शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
2
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
3
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
4
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
5
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
6
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
7
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
8
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
9
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
10
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
11
धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड
12
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
13
सावधान! कारचा AC वारंवार बंद करताय? मायलेज वाढवण्याच्या नादात होऊ शकतं मोठं नुकसान; कसं? जाणून घ्या
14
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
15
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
16
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
17
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
18
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
19
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
20
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
Daily Top 2Weekly Top 5

समाजात दातृत्वाची भावना वाढीस लागावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2017 01:22 IST

आवश्यकतेपेक्षा अधिक संपत्ती असलेल्या नागरिकांनी सामाजिक उत्तरदायित्वाच्या भावनेतून गोरगरीब, रंजलेल्या,

 मकरंद अनासपुरे यांचे मत : गडचिरोलीत कौशल्य प्रशिक्षण प्रभावी राबविण्याची गरज कुरखेडा : आवश्यकतेपेक्षा अधिक संपत्ती असलेल्या नागरिकांनी सामाजिक उत्तरदायित्वाच्या भावनेतून गोरगरीब, रंजलेल्या, कष्टकरी व शेतकऱ्यांच्या वेदना आणि दु:ख समजून घ्यावे, अशा गरजू नागरिकांच्या कल्याणासाठी योगदान दिले पाहिजे, समाजात दातृत्वाची भावना वाढीस लागणे गरजेचे आहे, असे मत प्रसिद्ध मराठी सिनेकलावंत तथा ‘नाम’ संस्थेचे संस्थापक मकरंद अनासपुरे यांनी व्यक्त केले. कुरखेडा येथे मंगळवारी रात्री नाट्यप्रयोगाच्या निमित्ताने ते आले होते. याप्रसंगी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. याप्रसंगी आ. क्रिष्णा गजबे, प्राचार्य डॉ. राजाभाऊ मुनघाटे, शिवसेना जिल्हा प्रमुख सुरेंद्रसिंह चंदेल उपस्थित होते. भविष्यात पर्यावरणाला होणाऱ्या हानीमुळे गंभीर समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे वेळीच समाजात याबाबत जागरूकता निर्माण होणे गरजेचे आहे. प्रशासकीय स्तरावरही याबाबत गांभीर्याने विचार होणे आवश्यक आहे, असे अनासपुरे यावेळी म्हणाले. गडचिरोली जिल्ह्यात उद्योगधंद्यांचा अभाव आहे. दुसरीकडे सुशिक्षित बेरोजगारांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. परिणामी रिकाम्या हाताने असलेले अनेक युवक वाम मार्गाकडे वळण्याचा धोका निर्माण झाला आहे. यातून अराजकताही निर्माण होऊ शकते. शासनस्तरावरून या युवकांना दिशा दाखवत रोजगाराची संधी निर्माण झाली पाहिजे, यासाठी शासन व प्रशासकीय स्तरावरून कौशल्य प्रशिक्षण कार्यक्रम प्रभावी राबविण्याची खऱ्या अर्थाने गरज आहे, असेही ते यावेळी म्हणाले. ‘नाम’ या सामाजिक संस्थेद्वारे आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना स्वावलंबी करण्यासाठी आर्थिक मदत पुरविण्यात येते. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या पाल्यांना उच्च शिक्षणाची सोय व्हावी म्हणून संस्थेच्या वतीने काही शाळा सुद्धा सुरू करण्यात आल्या आहेत, अशीही माहिती त्यांनी यावेळी दिली. यापुढे केवळ महाराष्ट्रातच नाही तर देशपातळीवर ‘नाम’ या सामाजिक संस्थेद्वारे शहीद जवानांच्या कुटुंबीयांना मदतीच्या रूपात आधार देण्यात येईल, शहीद जवानांच्या पाल्यांकरिता शैक्षणिक मदत पुरविण्यात येईल, अशी माहिती मकरंद अनासपुरे यांनी दिली. (तालुका प्रतिनिधी)