले. त्यातील अनेक जण लगतच्या चंद्रपूर, गाेंदिया, भंडारा एवढेच नाही तर काही नागपूर जिल्ह्यातील रूग्ण आहेत. काेराेनाच्या दुसऱ्या लाटेत ग्रामीण भागातील रूग्णांचे मृत्यू वाढत आहेत. 

ऑक्सिजनसाठी ६० किमीचा प्रवासजिल्ह्याच्या पूर्व टाेकावरील धानाेरा तालुक्यात ऑक्सिजनयुक्त बेड असलेले काेविड केअर सेंटर नाही. त्यामुळे या तालुक्यातील मुरूमगावसह अनेक टाेकावरच्या गावातील रूग्णांना ऑक्सिजनसाठी ६० ते ७० किलाेमीटरचा पल्ला गाठत गडचिराेलीत येण्याशिवाय गत्यंतर नसते. दुर्गम भागातील धानाेरापर्यंत येण्यासाठी वाहनाचीही साेय नसते. तालुक्याला एकच रूग्णवाहिका असल्यामुळे ती कुठे-कुठे पुरणार, असा प्रश्न निर्माण हाेताे. 

माहिती देण्यास अधिकाऱ्यांची टाळाटाळकाेराेना आजारासंदर्भात विविध प्रकारची माहिती जाणून घेण्यााची उत्सुकता नागरिकांमध्ये असते. याशिवाय आपल्या भागातील आराेग्यविषयक साेयीसुविधांची माहिती त्यांना हवी असते. परंतु आराेग्य विभागाचे काही अधिकारी माहिती देण्यास टाळाटाळ करत असल्यामुळे शंकेला वाव निर्माण हाेत आहे. आरमाेरी तालुका आराेग्य अधिकारी डाॅ.आनंद ठिकरे यांनी वरिष्ठांनी (जिल्हा आराेग्य अधिकारी) प्रसार माध्यमांना माहिती न देण्याची सूचना केल्याचे लाेकमतशी बाेलताना सांगितले.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याDeathमृत्यू