शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Update : केरळात मान्सून कधी येणार? हवामान विभागाने दिली मोठी अपडेट, तारीख सांगितली
2
४ जूननंतर पुन्हा एकदा उबाठा, शरद पवारांचा पक्ष फुटणार; भाजपा नेत्याचा दावा
3
'भारत चंद्रावर पोहोचला, आमच्याकडे गटारी...; पाकिस्तानी खासदाराने आपल्याच देशाला दाखवला आरसा
4
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात, अनेक दिवसांनंतर IT शेअर्समध्ये तेजी
5
Video: ऐश्वर्या रायच्या हाताला दुखापत, तरी Cannes Film Festival मध्ये होणार सहभागी
6
आता कोव्हॅक्सिनचे साईड इफेक्ट्स समोर आले; केस गळती, त्वचा विकार आणि मासिक पाळीच्या समस्या...
7
TATA Sonsच्या पहिल्या महिला डायरेक्टर, ज्यांच्याकडून जेआरडी टाटाही घ्यायचे सल्ला; रतन टाटांशी 'हे' आहे नातं
8
विकासाची ब्ल्यू प्रिंट तयार, तरुणांनी पाठवाव्या आयडिया, २०४७ पूर्वीच...; PM मोदींचा निर्धार
9
VIDEO: १६० किमी वेग असताना सुरु केलं इन्स्टाग्राम लाईव्ह; मुंबईला येताना अपघातात कारचा चेंदामेंदा
10
मुंबई विमानतळाचा बडा अधिकारी, अमेरिकेतून मुलगा फोन लावत होता, उचलेना; घाटकोपरच्या होर्डिंगखाली पती-पत्नी सापडले
11
आजचे राशीभविष्य १६ मे २०२४; उत्तम वस्त्रे, दागिने, वाहन प्राप्ती होण्याची शक्यता
12
२३ दिवस उलटूनही 'तारक मेहता' फेम सोढीचा काहीच पत्ता नाही, वडील म्हणाले- "मुलाची वाट पाहून..."
13
इंदूरमध्ये रात्री उशिरा भीषण अपघात, पार्क केलेल्या डंपरला कार धडकली, ८ जण ठार
14
दहावी पास लेकाची कमाल; वडिलांचा डबघाईला आलेला उद्योग मालामाल, ३ हजार कोटींची उलाढाल
15
₹४३ कोटींच्या वेतन घेणाऱ्या व्यक्तीवर अझीम प्रेमजींच्या Wipro नं केला ₹२५ कोटींचा खटला; काय आहे प्रकरण?
16
कांदा, द्राक्ष उत्पादकांसाठी केंद्राचे झुकते माप: PM मोदी, ‘ऑपरेशन ग्रीन’ पुन्हा राबविणार
17
पक्ष सांभाळू शकत नाहीत, ते देश काय सांभाळणार? PM नरेंद्र मोदी, ‘रोड शो’मधून शक्तिप्रदर्शन
18
कल्याण शहर झाले ‘नरेंद्र मोदी’मय; जयघोष, जल्लोष, सेल्फी पॉइंट अन् बरेच काही...
19
दोन पक्ष संपवण्याच्या प्रयत्नात भाजपलाच संपवले: आदित्य ठाकरे, लोकमतला खास मुलाखत
20
पंतप्रधान मोदींच्या मुंबई दौऱ्यात उपमुख्यमंत्री अजित पवार गैरहजर; चर्चांना उधाण

धानावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2019 5:00 AM

गडचिरोली जिल्ह्यात सर्वाधिक शेतीक्षेत्र चामोर्शी तालुक्यात आहे. या तालुक्यात प्रामुख्याने धानपिकाची शेती केली जाते. याशिवाय देसाईगंज तालुक्यातील विसोरा, तुळशी, कोकडी, आरमोरी तालुक्याच्या वैरागडसह बहुतांश भागात हलके, मध्यम व जड प्रतीच्या धानाची लागवड केली जाते. दरवर्षीप्रमाणे यंदाही शेती मशागत करून धानपिकाची लागवड केली.

ठळक मुद्देजिल्हाभरातील शेतकरी चिंतेत : अनेक शेतकऱ्यांकडून दोन ते तीनदा पिकावर कीटनाशकाची फवारणी

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : वातावरणातील बदल, दमटपणा व अतिवृष्टीमुळे यंदाच्या खरीप हंगामात धानपिकावर लष्करी अळीसह विविध रोगाचा प्रादुर्भाव वाढला आहे. गडचिरोली जिल्ह्यात शेकडो हेक्टर शेतातील धानपिकावर रोगाचा प्रादुर्भाव झाला असल्याने शेतकरी दोन ते तिनदा कीटकनाशकाची फवारणी करीत आहेत. रोग १०० टक्के आटोक्यात येत नसल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत.गडचिरोली जिल्ह्यात सर्वाधिक शेतीक्षेत्र चामोर्शी तालुक्यात आहे. या तालुक्यात प्रामुख्याने धानपिकाची शेती केली जाते. याशिवाय देसाईगंज तालुक्यातील विसोरा, तुळशी, कोकडी, आरमोरी तालुक्याच्या वैरागडसह बहुतांश भागात हलके, मध्यम व जड प्रतीच्या धानाची लागवड केली जाते. दरवर्षीप्रमाणे यंदाही शेती मशागत करून धानपिकाची लागवड केली. सुरूवातीच्या टप्प्यात अपेक्षित पाऊस झाला नाही. त्यामुळे धानपिकाची पेरणी लांबली. दरम्यान शेतकऱ्यांनी धडपड करून कसेबसे धानाचे पºहे टाकले. त्यानंतर संततधार पावसाची सुरूवात झाली. धानपिकाची रोवणी आटोपली. मात्र पोळा व गणेश उत्सवानंतरही पावसाचा जोर अद्यापही कायम आहे. अशा या दमट वातावरणामुळे व अतिवृष्टीमुळे धानपिकावर लष्करी अळी या रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. याशिवाय खोडकिडा, करपा, कडाकरपा व इतर रोगांचा प्रादुर्भाव होत आहे. या रोगाचे वेळेत व्यवस्थापन करून धानपिकावरील रोग नष्ट करण्याचा सल्ला आत्मा कार्यालय व कृषी विभागाने जिल्ह्यातील शेतकºयांना दिला आहे. दरम्यान कृषी विभागाचे अधिकारी व कर्मचारी प्रत्यक्ष शेताच्या बांधावर जाऊन रोगग्रस्त पिकाची पाहणी करीत आहेत.पाहणीदरम्यान क्षमतेपेक्षा अधिक पाऊस, प्रखर सूर्यप्रकाशाचा अभाव, दमट वातावरण, अशा अपोषक वातावरणामुळे धानपिकावर रोगाचा प्रादुर्भाव झाल्याचे कृषी तज्ज्ञांसह शेतकºयांकडून सांगितले जात आहे. रोगाचा नायनाट करण्यासाठी आता शेतकरी पारंपरिक उपाययोजना करीत नाही. कारण कृषी विभागाच्या कर्मचाºयांकडून ग्रामीण व दुर्गम भागातील शेतकºयांना प्रत्यक्ष मार्गदर्शन मिळत नाही. प्रात्यक्षिकाच्या माध्यमातून प्रत्येक गावात धानपिकावरील रोगांचा नायनाट करण्यासाठी नैसर्गिक उपाययोजनांबाबत माहिती देण्याची गरज आहे. निंबोळीअर्काचा वापर करण्याचे आवाहन कृषी विभागाकडे शेतकºयांना केले जात असले तरी निंबोळीअर्क कसा बनवायाचा, त्याची मात्रा किती वापरायची, त्याची फवारणी कशी करायची आदीसह विविध बाबींसंदर्भात शेतकºयांच्या बांधावर जाऊन मार्गदर्शन करण्याची गरज आहे. मात्र असे मार्गदर्शन मिळत नसल्याने बहुतांश शेतकरी जिल्हा, तालुका व मोठ्या गावाच्या कृषी केंद्रात जाऊन रासायनिक कीटकनाशकाची खरेदी करीत आहेत. कीटकनाशकाची फवारणी धानपिकावर सुरू असून या कामास वेग आला आहे. धानपीक रोगातून वाचविण्याची धडपड सुरू आहे.रात्रीच्या सुमारास पाने कुरतडून खाण्याचे प्रमाण अधिककृषी विभागाच कृषी सहायक, कृषी सेवक व इतर कर्मचारी प्रत्यक्ष शेतावर जाऊन धानपिकाची पाहणी करीत आहेत. त्यांनी केलेल्या निरीक्षणानुसार बºयाच भागातील धानपिकावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव झाल्याचे दिसून आले. लष्करी अळीचे पतंग कामगंध सापड्यात एक ते तीन दिवस तसेच प्रत्यक्ष शेतात प्रतीचौरस मीटरला एक याप्रमाणे आढळून आले आहे. गेल्या १० ते १२ दिवसांपासून हे पतंग कमीअधीक प्रमाणात दिसून येत आहेत. ही परिस्थिती धोकादायक आहे. मादी पतंग २०० ते ३०० अंडी रानटी गवतावर अथवा धानावर घालून ते करड्या धाग्याने झाकते. अंडी सात दिवसांपर्यंत उबवून नंतर ती अळी २० ते २५ दिवस रात्रीच्या सुमारास पाने जास्त कुरतडून खातात.

 

टॅग्स :agricultureशेती